AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

KBC | ‘केबीसी’मध्ये जिंकलेले 5 कोटी रुपये गमावले, व्यसनाधीन झाला अन् आता करतोय ‘हे’ काम

2011 मध्ये KBC च्या पाचव्या सीझनमध्ये सुशील कुमार या स्पर्धकाने पाच कोटी रुपये जिंकले होते. मात्र बिहारच्या सुशील कुमारने या रकमेचा योग्य वापर करू शकला नाही आणि काही वेळातच त्याने सर्व पैसे गमावले.

KBC | 'केबीसी'मध्ये जिंकलेले 5 कोटी रुपये गमावले, व्यसनाधीन झाला अन् आता करतोय 'हे' काम
KBC winner Sushil KumarImage Credit source: Facebook
| Updated on: Aug 11, 2023 | 3:26 PM
Share

मुंबई | 11 ऑगस्ट 2023 : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा ‘कौन बनेगा करोडपती’ या लोकप्रिय शोचा नवीन सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोच्या प्रत्येक सीझनमध्ये अनेक स्पर्धकांनी रक्कम जिंकली. 2011 मध्ये KBC च्या पाचव्या सीझनमध्ये सुशील कुमार या स्पर्धकाने पाच कोटी रुपये जिंकले होते. मात्र बिहारच्या सुशील कुमारने या रकमेचा योग्य वापर करू शकला नाही आणि काही वेळातच त्याने सर्व पैसे गमावले. 2020 मध्ये त्याने फेसबुकवर पोस्ट लिहीत स्वतःची व्यथा सांगितली होती.

KBC मध्ये 5 कोटी रुपये जिंकल्यानंतर अनेकांनी आपली फसवणूक केल्याचं त्याने या पोस्टमध्ये लिहिलं होतं. त्याने काही पैसे सामाजिक कार्यासाठी देण्याचा प्रयत्न केला. मात्र याच प्रयत्नात त्याच्या अवतीभवती असलेल्या काही लोकांनी त्याची फसवणूक केली.

“केबीसीनंतर मी परोपकाराची अनेक काम केली. गुप्तपणे दान करण्याचं जणू व्यसनच मला लागलं होतं. त्यावेळी एका महिन्यात मी जवळपास 50 हजार कार्यक्रमांना हजेरी लावायचो. यामुळे अनेकदा लोकांनी माझी फसवणूक केली. पैसे दान केल्यानंतर मला या फसवणुकीबद्दल समजायचं. यामुळे पत्नीसोबतचं नातं बिघडू लागलं होतं. योग्य आणि अयोग्य लोकांमधील फरक मी समजू शकत नाही, असं तिचं म्हणणं होतं. कुटुंबाच्या भविष्याचा विचार करत नसल्याचा आरोप तिने माझ्यावर केला. त्यावरून अनेकदा आमची भांडणं व्हायची”, असं सुशील कुमारने लिहिलं होतं.

जेव्हा दिवाळखोरीच्या बातम्या येऊ लागल्या तेव्हा लोकांनी आपल्याला कार्यक्रमांना बोलावणं थांबवलं, असंही सुशीलने स्पष्ट केलं. “एकेदिवशी सहज फिरत असताना मला एका इंग्रजी वर्तमानपत्राचा पत्रकार भेटला. त्याने मला काही प्रश्न विचारले. एका प्रश्नामुळे मी थोडा चिडलो आणि त्याला सहज सांगितलं की माझ्याकडे असलेले सर्व पैसे संपले आहेत. मी सध्या दोन गाई पाळतोय आणि गाईचं दूध विकून घराचा गाडा चालवतोय. त्यानंतर ही बातमी छापली गेली आणि सर्वत्र त्याची चर्चा झाली. माझ्याकडचे पैसे संपल्याचं कळताच लोकांनी मला कार्यक्रमांना बोलावणं बंद केलं. त्यावेळी पुढे नेमकं काय करावं हे विचार करण्यासाठी मला थोडा वेळ मिळाला”, असं त्याने पुढे लिहिलं.

या काळात सुशील कुमारचा संपर्क जामिया मिलिया, IIMC, JNU मध्ये शिकणाऱ्या काही विद्यार्थ्यांशी आला. त्याची ओळख काही थिएटर कलाकारांशीही झाली. मात्र हे विद्यार्थी जेव्हा एखाद्या विषयावर बोलायचे, तेव्हा सुशीलवर दडपण यायचं. त्याविषयी आपल्याला फार काही माहीत नसल्याची भीती त्याला होती. याच भीतीतून हळूहळू तो दारुच्या व्यसनाकडे वळला. सध्या सुशील एक शिक्षक म्हणून काम करतोय. त्याने बॉलिवूडमध्येही नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात त्याला यश मिळालं नाही.

कोंडेश्वर शिव मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या मोठ्या रांगा
कोंडेश्वर शिव मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या मोठ्या रांगा.
तेजस ठाकरेंवर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरु! नेमकं काय घडलं?
तेजस ठाकरेंवर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरु! नेमकं काय घडलं?.
अजित पवारांचा विलीनीकरणासाठी आग्रह होता - जयंत पाटील
अजित पवारांचा विलीनीकरणासाठी आग्रह होता - जयंत पाटील.
हर्षवर्धन सपकाळांच्या वक्तव्याने वाद; भाजप-काँग्रेसमध्ये जुंपली
हर्षवर्धन सपकाळांच्या वक्तव्याने वाद; भाजप-काँग्रेसमध्ये जुंपली.
राज्यभरात एटीएसची मोठी कारवाई; यवतमाळ आणि अहिल्यानगरमध्ये छापे
राज्यभरात एटीएसची मोठी कारवाई; यवतमाळ आणि अहिल्यानगरमध्ये छापे.
अजित पवारांच्या अपघाताप्रकरणी रोहित पवारांचं अमित शाहांना पत्र
अजित पवारांच्या अपघाताप्रकरणी रोहित पवारांचं अमित शाहांना पत्र.
महाराष्ट्र पालथा घातला असता तर...; राऊतांनी ठाकरे बंधूंचे कान टोचले
महाराष्ट्र पालथा घातला असता तर...; राऊतांनी ठाकरे बंधूंचे कान टोचले.
मी कान नाही टोचले, मी फक्त...; सामनातील अग्रलेखावर राऊतांचं उत्तर
मी कान नाही टोचले, मी फक्त...; सामनातील अग्रलेखावर राऊतांचं उत्तर.
मेट्रोच्या कामाच्या नावाखाली अख्खी मुंबई खोदून ठेवलीय; राऊतांची टीका
मेट्रोच्या कामाच्या नावाखाली अख्खी मुंबई खोदून ठेवलीय; राऊतांची टीका.
पैशाचा विषय येतो! भारत-पाक सामन्यावर संजय राऊतांचं मोठं विधान
पैशाचा विषय येतो! भारत-पाक सामन्यावर संजय राऊतांचं मोठं विधान.