AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हेल्मेटचेही झाले तुकडे-तुकडे; अभिनेत्री सुचंद्रा दासगुप्ताच्या अपघाताच्या वेळी नेमकं काय घडलं?

सुचंद्राच्या अपघातप्रकरणी पोलिसांनी लॉरी चालवणाऱ्या ड्राइव्हरला ताब्यात घेतलं आहे. सुचंद्राने काही बंगाली मालिकांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. बिस्वरुप बंद्योपाध्याय आणि मोहना मैती यांच्या 'गौरी इलो' या मालिकांमध्ये ती झळकली होती.

हेल्मेटचेही झाले तुकडे-तुकडे; अभिनेत्री सुचंद्रा दासगुप्ताच्या अपघाताच्या वेळी नेमकं काय घडलं?
Suchandra DasguptaImage Credit source: Instagram
| Updated on: May 21, 2023 | 1:58 PM
Share

कोलकाता : प्रसिद्ध बंगाली टेलिव्हिजन अभिनेत्री सुचंद्रा दासगुप्ताने रस्ते अपघातात आपला जीव गमावला. सुचंद्राच्या अपघाताने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. शूटिंगनंतर ती घरी परतत होती. त्यावेळी हा अपघात झाला. कोलकातामधील पानीहाटी याठिकाणी सुचंद्रा राहते. शूटिंगनंतर घरी जाण्यासाठी तिने एका ॲपवरून बाईक बुक केली होती. घोषपारा याठिकाणी बारानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तिचा अपघात झाला. यावेळी सुचंद्राने हेल्मेट घातला होता. मात्र हा अपघात इतका भीषण होता, की तिच्या हेल्मेटचेही तुकडे-तुकडे झाले होते.

नेमकं काय घडलं?

सुचंद्राने बाईक बुक केल्यानंतर ती घरी जाण्यासाठी चालकाच्या मागे बसली होती. अचानक त्यांच्या बाईकसमोर एक सायकलस्वार आला. त्याला वाचवण्यासाठी बाईक चालवणाऱ्याने अचानक ब्रेक मारला. यावेळी सुचंद्राचा तोल गेला आणि ती बाईकवरून थेट खाली रस्त्यावर पडली. बाईकपासून एक फूटाच्या अंतरावर ती पडली. त्याचवेळी अचानक मागून येणाऱ्या लॉरीने सुचंद्राला चिरडलं. प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार, यावेळी सुचंद्राच्या हेल्मेटचेही तुकडे-तुकडे झाले होते. जवळच्या लोकांनी तिला ताबडतोब रुग्णालयात दाखल केलं. मात्र तिचे प्राण वाचू शकले नाही.

सुचंद्राच्या अपघातप्रकरणी पोलिसांनी लॉरी चालवणाऱ्या ड्राइव्हरला ताब्यात घेतलं आहे. सुचंद्राने काही बंगाली मालिकांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. बिस्वरुप बंद्योपाध्याय आणि मोहना मैती यांच्या ‘गौरी इलो’ या मालिकांमध्ये ती झळकली होती. सुचंद्राने मोजक्याच भूमिका साकारल्या होत्या, मात्र यांमुळे तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली होती. देशभरातील रस्ते अपघाताच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होतेय. काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध युट्यूबर अमित मंडलचाही रस्ते अपघातात मृत्यू झाला होता.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.