AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वजन कमी करण्यासाठी 10-10 लिटर पाणी प्यायची ही अभिनेत्री; तरीही मिळाले अपयश, मग मात्र

मी अनेक वर्ष माझ्या शरीराचा तिरस्कार करत होते. वजन कमी करण्यासाठी मी अनेक उपाय केले, पण त्यात यश मिळाले नाही, असे अभिनेत्रीने सांगितले. मग मात्र मी..

वजन कमी करण्यासाठी 10-10 लिटर पाणी प्यायची ही अभिनेत्री; तरीही मिळाले अपयश, मग मात्र
Image Credit source: instagram
| Updated on: Jul 04, 2023 | 12:05 PM
Share

मुंबई : अभिनेत्री विद्या बालन (Vidya Balan) ही तिच्या खणखणीत अभिनयासोबतच तिच्या स्पष्ट विचारांसाठीही प्रसिद्ध आहे. तिचं सुंदर हास्य आणि काळजाचा ठाव घेणारे डोळे, यासह तिच्या अभिनयाने ती रसिकांना खिळवून ठेवते. ती झिरो फिगर (size zero) कधीच नव्हती, पण तरीही तिला पडद्यावर पाहताना तिच्या प्लस साईज बॉडीकडे नव्हे तर तिच्या अदाकारीकडे, अभिनयाकडे लोकांच लक्ष जातं. झिरो साईज नसली तरी ती तिचं काम इतक चोखं करते, की कोणाला बोट ठेवायला जागाच मिळू नये.

मात्र असं असलं तरी तिनेही बराच संघर्ष केला आहे. एक काळ असा होता, जेव्हा मी माझ्या शरीरामुळे अतिशय त्रस्त झाले होते, असं विद्या सांगते. मी माझ्या शरीरासोबतच ( ते जसं आहे तसं) जगणं शिकले होते. त्यत काहीच बदल होणार नाही अशी ठाम समजूत मी करून घेतली होती.

माझ्या शरीराची लाज वाटायची…

माझ्या आईला जसं हवं होतं तसं माझं शरीर नव्हतं. मी त्यामुळे त्रासले होते. काही वेळा तर मला माझ्याच शरीराची लाज वाटायची, अस विद्याने नमूद केलं. मी बराच काळ या मन:स्थितीत होते आणि माझा स्वत:शीच संघर्ष सुरू होता. एक काळ तर असा होता, जेव्हा मी माझ्याच शरीराचा तिरस्कार करायला लागले होते.

मी बऱ्याच वेला आजारी पडायचे. पण त्याचं कारण म्हणजे मी माझं शरीरा स्वीकारूच शकत नव्हते. पण त्यानंतर मला उमगलं की जर हे शरीर नसतं तर मी जिवंतच राहू शकले नसते. मी अनेक वर्ष शरीराचा तिरस्कार केला, त्याचा आता मला खूप पश्चाताप होतो, असही विद्याने नमूद केलं.

पाणी पिऊन केला वजन घटवण्याचा प्रयत्न

एका जुन्या मुलाखतीत विद्याने सांगितलं होतं की तिने वजन कमी करण्यासाठी बरेच प्रयत्न केले. वजन कमी करायचे असेल तर १० लि लिटर पाणी प्यायला हवं, असा सल्ला मला कोणीतरी दिला आणि मी तो फॉलोही केला. मी भरपूर पाणी प्यायला लागले, पण त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला. मी बारीक काही झाले नाही, पण खूप पाणी प्यायल्याने आजारीच पडले, इतकी, की मला रुग्णालयातच दाखल करावं लागलं.

मात्र मी त्यातून धडा शिकले. माझं शरीर जसं आहे, तसं स्वीकारायला शिकले. कारण हे शरीर नसतं तर मीच नसते, नाही का ? असं विद्या म्हणाली

कामाबाबत बोलायचं झालं तर विद्या लवकरच नियत या मिस्ट्री थ्रिलरमध्ये झळकणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत राहुल बोस, राम कपूर यांच्यासह अनेक मोठे कलाकार दिसणार आहेत.

गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल...
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.