AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऐश्वर्या रायसोबत अफेअर प्रसिद्ध अभिनेता म्हणाला, ‘कोणाला सोडून जायचं असेल तर…’, चर्चांना उधाण

Aishwarya Rai Bachchan Love Life: आजही रंगतात ऐश्वर्या रायच्या अफेअरच्या चर्चा, ब्रेकअपच्या अनेक वर्षांनंतर अभिनेता म्हणाला, कोणाला सोडून जायचं असेल तर...', ऐश्वर्या राय कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे असते चर्चेत...

ऐश्वर्या रायसोबत अफेअर प्रसिद्ध अभिनेता म्हणाला, 'कोणाला सोडून जायचं असेल तर...', चर्चांना उधाण
फाईल फोटो
| Updated on: Mar 11, 2025 | 3:05 PM
Share

अभिनेत्री ऐश्वर्या राय हिने अभिनेता अभिषेक बच्चन याच्यासोबत 2007 मध्ये लग्न केलं आणि अभिनेत्रीने 2011 मध्ये लेक आराध्या हिला जन्म दिला. पण अभिषेक याच्यासोबत लग्न करण्यापूर्वी ऐश्वर्या हिने अभिनेता विवेक ओबेरॉय आणि अभिनेता सलमान खान याला डेट केलं होतं. पण दोघांसोबत देखील अभिनेत्रीचं नातं लग्नपर्यंत पोहोचलं नाही. दरम्यान, एका मुलाखतीत विवेक ओबेरॉय याने टॉक्सिक रिलेशनशिपबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. मुलाखतीत विवेक याने अभिनेत्री ऐश्वर्या राय हिच्यापासून अभिनेता अभिषेक बच्चन बद्दल देखील मोठं वक्तव्य केलं.

अभिनेता म्हणाला, ‘ऐश्वर्यासोबत माझं ब्रेकअप वर्ल्ड न्यूज झालं होतं. पण त्यातून बाहेर येणं माझ्यासाठी चांगलं होतं. जर तुमच्या आयुष्यातून कोणाला जायचं असेल तर जाऊद्या. जसं की एका लहान मुलाचं लॉलीपॉप खाली पडल्यानंतर त्याची आई सांगते खाली पडलेल्या वस्तू पुन्हा उचलायच्या नसतात… त्याच प्रमाणे आयुष्य देखील तुम्हाला नवा जोडीदार देईल…’

‘मी याठिकाणी माझा स्वतःचा अनुभव सांगत आहे. कधी – कधी आपण वेदनादायी नात्यात असतो… काही नाती फक्त तुमचा वापर करतात. त्यांच्या आयुष्यात तुम्हाला काहीच किंमत नसते. तुम्हाला सन्मान मिळत नाही. अशा नात्यात तुम्ही देखील गुंतले जाता. कारण तुम्हाला तुमची किंमत माहिती नसते… कधीकधी तुम्हाला असं वाटतं की नशिबाला जे हवं आहे ते होईल परंतु तुम्ही तुमचा स्वाभिमान कधीही गमावू नये.’ असं देखील अभिनेता म्हणाला…

ऐश्वर्या राय – विवेक ओबेरॉय

सांगायचं झालं तर, सिनेमाच्या शुटिंग दरम्यान विवेक ओबेरॉय आणि ऐश्वर्या यांच्यामध्ये प्रेम बहरलं. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. दोघांच्या नात्याचा अंत देखील फार वाईट झाला. विवेकने तर प्रेस कॉन्फ्रेंस घेत सलमान खानवर गंभीर आरोप केले होते. ऐश्वर्या राय आणि सलमान खान

‘हम दिल दे चुके सनम’ सिनेमाच्या शुटिंग दरम्यान समलान आणि ऐश्वर्या यांच्यामध्ये प्रेम बहरलं. अनेक वर्ष सलमान आणि ऐश्वर्या एकत्र होते. पण दोघांचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. आज दोघेही त्यांच्या आयुष्यात आनंदी आहेत. पण त्यांच्या रिलेशनलशिपच्या आजही चाहत्यांमध्ये रंगलेल्या असतात.

Follow Us
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार.
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण.
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक...
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक....
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल.
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण.
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?.
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी.
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी.
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?.
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण.