AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुझ्याशिवाय या भिंतींना अर्थ नाही..; पत्नीसाठी विवेक ओबेरॉयची खास पोस्ट

अभिनेता विवेक ओबेरॉय आणि प्रियांका अल्वा यांच्या लग्नाला 14 वर्षे पूर्ण झाली आहे. यानिमित्त विवेकने सोशल मीडियावर पत्नीसाठी खास पोस्ट लिहिली आहे. दिवाळीनिमित्त विवेकने नवीन घर विकत घेतलं. याच घरातील फोटो त्याने पोस्ट केला आहे.

तुझ्याशिवाय या भिंतींना अर्थ नाही..; पत्नीसाठी विवेक ओबेरॉयची खास पोस्ट
विवेक ओबेरॉय आणि त्याची पत्नी प्रियांकाImage Credit source: Instagram
| Updated on: Oct 31, 2024 | 2:29 PM
Share

अभिनेता विवेक ओबेरॉयच्या लग्नाला 14 वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त त्याने पत्नीसाठी सोशल मीडियावर खास पोस्ट लिहिली आहे. विवेकने दिवाळीनिमित्त नवीन घर घेतलं असून याच घरातील पत्नीसोबतचा फोटो त्याने इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. या फोटोसोबतच त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. विवेकच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिनेता आर. माधवननेही विवेकला नवीन घर घेतल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.

विवेक ओबेरॉयची पत्नीसाठी पोस्ट-

’14 वर्षांपूर्वी मी अग्नीच्या साक्षीने तुझ्यावर अखंड प्रेम करण्याचं वचन दिलं होतं. आज धनत्रयोदशीच्या शुभ दिवशी मोठ्यांच्या आशीर्वादाने आपण आपल्या सुंदर नवीन घरात जात असताना, मी देवाचे खूप मनापासून आभार मानतो. तुझ्याशिवाय या आलिशान भिंतींना काही अर्थ नाही. माझ्यासाठी तू माझं चिरंतन घर आहेस आणि तिथेच माझं हृदय आहे. तुझ्यावर नेहमीच माझं प्रेम असेल, लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा,’ अशा शब्दांत विवेकने भावना व्यक्त केल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by Vivek Oberoi (@vivekoberoi)

विवेकचं अभिनेत्री ऐश्वर्या रायसोबतचं अफेअर जगजाहीर होतं. मात्र या दोघांच्या नात्याचा शेवट गोड होऊ शकला नाही. ब्रेकअपनंतर विवेकला दुसरं कोणाशीच लग्न करायचं नव्हतं. मात्र फ्लोरेन्समधील त्या एका संध्याकाळने सर्वकाही बदललं आणि तिथेच विवेक त्याची भावी पत्नी प्रियांका अल्वाला भेटला. पहिल्या भेटीच्या 48 तासांत प्रियांकाच आपली आयुष्यभराची जोडीदार होईल, याचा निर्णय विवेकने घेतला होता. एका मुलाखतीत विवेकने त्याच्या लग्नाची गोष्ट सांगितली होती. आयुष्यातील सर्वांत वाईट हृदयभंग अनुभवल्यानंतर विवेकला पुन्हा त्याच्याजवळ कोणालाच येऊ द्यायचं नव्हतं. मात्र प्रियांकाचा फोटो पाहिल्यानंतर त्याच्यासाठी सर्वकाही बदललं.

पहिल्या भेटीतच विवेकला प्रियांका आवडली होती. याच भेटीत दोघांमध्ये चांगली मैत्री झाली आणि ते तासनतान एकमेकांशी गप्पा मारू लागले होते. विवेक प्रियांकासोबतच्या गप्पांमध्ये इतका रमला होता की त्याची भारतात येणारी फ्लाइटसुद्धा चुकली होती. भेटीनंतर प्रियांकाने तिच्या हॉटेलपर्यंत सोडलं आणि त्याठिकाणी तो तिच्या कुटुंबीयांशी भेटला. दुसऱ्या दिवशी विवेकने प्रियांकाला तिच्याशीच लग्न करण्याचा निर्णय सांगितला. “मी माझ्या आयुष्यात जर कधी लग्न करण्याचा निर्णय घेतला, तर तो तुझ्याशीच करेन. जर मी तुझ्याशी लग्न केलं नाही तर कोणाशीच करणार नाही. बाकी तुझा निर्णय आहे. तू तुझा वेळ घे आणि मला कळव”, असं विवेकने सांगितलं होतं.

Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.