AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vivek Oberoi : ऐश्वर्याला विवेक ओबेरॉयचा अप्रत्यक्ष टोमणा; म्हणाला “मी कधीच कमिटमेंट देऊन..”

अभिनेता विवेक ओबेरॉय आणि ऐश्वर्या राय यांचं अफेअर जगजाहीर होतं. त्यांची लव्हस्टोरी जितकी चर्चेत होती, त्यापेक्षा अधिक चर्चा त्यांच्या ब्रेकअपची झाली होती. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत विवेक त्याच्या एक्स गर्लफ्रेंड्सबद्दल मोकळेपणे व्यक्त झाला.

Vivek Oberoi : ऐश्वर्याला विवेक ओबेरॉयचा अप्रत्यक्ष टोमणा; म्हणाला मी कधीच कमिटमेंट देऊन..
Aishwarya Rai and Vivek OberoiImage Credit source: Instagram
| Updated on: Jan 15, 2025 | 3:11 PM
Share

मुंबई | 20 ऑक्टोबर 2023 : अभिनेता विवेक ओबेरॉय आणि ऐश्वर्या राय बच्चन यांचं अफेअर जगजाहीर होतं. या दोघांचं अफेअर जितकं चर्चेत होतं, त्याहीपेक्षा जास्त त्यांच्या ब्रेकअपची चर्चा झाली. विविध मुलाखतींमध्ये विवेक याविषयी अनेकदा व्यक्त झाला होता. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत विवेक त्याच्या भूतकाळातील रिलेशनशिप्सबद्दल मोकळेपणे व्यक्त झाला. विवेकने ऑक्टोबर 2010 मध्ये कर्नाटकचे मंत्री जीवराज अल्वा यांची कन्या प्रियांका अल्वाशी लग्न केलं. लग्नापूर्वी विवेक केवळ ऐश्वर्यासोबतच नाही तर इतरही काही जणींसोबत रिलेशनशिपमध्ये होता. मात्र ब्रेकअपनंतर त्यांच्याशी चांगली मैत्री जपल्याचं विवेकने या मुलाखतीत सांगितलं. इतकंच नव्हे तर लग्नात माझ्या एक्स गर्लफ्रेंड्सनीही हजेरी लावली होती, असंही तो म्हणाला. या मुलाखतीत विवेकने अप्रत्यक्षरित्या ऐश्वर्याला टोमणासुद्धा लगावला.

“तो माझ्या अहंकारासाठी मोठा धक्का होता. पण मी कधीच अप्रामाणिक नव्हतो. मी एखादीला नात्यात वचन देऊन सहज सोडणारा नाही. त्यापेक्षा मी स्पष्ट त्यांना सांगेन की मला सध्या गंभीर रिलेशनशिप नकोय. मी माझ्या बऱ्याच कॅज्युअल गर्लफ्रेंड्ससोबत ब्रेकअपनंतरही मित्र म्हणून राहिलो. त्यांच्यापैकी बऱ्याच जणी माझ्या लग्नालाही आल्या होत्या. प्रत्येक नातं तुम्हाला काहीतरी शिकवतं, तुमच्यासोबत ते नातं एखादी गोष्ट सोडून जातं. अत्यंत वाईट ब्रेकअप आणि विषारी नातेसंबंध तुम्हाला तुमचे पॅटर्न्स शिकवतात. तुम्ही कशापासून दूर राहिलं पाहिजे, हे ते शिकवतात”, असं विवेक म्हणाला.

View this post on Instagram

A post shared by Vivek Oberoi (@vivekoberoi)

विवेक ओबेरॉयने राम गोपाल वर्माच्या ‘कंपनी’ या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली. चित्रपटांमध्ये काम करताना तो ऐश्वर्या रायच्या प्रेमात पडला. मात्र ऐश्वर्याचं सलमान खानसोबतचं भूतकाळातील नातं हे विवेकसाठी त्रासदायक ठरलं होतं. विवेक आणि ऐश्वर्याने ‘क्यूँ हो गया ना’ या चित्रपटात काम केलं होतं. सलमानपासून दूर झालेली ऐश्वर्या या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान विवेकच्या जवळ आली होती. या दोघांच्या अफेअरची चर्चा संपूर्ण इंडस्ट्रीत होती. मात्र अचानक एकदा विवेकने सर्वांसमोर येऊन खुलासा केला की सलमान त्याला धमक्या देत आहे. अखेर ऐश्वर्यासोबतचं त्याचं नातं फार काळ टिकलं नाही. 2005 मध्ये या दोघांचा ब्रेकअप झाला.

2010 मध्ये विवेकने प्रियांकाशी लग्न केलं. हा लग्नसोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला होता. या दोघांना वियान वीर ओबेरॉय हा मुलगा आणि अमेया निर्वाणा ओबेरॉय ही मुलगी आहे.

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.