AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Adipurush | ‘हनुमानजी बहिरे होते का?’; ओम राऊत यांच्या ट्विटवरून भडकले नेटकरी

ओम राऊत यांचं हे जुनं ट्विट पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावरून नेटकरी बरीच टीका करत आहेत. 'या गोष्टीचा सूट आदिपुरुषसारखा चित्रपट बनवून घेणार का', असा उपरोधिक सवाल एका युजरने केला.

Adipurush | 'हनुमानजी बहिरे होते का?'; ओम राऊत यांच्या ट्विटवरून भडकले नेटकरी
Om Raut tweet about HanumanImage Credit source: Instagram
| Updated on: Jun 18, 2023 | 11:19 AM
Share

मुंबई : ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर नेटकऱ्यांमध्ये नाराजी वाढताना दिसून येत आहे. या चित्रपटातील प्रत्येक पात्राला चुकीच्या पद्धतीने दाखवल्याचा आरोप काही जण करत आहेत. इतकंच नव्हे तर त्यातील डायलॉग्सचीही खिल्ली उडवली जात आहे. ‘आदिपुरुष’ या चित्रपटावरून नवा वाद सुरू झाला असतानाच आता दिग्दर्शक ओम राऊत यांचं ट्विट चर्चेत आलं आहे. हनुमान जयंतीनिमित्त त्यांनी हे ट्विट केलं होतं. मात्र आता पुन्हा एकदा व्हायरल झाल्यानंतर त्यांनी ते ट्विट डिलिट केलं आहे. तोपर्यंत ओम राऊत यांच्या वादग्रस्त ट्विटचा स्क्रीनशॉट ट्विटरवर चांगलाच व्हायरल झाला होता. त्यांचं हे ट्विट 4 एप्रिल 2015 मधील आहे. यादिवशी हनुमान जयंती होती.

हनुमान जयंतीनिमित्त वाजवल्या जाणाऱ्या गाण्यांवरून त्यांनी हे ट्विट केलं होतं, त्यात त्यांनी लिहिलं होतं, ‘हनुमानजी बहिरे आहेत का? माझ्या इमारतीतील लोकांना कदाचित हेच वाटतंय. हनुमान जयंतीनिमित्त हे लोकं मोठमोठ्या आवाजात गाणी वाजवत आहेत. इतकंच नव्हे तर जयंतीशी या गाण्याचा काहीच संबंध नाही.’ ओम राऊत यांचं हे जुनं ट्विट पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावरून नेटकरी बरीच टीका करत आहेत. ‘या गोष्टीचा सूट आदिपुरुषसारखा चित्रपट बनवून घेणार का’, असा उपरोधिक सवाल एका युजरने केला. तर अनेकांनी या ट्विटचा स्क्रीनशॉट शेअर करत ओम राऊत यांच्यावर राग व्यक्त केला आहे.

पहा ट्विट-

एकीकडे ओम राऊत यांचं हनुमानाविषयीचं हे ट्विट व्हायरल होत असून दुसरीकडे ‘आदिपुरुष’मध्ये हनुमानाच्या तोंडी असलेल्या डायलॉगची खिल्ली उडवली जातेय. “कपडा तेरे बाप का, आग तेरे बाप की, तेल तेरे बाप का, जलेगी भी तेरी बाप की”, असा हा डायलॉग आहे. हा संवाद लिहिताना काही चूक झाली का, असं विचारलं असता मनोज मुंतशीर म्हणाले, “ही चूक नाही. अत्यंत सूक्ष्म विचारप्रक्रियेतनंतरच बजरंग बली आणि सर्व पात्रांसाठी डायलॉग लिहिण्यात आले आहेत. आम्ही जाणूनबुजून ते डायलॉग सोप्या भाषेत लिहिले आहेत. कारण आपल्याला एक गोष्ट समजून घेणं आवश्यक आहे की जर चित्रपटात अनेक पात्रं असतील तर प्रत्येकाची भाषा एकाच प्रकारची असू शकत नाही. प्रत्येक पात्राच्या भाषेत विविधता आणावी लागते.”

तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.
अजितदादांचा अंत्यविधी सुरु असताना... तटकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण
अजितदादांचा अंत्यविधी सुरु असताना... तटकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण.
सुनेत्रा पवारांच्या पाठीशी केंद्राची ताकद; तटकरे यांचे मोठे विधान
सुनेत्रा पवारांच्या पाठीशी केंद्राची ताकद; तटकरे यांचे मोठे विधान.
राज ठाकरेंनी घाबरू नये, भगतसिंह कोश्यारींच्या विधानाची चर्चा!
राज ठाकरेंनी घाबरू नये, भगतसिंह कोश्यारींच्या विधानाची चर्चा!.
रोहित पवारांच्या घातपाताच्या दाव्यानंतर मोठ्या घडामोडी, DGCA चे पथक...
रोहित पवारांच्या घातपाताच्या दाव्यानंतर मोठ्या घडामोडी, DGCA चे पथक....