AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाना पाटेकर अशा अवस्थेत पोहोचले होते प्रसिद्ध अभिनेत्याच्या घरी, ‘ती’ घटना अनेक वर्षांनी समोर

Nana Patekar | नाना पाटेकर जुनी आठवण सांगत झाले भावूक, अशा अवस्थेत पोहोचले प्रसिद्ध अभिनेत्याच्या घरी, त्यानंतर जे काही झालं, ते अनेक वर्षांनंतर समोर..., नाना पाटेकर कायम त्यांच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे असतात चर्चेत...

नाना पाटेकर अशा अवस्थेत पोहोचले होते प्रसिद्ध अभिनेत्याच्या घरी, 'ती' घटना अनेक वर्षांनी समोर
| Updated on: Jun 23, 2024 | 8:10 AM
Share

झगमगत्या विश्वातील प्रसिद्ध, लोकप्रिय आणि दिग्गज अभिनेत्यांच्या यादीत नाना पाटेकर यांचं नाव अव्वल स्थानी आहे. नाना पाटेकर यांचं अभिनय, त्यांचा डायलॉग बोलण्याचा अंदाज, विनोदबुद्धी… इत्यादी गोष्टी चाहत्यांना प्रचंड आवडतात. नाना पाटेकर यांनी अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आज नाना यांना कोणत्याच ओळखीची गरज नाही. त्यांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहते देखील नाना पाटेकर यांच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात.

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत नाना पाटेकर यांनी एक जुना किस्सा सांगितला आहे. एकदा नाना पाटेकर पूर्ण भिजलेल्या अवस्थेत दिवंगत अभिनेते दिलीप कुमार यांच्या घरी पोहोचले होते. दिलीप कुमार यांच्या घरी पोहोचल्यानंतर जे काही झालं ते नाना पाटेकर यांनी अनेक वर्षांनंतर सांगितलं.

नाना पाटेकर म्हणाले, ‘मुसळधार पाऊस पडत होता. भिजलेल्या अवस्थेत दिलीप कुमार यांच्या घरी पोहोचलो. घरी पोहोचल्यानंतर त्यांनी मला टॉवेल दिला. स्वतःचा कुर्ता मला घालायला दिला. त्यांनी स्वतः माझे ओले झालेले केस पुसले आणि कपडे बदलायला सांगितले…’

पुढे नाना पाटेकर सत्यजीत रे यांच्या एका डायरीचा उल्लेख करत म्हणाले, सत्यजीत रे यांची एक डायरी होती. त्या डायरीमध्ये  दिलीप कुमार यांचं एक पान होतं. त्या डायरीमध्ये दिलीप कुमार यांनी नाना पाटेकर यांच्यासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती.

यावर नाना म्हणाले, ‘तुम्हाला दुसरा कोणता पुरस्कार हवा आहे…? माझ्याकडे काम करण्याची लायकी नाही, पण त्यांना माझ्यासोबत काम करावसं वाटलं. यापेक्षा अधिक अजून काय हवं आहे. मी खूप भाग्यशाली आहे…’ असं देखील नाना पाटेकर म्हणाले.

सांगायचं झालं तर, एक काळ असा होता जेव्हा बॉलिवूड आणि चाहत्यांच्या मनावर नाना पाटेकर यांचं राज्य होतं. ‘क्रांतीवीर’, ‘नटसम्राट’, ‘परिंदा’, ‘वजूद’, ‘टॅक्सी नं. 9 2 11’, ‘वेलकम’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांनी महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आजही चाहते नाना पाटेकर यांच्या आगामी सिनेमांच्या प्रतीक्षेत असतात. सध्या सर्वत्र नाना पाटेकर यांची चर्चा रंगली आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.