AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ranveer Singh याच्या अडचणीत मोठी वाढ; कोरोना महामारीनंतर अभिनेत्याचे वाईट दिवस सुरु?

कोरोना महामारीनंतर 'या' कारणामुळे रणवीर सिंग याच्या अडचणीत मोठी वाढ; बॉलिवूडच्या प्रसिद्ध व्यक्तीने देखील सोडली अभिनेत्याची साथ... , सर्वत्र अभिनेत्याचीच चर्चा...

Ranveer Singh याच्या अडचणीत मोठी वाढ; कोरोना महामारीनंतर अभिनेत्याचे वाईट दिवस सुरु?
| Updated on: Apr 16, 2023 | 4:08 PM
Share

मुंबई : ‘बाजीराव मस्तानी’, ‘पद्मावत’, ‘गली बॉय’ आणि ‘गोलियो की रासलीलाः रामलीला’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये मुख्य भूमिका साकारत अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) याने चाहत्यांच्या मनात घर केलं. अभिनेता कायम त्यच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतो. गेल्या अनेक वर्षांपासून एकापेक्षा एक सिनेमात झळकणाऱ्या रणवीर याचे सिनेमे आता बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरताना दिसत आहेत. कोरोना महामारीनंतर रणवीरच्या एकाही सिनेमाने प्रेक्षकांचं मनोरंजन केलेलं नाही. कोरोना महामारीनंतर २०२१ मध्ये क्रिकेटचे माजी कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांच्या बायोपिकमध्ये अभिनेता झळकला. ‘ 83’ सिनेमानंतर रणवीर ‘जयेशभाई जोरदार’ (2022) सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आला. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर फक्त १६ कोटी रुपयांचा गल्ला जमा केला.

रणवीर स्टारर ‘सर्कस’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर फक्त आणि फक्त ३५.६५ रुपयांचा गल्ला जमा केला. सिनेमाला प्रेक्षकांकडून हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. कोरोनातंर अभिनेत्याचे तीन सिनेमे अपयशी ठरले. रणवीर स्टारर प्रत्येक सिनेमाला येणार अपयश पाहाता यश राज फिल्म्स (YRF)ने रणवीरसोबत काही काळ काम न करण्याचा निर्णय घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यश राज फिल्म्समध्ये आदित्य चोप्रा आणि त्याच्या टीमने ‘स्पाय यूनिव्हर्स’मध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. ज्यामुळे यश राज फिल्म्स कोणत्याही प्रकारचा धोका पत्कारायचा नाही. महत्त्वाचं म्हणजे, अभिनेता शाहरुख खान स्टारर ‘पठाण’ सिनेमाला मिळालेल्या यशानंतर यश राज फिल्म्सना कोणतीही चूक करायची नाही.

यश राज फिल्म्सच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘प्रत्येक सिनेमाचं बजेट खूप मोठे असणार आहे आणि त्यामुळे त्रुटीसाठी जागा असू शकत नाही. म्हणून यश राज फिल्म्स (YRF)ने रणवीरसोबत काही काळ काम न करण्याचा निर्णय घेतला आहे.’ यश राज फिल्म्स (YRF)ने घेतलेल्या निर्णयामुळे रणवीरच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झाली आहे.

रणवीरने यश राज फिल्म्स (YRF)सोबत जवळपास सहा सिनेमांमध्ये काम केलं आहे. ‘बँड बाजा बारात’, ‘लेडीज वर्सेज रिकी बहल’ (२०११), ‘बेफिक्रे’ (२०१६), गुंडे (२०१४), किल दिल (२०१४) आणि जयेशभाई जोरदार यश राज फिल्म्सच्या या सिनेमांमध्ये रणवीरने मुख्य भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं, पण काही सिनेमे बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरले.

Follow Us
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...
राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार? पुण्यातील गुप्त बैठकीत नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार? पुण्यातील गुप्त बैठकीत नेमकं काय घडलं?.