AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नितीशकुमार हे शरद पवारांसारखे; सहजासहजी कुणाच्या हाती लागणार नाहीत: राऊत

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासारखे आहेत. ते सहजासहजी कुणाच्या हाताला लागणार नाहीत, असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. (sanjay raut reaction on nitish kumar politics)

नितीशकुमार हे शरद पवारांसारखे; सहजासहजी कुणाच्या हाती लागणार नाहीत: राऊत
| Updated on: Nov 13, 2020 | 7:49 PM
Share

मुंबई: बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून आता बिहारमध्ये सत्ता स्थापन्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. जास्तीत जास्त मंत्रिपदं पदरात पाडून घेण्यासाठी आणि नितीशकुमार सरकारवर नियंत्रण ठेवण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. यापार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी बिहारच्या राजकीय घडामोडींवर मार्मिक भाष्य केलं आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासारखे आहेत. ते सहजासहजी कुणाच्या हाताला लागणार नाहीत, असं मत शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे. (sanjay raut reaction on nitish kumar politics)

मुख्यमंत्री नितीशकुमार हे एनडीएमधून बाहेर पडत असतील तर त्यांना भाजपकडून रोखलं जाऊ शकणार नाही का?, असा सवाल संजय राऊत यांना विचारण्यात आला. त्यावर असं कोणी कुणाला थांबवत नाही. सरकार चालवत असताना नितीशकुमारांनी सरकार म्हणून घेतलेले काही निर्णय अंडरस्कॅनिंग असतील किंवा त्यांच्या काही फायली अंडरस्कॅनिंग असतील असं तुम्हाला वाटत असेल… पण नितीशकुमार हे काही प्रमाणात शरद पवारांसारखेच आहेत. ते सहजासहजी कुणाच्या हाती लागणार नाहीत. राज्य चालवताना काही निर्णय घ्यावे लागतात. त्यामुळे त्यात भ्रष्टाचारच झालाय असं म्हणणं योग्य ठरणार नाही. पण तरीही असं जर कुणाला काही वाटत असेल तर त्यांनी त्यांच्या राज्यकारभाराविषयी आत्मचिंतनच केलं पाहिजे, असं राऊत म्हणाले.

सध्याचं बिहारमधील एनडीएचं सरकार हे बहुमताच्या काठावरचं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीपासून सर्व केंद्रीय मंत्र्यांनी बिहारमध्ये प्रचार केला. पण त्यांना दोनचंच बहुमत मिळलं. त्यामुळे कितीही जुळवाजुळव केली तरी नव्या सरकारला टेकू मिळत नाही, तोपर्यंत सरकार टिकणार नाही, असं सांगतानाच राष्ट्रपती राजवट लागू करणं हा भाजपचा छंद आहे. तो ते अशावेळी पूर्ण करतील, असा टोलाही त्यांनी लगावला.

म्हणून आम्हालाही जागा मिळाल्या नाही

बिहार विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांना नोटापेक्षाही कमी मतदान झालं. त्यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. चिराग पासवान यांचा लोजपा हा जुना पक्ष आहे. तरीही त्यांचा एकच आमदार निवडून आला. पप्पू यादव हे बिहारमधील मोठे नेते आहेत. त्यांचाही पराभव झाला आणि त्यांच्या पक्षालाही जागा मिळाल्या नाहीत. त्यामुळे आम्हालाही जागा मिळाल्या नाहीत, असं सांगतानाच तेजस्वी यादव हे तरुण नेते आहेत. राजदची धुरा ते सक्षमपणे सांभाळत आहेत. या तरुण नेतृत्वाला मदत करणं हा आमचा हेतू होता. राज्यात परिवर्तन होत असताना त्यात मिठाचा खडा टाकावा असं आम्हाला वाटत नव्हतं, असंही राऊत यांनी सांगितलं.

भाजपच्यासोबत सत्ता स्थापन केल्यास त्यांना भाजपचं मांडलिक होऊन राहावं लागेल आणि तो त्यांच्या स्वभावाचा भाग नाही. नितीशकुमार अस्वस्थ असतात तेव्हा ते पटकन निर्णय घेऊन मोकळे होतात. त्यामुळे बिहारमध्ये कधीही राजकीय भूकंप येऊ शकतो, असं राऊत म्हणाले. नितीशकुमारांनी माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांना दगा दिला. राजद नेते लालूप्रसाद यादव यांनीही दगा दिला होता. एनडीएलाही त्यांनी दगा दिला होता. त्यामुळे ते काय करतील याची काहीही शाश्वती देता येत नाही, असं राऊत यांनी स्पष्ट केलं.

लोजपाचे नेते चिराग पासवान हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप नेते अमित शहा यांच्या शब्दाबाहेर असतील असं वाटत नाही. एवढ्या मोठ्या केंद्रीय सत्तेला पासवान यांना आवर घालणं शक्य नव्हतं असं कोण म्हणेल? मोदी-शहांनी मनात आणलं असतं तर पासवान यांचं बंड मोडून काढलं असतं. त्यांनी तसं केलं नाही. त्यामुळे पासवान यांनी नितीशकुमारांचं 20 जागांवर नुकसान केलं. त्यामुळे नितीशकुमार बिहारमध्ये तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेले, असं राऊत यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

बिहारमध्ये राजकीय हालचाली वाढल्या; मंत्रिमंडळ बरखास्त करण्याची शिफारस, नवं सरकार स्थापन करण्यासाठी नितीशकुमार यांची लगबग

राजकीय संन्यास घेण्याचं बोललोच नाही, नितीश कुमारांची कोलांट उडी

महाराष्ट्रात ‘लोटस’चं पीक येणार नाही; बिहारमध्ये भूकंप होऊ शकतो: संजय राऊत

(sanjay raut reaction on nitish kumar politics)

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी.

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी

Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!.

Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ.

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ

दिल्लीच्या आंदोलनावेळी कॉकरोच जनता पार्टीचे इन्स्टाग्राम सस्पेंड, पुढच्या क्षणात रिकव्हर, नेमकं काय घडलं?.

दिल्लीच्या आंदोलनावेळी कॉकरोच जनता पार्टीचे इन्स्टाग्राम सस्पेंड, पुढच्या क्षणात रिकव्हर, नेमकं काय घडलं?

मोदींचा घातपात करण्याचा कट होता का? एकनाथ शिंदे यांचा राहुल गांधींना सवाल.

मोदींचा घातपात करण्याचा कट होता का? एकनाथ शिंदे यांचा राहुल गांधींना सवाल

ICC Ranking: वनडेत गिलचं अव्वल स्थान 1 गुणाने हुकलं, मालिका पराभव आणि इतक्या धावांमुळे नुकसान.

ICC Ranking: वनडेत गिलचं अव्वल स्थान 1 गुणाने हुकलं, मालिका पराभव आणि इतक्या धावांमुळे नुकसान