AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रात ‘लोटस’चं पीक येणार नाही; बिहारमध्ये भूकंप होऊ शकतो: संजय राऊत

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे जेव्हा अस्वस्थ असतात तेव्हा पटकन निर्णय घेऊन मोकळे होतात. शिवाय दगाफटका करण्यात ते माहिर आहेत. त्यामुळे बिहारमध्ये केव्हाही राजकीय भूकंप होऊ शकतो, असं भाकीत शिवसेना नेते संजय राऊत यांनी वर्तवलं आहे. (political earthquake soon in bihar: sanjay raut)

महाराष्ट्रात 'लोटस'चं पीक येणार नाही; बिहारमध्ये भूकंप होऊ शकतो: संजय राऊत
| Updated on: Nov 13, 2020 | 6:23 PM
Share

मुंबई: बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे जेव्हा अस्वस्थ असतात तेव्हा पटकन निर्णय घेऊन मोकळे होतात. शिवाय दगाफटका करण्यात ते माहिर आहेत. त्यामुळे बिहारमध्ये केव्हाही राजकीय भूकंप होऊ शकतो, असं भाकीत वर्तवतानाच राज्यात ऑपरेशन लोटसचं पीक येणार नाही, असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. (political earthquake soon in bihar: sanjay raut)

‘टीव्ही 9 मराठी’शी खास संवाद साधताना संजय राऊत यांनी बिहार निवडणूक निकालापासून ते ऑपरेशन लोटसपर्यंतच्या विविध प्रश्नांवर मोकळीढाकळी मते मांडली. ही मते मांडतानाच अधूनमधून भाजपला फटकारेही लगावले. भाजपसोबत सत्ता स्थापन केल्यास नितीशकुमारांना भाजपचं मांडलिक होऊन राहावं लागेल आणि तो त्यांच्या स्वभावाचा भाग नाही. नितीशकुमार अस्वस्थ असतात तेव्हा ते निर्णय घेऊन मोकळे होतात. त्यामुळे बिहारमध्ये कधीही राजकीय भूकंप येऊ शकतो, असं राऊत म्हणाले. नितीशकुमारांनी माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांना दगा दिला. राजद नेते लालूप्रसाद यादव यांनाही दगा दिला होता. एनडीएलाही त्यांनी दगा दिला होता. त्यामुळे ते काय करतील याची काहीही शाश्वती देता येत नाही, असं राऊत यांनी सांगितलं.

लोजपाचे नेते चिराग पासवान हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप नेते अमित शहा यांच्या शब्दाबाहेर असतील असं वाटत नाही. एवढ्या मोठ्या केंद्रीय सत्तेला पासवान यांना आवर घालणं शक्य नव्हतं असं कोण म्हणेल? मोदी-शहांनी मनात आणलं असतं तर पासवान यांचं बंड मोडून काढलं असतं. त्यांनी तसं केलं नाही. त्यामुळे पासवान यांनी नितीशकुमारांचं 20 जागांवर नुकसान केलं. त्यामुळे नितीशकुमार बिहारमध्ये तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेले, असं राऊत यांनी सांगितलं.

ऑपरेशन लोटस होणार नाही

बिहार निवडणुकीनंतर आता राज्यात ऑपरेशन लोटस होणार असल्याचं बोललं जात आहे. भाजप नेते नारायण राणे यांनीही ऑपरेशन लोटस शंभर टक्के होणार असल्याचं सांगितलं आहे. त्यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. हा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रात ऑपरेशन लोटसचं पीक येणार नाही. आमचं सरकार 5 वर्षे व्यवस्थित चालेल, असा दावा त्यांनी केला.

एमआयएमचा वापर कोण करतं हे सर्वांना माहीत

एमआयएममुळे काँग्रेस-आरजेडीला सर्वाधिक फटका बसल्याचं राजकीय जाणकार सांगत आहेत, त्याबाबत तुमचं निरीक्षण काय आहे? असं राऊत यांना विचारण्यात आलं. त्यावर एमआयएम कुणासाठी काम करते. त्यांचा वापर कोण करतं. हे जगजाहीर आहे. सर्वांना माहीत आहे. त्यामुळे त्यावर बोलण्यात अर्थ नाही, असं राऊत म्हणाले.

संबंधित बातम्या:

बिहारमध्ये दुसऱ्याची बायको पळवून आणली, राज्यात अक्षता पडायच्या आधीच नवरी पळाली, वडेट्टीवारांचा दानवेंना टोला

नितीश कुमार यांचं मुख्यमंत्रिपद जवळपास निश्चित, पण आव्हानांचा डोंगर समोर, नेमकी कोणती आव्हानं?

राजकीय संन्यास घेण्याचं बोललोच नाही, नितीश कुमारांची कोलांट उडी

(political earthquake soon in bihar: sanjay raut)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...