राजकीय संन्यास घेण्याचं बोललोच नाही, नितीश कुमारांची कोलांट उडी

"मी निवृत्तीबद्दल बोललो नाही, प्रत्येक निवडणुकीच्या शेवटच्या रॅलीत मी हेच म्हणतो" असं नितीश कुमार यांनी स्पष्ट केलं

राजकीय संन्यास घेण्याचं बोललोच नाही, नितीश कुमारांची कोलांट उडी
Follow us
| Updated on: Nov 13, 2020 | 2:13 PM

पाटणा : ‘ही आपली अखेरची निवडणूक’ असं भावनिक आवाहन करणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Bihar Chief Minister Nitish Kumar) यांनी कोलांटउडी घेतली आहे. नजीकच्या काळात राजकीय संन्यास घेण्याचा आपला कोणताही इरादा नाही, आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यास आला, असं म्हणत नितीश यांनी यूटर्न घेतला. (Nitish Kumar Clarifies Recent Comment about retirement)

“मी निवृत्तीबद्दल बोललो नाही… मी प्रत्येक निवडणुकीच्या शेवटच्या रॅलीत नेहमी हेच म्हणतो.. अंत भला तो सब भला (शेवट गोड तर सारं गोड) तुम्ही माझं भाषण संपूर्ण ऐकलं, तर तुम्हाला संदर्भ लागेल आणि सर्व स्पष्ट होईल” असं नितीश कुमार यांनी ‘एएनआय’शी बोलताना सांगितलं.

बिहारच्या पूर्णियामध्ये जेडीयू उमेदवाराचा प्रचार करताना नितीश कुमार यांनी भावनिक साद घातली होती “निवडणुकीचा आज अखेरचा दिवस आहे. यानंतर निवडणुका संपतील आणि ही माझी अखेरची निवडणूक आहे. अंत भला तो सब भला” असं नितीश म्हणाले होते.

नितीश कुमार यांची राजकीय वाटचाल

नितीश कुमार हे आतापर्यंत सहा वेळा बिहारचे मुख्यमंत्री राहिले असून यावेळी ते सातव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. नितीश कुमार यांनी 2004 मध्ये शेवटची निवडणूक लढवली होती. ज्यात त्यांनी नालंदामधून विजय मिळवला होता. त्यानंतर नितीश कुमार यांनी कोणतीही निवडणूक लढवली नाही. 2005 मध्ये नितीश कुमार NDA ची सत्ता आल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री बनले. त्यांनी खासदारकीचा राजीनामा देत बिहार विधान परिषदेचे सदस्यता स्वीकारली.

नितीश कुमार यांनी 1977 मध्ये आपली पहिली निवडणूक लढवली होती. त्यांनी नालंदाच्या हरनौत मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यानंतर त्यांनी 4 वेळा निवडणूक लढली. त्यात 1977 आणि 1980 मध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. तर 1985 आणि 1995 च्या निवडणुकीत ते विजयी झाले होते. (Nitish Kumar Clarifies Recent Comment about retirement)

नितीश कुमार यांनी 1972 मध्ये बिहार इंजीनिअर कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केले. त्यांनी काही काळ बिहार स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्डात नोकरीही केली होती. मात्र, जयप्रकाश नारायण, राम मनोहर लोहियांसारख्या नेत्यांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला.

संबंधित बातम्या :

‘ही माझी शेवटची निवडणूक!’, मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याकडून राजकीय संन्यासाची घोषणा

भाजपचे नित्यानंद राय मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत, नितीश कुमार केंद्रात जाणार?

(Nitish Kumar Clarifies Recent Comment about retirement)

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.