AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BREAKING | ‘ही माझी शेवटची निवडणूक!’, मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याकडून राजकीय संन्यासाची घोषणा

बिहार विधानसभा निवडणुकीच्या शेटवच्या टप्प्यातील प्रचार आज थंडावला. यावेळी धमदाहामध्ये आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी गेलेल्या नितीश कुमार यांनी जाहीर सभेत राजकीय संन्यासाची घोषणाच करुन टाकली.

BREAKING | 'ही माझी शेवटची निवडणूक!', मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याकडून राजकीय संन्यासाची घोषणा
sagar joshi
sagar joshi | Updated on: Nov 05, 2020 | 5:36 PM
Share

पाटना: बिहार विधानसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ही आपली शेवटची निवडणूक असल्याचं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे नितीश कुमार यांनी राजकीय संन्यास घेण्याचीच घोषणा केल्याची चर्चा आता राष्ट्रीय राजकारणात सुरु झाली आहे. धमदाहामधील आपल्या उमेदवाराच्या प्रचारसभेत बोलताना नितीश कुमार यांनी ही घोषणा केली आहे. (Bihar assembly election 2020: Nitish kumar announce this is my last election!)

बिहार विधानसभा निवडणुकीच्या शेटवच्या टप्प्यातील प्रचार आज थंडावला. यावेळी धमदाहामध्ये आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी गेलेल्या नितीश कुमार यांनी जाहीर सभेत राजकीय संन्यासाची घोषणाच करुन टाकली. “आज तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. आता परवा मतदान आहे आणि ही माझी शेवटची निवडणूक आहे. अंत भला तो सब भला”, असं वक्तव्य नितीश कुमार यांनी केलं.

नितीश कुमार यांची राजकीय वाटचाल

नितीश कुमार हे ६ वेळा बिहारचे मुख्यमंत्री राहिले आहेत. नितीश कुमार यांनी 2004 मध्ये शेवटची निवडणूक लढवली होती. ज्यात त्यांनी नालंदामधून विजय मिळवला होता. त्यानंतर नितीश कुमार यांनी कोणतीही निवडणूक लढवली नाही. 2005 मध्ये नितीश कुमार NDAची सत्ता आल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री बनले. त्यांनी खासदारकीचा राजीनामा देत बिहार विधान परिषदेचे सदस्यता स्वीकारली.

नितीश कुमार यांनी 1977 मध्ये आपली पहिली निवडणूक लढवली होती. त्यांनी नालंदाच्या हरनौत मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यानंतर त्यांनी 4 वेळा निवडणूक लढली. त्यात 1977 आणि 1980 मध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. तर 1985 आणि 1995 च्या निवडणुकीत ते विजयी झाले होते.

नितीश कुमार यांनी 1972 मध्ये बिहार इंजीनिअर कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केले. त्यांनी काही काळ बिहार स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्डात नोकरीही केली होती. मात्र, जयप्रकाश नारायण, राम मनोहर लोहियांसारख्या नेत्यांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला.

बिहार विधानसभा निवडणूक प्रचार थंडावला

बिहार विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील प्रचार आज थंडावला. JDUचे अध्यक्ष आणि विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार, भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, RJDचे नेते तेजस्वी यादव यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांनी आज जोरदार प्रचार केला.

बिहार विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात 15 जिल्ह्यातील 78 मतदारसंघात 7 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. या टप्प्यात एकूण 1 हजार 208 उमेदवार आपलं नशीब आजमावणार आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदानासह वाल्मिकीनगर लोकसभा मतदारसंघातही पोटनिवडणूक होणार आहे. याठिकाणी 7 उमेदवार रिंगणात आहेत.

संबंधित बातम्या:

BIHAR ASSEMBLY ELECTION 2020: अंतिम टप्प्यातील प्रचाराचा आज शेवटचा दिवस, सर्वपक्षीय नेत्यांकडून प्रचाराची राळ

शेतकऱ्यांसाठी NDA चं जेवढं काम, तेवढं आतापर्यंत कुणाचंच नाही, पंतप्रधान मोदींचा दावा

ईव्हीएम नव्हे या तर ‘मोदी व्होटिंग मशिन्स’; राहुल गांधींनी साधला भाजपवर निशाणा

Bihar assembly election 2020: Nitish kumar announce ‘this is my last election’!

Follow Us
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार...
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार....
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल.
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत.