AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ईव्हीएम नव्हे या तर ‘मोदी व्होटिंग मशिन्स’; राहुल गांधींनी साधला भाजपवर निशाणा

गेल्या विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदी आणि नितीश कुमार यांनी रोजगारनिर्मितीचे आश्वासन दिले होते. | Rahul Gandhi

ईव्हीएम नव्हे या तर 'मोदी व्होटिंग मशिन्स'; राहुल गांधींनी साधला भाजपवर निशाणा
Rohit Dhamnaskar
Rohit Dhamnaskar | Updated on: Nov 04, 2020 | 5:19 PM
Share

पाटणा: मतदानासाठी वापरण्यात येणाऱ्या यंत्रांना ‘ईव्हीएम’ नव्हे तर ‘मोदी व्होटिंग मशिन्स’ (MVM) म्हणायला हवे, असे वक्तव्य काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले आहे. मात्र, यंदा बिहारच्या निवडणुकीत या MVM मशिन्सचाही फायदा होणार नाही. कारण, बिहारमधील जनता सरकारच्या कारभारावर संतप्त आहे. त्यामुळे आता ही MVM मशिन्सही महाआघाडीचा विजय रोखू शकत नाही, असा दावा राहुल गांधी यांनी केला. (Rahul Gandhi take a dig at PM Narendra Modi and CM Nitish Kumar)

बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान मंगळवारी पार पडले. यानंतर आता बिहारमध्ये तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. राहुल गांधी यांनी बुधवारी सीमांचल प्रदेशातील अररिया येथे प्रचारसभा घेतली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना लक्ष्य केले. नितीश कुमार यांनी रोजगारनिर्मितीचे आमिष दाखवून बिहारमधील जनतेची दिशाभूल केली. गेल्या विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदी आणि नितीश कुमार यांनी रोजगारनिर्मितीचे आश्वासन दिले होते. मात्र, आता त्यांनी बिहारच्या जनतेची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले.

यंदा नितीश कुमार जिथे जिथे प्रचारासाठी जात आहेत, तेथील तरुण त्यांना रोजगार कुठे गेले, असा सवाल विचारत आहेत. त्यावर नितीश कुमार या तरुणांना धमकावत आहेत, त्यांना मारत आहेत. तसेच मला तुमच्या मतांची गरज नाही, असेही म्हणत आहेत. नितीश कुमार यांचे हे उत्तर कुणा एका व्यक्तीपुरते मर्यादित नाही, तर सर्वांसाठी आहे. ते बिहारमधील प्रत्येक तरुणाला सांगत आहेत की, मला तुमच्या मताची गरज नाही. त्यामुळे आता बिहारमधील तरुणवर्ग नितीश कुमार यांना मतदान करणार नाही, असे राहुल गांधी यांनी सांगितले.

यावेळी राहुल गांधी महाआघाडीचे सरकार सर्वसमावेशक असेल, असा दावाही केला. हे सरकार गरीब, शेतकरी, प्रत्येक जातीचे, धर्माचे आणि प्रत्येक जिल्ह्याचे असेल. आपण सर्वजण मिळून बिहारचा कायापालट करु, असेही राहुल गांधी यांनी सांगितले.

संबंधित बातम्या:

बिहारमध्ये बदलाचे वारे? भरसभेत मुख्यमंत्री नितीश कुमारांवर पुन्हा ओढावली नामुष्की

तेजस्वी यादवांचे टीकाकार 10 तारखेला ‘खामोश’ होणार, शत्रुघ्न सिन्हांची फटकेबाजी

खोटं बोलण्याच्या स्पर्धेत आम्ही पंतप्रधान मोदींना हरवू शकत नाही- राहुल गांधी

(Rahul Gandhi take a dig at PM Narendra Modi and CM Nitish Kumar)

Follow Us
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला