AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खोटं बोलण्याच्या स्पर्धेत आम्ही पंतप्रधान मोदींना हरवू शकत नाही- राहुल गांधी

देश कसा चालवायचा हे काँग्रेसला ठाऊक असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला. | Rahul Gandhi

खोटं बोलण्याच्या स्पर्धेत आम्ही पंतप्रधान मोदींना हरवू शकत नाही- राहुल गांधी
| Updated on: Oct 28, 2020 | 4:58 PM
Share

पाटणा: खोटं बोलण्याच्या स्पर्धेत आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बरोबरी करू शकत नाही. आम्हाला ती गोष्ट जमत नाही, असे वक्तव्य काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले. आजपर्यंत काँग्रेसने देशाला दिशा देण्याचे काम केले आहे. काँग्रेसच्या काळात ‘मनरेगा’सारखी योजना सुरु झाली, आम्ही शेतकऱ्यांची कर्जे माफ केली. शेतकऱ्यांच्या पाठिशी कसे उभे राहायचे, रोजगारनिर्मिती कशी करायची किंवा देश कसा चालवायचा हे काँग्रेसला ठाऊक असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला. (Rahul Gandhi take a dig on PM Narendra Modi in Bihar)

बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचारासाठी राहुल गांधी यांनी वाल्मिकीनगर येथे सभा घेतली. यावेळी राहुल गांधी यांनी मोदी सरकारच्या धोरणांवर टीकास्त्र सोडले. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी तुम्हाला 2 कोटी रोजगारांचे आश्वासन देणार नाहीत. आपण खोटं बोलतोय ही गोष्ट लोकांच्या लक्षात आल्याचे त्यांना समजले आहे. त्यामुळे आता बिहारमधील सभांमध्ये ते 2 कोटी रोजगारांचे आश्वासन देणार नाहीत. काँग्रेसला अशाप्रकारे खोटे बोलायला जमत नाही. खोटं बोलण्याच्या स्पर्धेत आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बरोबरी करू शकत नाही, असे राहुल गांधी यांनी सांगितले.

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील ७१ मतदारसंघांमध्ये आज मतदान होत आहे. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांना दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे. नरेंद्र मोदी हे दरभंगा, मुजफ्फरपूर आणि पाटण्यात प्रचारसभा घेणार आहेत. तर वाल्मिकीनगर आणि कुशेश्वर येथे राहुल गांधींच्या सभा होतील.

भाजपकडून राहुल गांधींविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार राहुल गांधी यांनी सकाळी मतदानाला सुरुवात होताना एक ट्विट केले होते. यामध्ये त्यांनी मतदारांना न्याय, रोजगार आणि शेतकरी-कामगारांसाठी महाआघाडीला मतदान करण्याची मागणी केली. ‘इस बार न्याय, रोजगार, किसार-मजदूर के लिए आपका वोट सिर्फ महागठबंधन के लिए. बिहार के पहले चरण के मतदान की आप सभी को शुभकामनाएँ’ असे राहुल यांनी ट्विटमध्ये म्हटले होते.

मात्र, मतदानाच्यादिवशी एखाद्या पक्षाला मतदान करा असं सांगून राहुल गांधी यांनी आचारसंहितेचा भंग केला आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी भाजपने निवडणूक आयोगाकडे केली आहे.

संबंधित बातम्या:

पुढच्या वेळी मोदी-नितीश कुमार आले तर त्यांना पकौडे खायला घाला, राहुल गांधींचा निशाणा

राहुल गांधी यांच्याविरुद्ध निवडणूक आयोगाकडे तक्रार, आचारसंहिता भंगाचा भाजपचा आरोप

Bihar Election 2020 : तोंडाला मास्क, हातात ग्लोव्हज, बिहार निवडणुकीच्या मतदानाचे काही फोटो

(Rahul Gandhi take a dig on PM Narendra Modi in Bihar)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.