AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बांग्लादेशही भारताला GDP मध्ये मागे टाकणार, हे नरेंद्र मोदी सरकारचं ‘यश’, राहुल गांधींचं टीकास्त्र

कोरोना आणि लॉकडाऊनमुळं भारताच्या जीडीपीत तब्बल 10.3 टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते. नाणेनिधीचा हा अंदाज खरा ठरला तर भारताचा जीडीपी, गेली शतकानुशतके आपल्याहून कित्येकपट मागे असणाऱ्या बांगलादेशच्याही खाली जाईल.

बांग्लादेशही भारताला GDP मध्ये मागे टाकणार, हे नरेंद्र मोदी सरकारचं 'यश', राहुल गांधींचं टीकास्त्र
Yuvraj Jadhav
Yuvraj Jadhav | Updated on: Oct 14, 2020 | 12:57 PM
Share

नवी दिल्ली : कोरोना आणि लॉकडाऊनचा भारताच्या अर्थव्यवस्थेला जबर फटका बसणार असल्याचा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं वर्तवला आहे. हा फटका इतका जबरदस्त असेल की भारताच्या जीडीपीत तब्बल 10.3 टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते. नाणेनिधीचा हा अंदाज खरा ठरला तर भारताचा जीडीपी, गेली शतकानुशतके आपल्याहून कित्येकपट मागे असणाऱ्या बांगलादेशच्याही खाली जाईल. आयएमएफच्या अंदाजावरुन काँग्रेस नेते राहुल गांधींनी  पुन्हा एकदा नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. (Rahul Gandhi criticize Narendra Modi Govt about IMF projections over GDP )

जीडीपीमध्ये बांग्लादेश भारताच्या पुढे जाण्याच्या तयारीत आहे, हे मोदी सरकारच्या 6 वर्षे काळातील द्वेषानं भरलेल्या सांस्कृतिक राष्ट्रवादाचं यश आहे, अशी टीका राहुल गांधींनी केली. त्यांनी याबाबत आयएमएफच्या अहवालाचा फोटो ट्विट केला आहे.

नाणेनिधीच्या अंदाजानुसार भारतीय व्यक्तीची सरासरी कमाई वर्षाला 1 हजार 877 डॉलर राहिल. तर बांगलादेशचा प्रतिव्यक्ती जीडीपी 4 टक्क्यांनी वाढून 1 हजार 888 डॉलरपर्यंत पोहचेल. त्यामुळं यंदाच्या वर्षात कमाईच्या बाबतीत बांगलादेशी भारतीयांच्याही पुढे जाऊ शकतात. मात्र, ही परिस्थिती जास्त काळ टिकणार नसल्याचंही नाणेनिधीनं स्पष्ट केलंय.

दक्षिण आशियात भारत तिसरा गरीब देश आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि वर्ल्ड इकोनॉमिक आऊटलुकनुसार दक्षिण आशियाई देशात भारत तिसरा गरीब देश ठरणार आहे. पाकिस्तान आणि नेपाळ या दोन देशांचा जीडीपी भारतापेक्षा कमी राहणार आहे. श्रीलंका, भूतान आणि मालदिव देशांचा जीडीपी भारतापेक्षा जास्त राहणार आहे.

2021 च्या वर्षात भारताच्या जीडीपीत चांगली वाढ होईल. आणि याप्रकारे भारत पुन्हा एकदा जगात सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था बनेल असं नाणेनिधीनं म्हटलंय. पुढच्या वर्षात भारताच्या जीडीपीत 8.8 टक्क्यानं वाढण्याचा अंदाज आहे. तर चीनचा विकासदर 8.2 टक्क्यांनी वाढेल असा अंदाज वर्तवण्यात आलाय. 2020 च्या वर्षात चीन एकमेव असा देश ठरेल, ज्याच्या विकासदरात 1.9 टक्क्यांची वाढ पाहायला मिळेल.

दरम्यान,  यंदाच्या आर्थिक वर्षात जगाच्या विकासदरात 4.4 टक्क्यांची घट येऊ शकते. मात्र,  2021मध्ये विकासदर जबरदस्त वाढ पाहायला मिळेल. त्यावेळी विकासदर 5.1 टक्क्यांच्या गतीनं वाढणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

संबंधित बातम्या : 

ही गोष्ट खूपच धोकादायक; पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ व्हिडीओवर राहुल गांधींची प्रतिक्रिया

कांदा जमिनीच्या खाली उगवतो की वर, राहुल गांधींना काय कळतं?, भाजपचा हल्लाबोल

(Rahul Gandhi criticize Narendra Modi Govt about IMF projections over GDP )

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...