AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बांग्लादेशही भारताला GDP मध्ये मागे टाकणार, हे नरेंद्र मोदी सरकारचं ‘यश’, राहुल गांधींचं टीकास्त्र

कोरोना आणि लॉकडाऊनमुळं भारताच्या जीडीपीत तब्बल 10.3 टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते. नाणेनिधीचा हा अंदाज खरा ठरला तर भारताचा जीडीपी, गेली शतकानुशतके आपल्याहून कित्येकपट मागे असणाऱ्या बांगलादेशच्याही खाली जाईल.

बांग्लादेशही भारताला GDP मध्ये मागे टाकणार, हे नरेंद्र मोदी सरकारचं 'यश', राहुल गांधींचं टीकास्त्र
Yuvraj Jadhav
Yuvraj Jadhav | Updated on: Oct 14, 2020 | 12:57 PM
Share

नवी दिल्ली : कोरोना आणि लॉकडाऊनचा भारताच्या अर्थव्यवस्थेला जबर फटका बसणार असल्याचा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं वर्तवला आहे. हा फटका इतका जबरदस्त असेल की भारताच्या जीडीपीत तब्बल 10.3 टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते. नाणेनिधीचा हा अंदाज खरा ठरला तर भारताचा जीडीपी, गेली शतकानुशतके आपल्याहून कित्येकपट मागे असणाऱ्या बांगलादेशच्याही खाली जाईल. आयएमएफच्या अंदाजावरुन काँग्रेस नेते राहुल गांधींनी  पुन्हा एकदा नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. (Rahul Gandhi criticize Narendra Modi Govt about IMF projections over GDP )

जीडीपीमध्ये बांग्लादेश भारताच्या पुढे जाण्याच्या तयारीत आहे, हे मोदी सरकारच्या 6 वर्षे काळातील द्वेषानं भरलेल्या सांस्कृतिक राष्ट्रवादाचं यश आहे, अशी टीका राहुल गांधींनी केली. त्यांनी याबाबत आयएमएफच्या अहवालाचा फोटो ट्विट केला आहे.

नाणेनिधीच्या अंदाजानुसार भारतीय व्यक्तीची सरासरी कमाई वर्षाला 1 हजार 877 डॉलर राहिल. तर बांगलादेशचा प्रतिव्यक्ती जीडीपी 4 टक्क्यांनी वाढून 1 हजार 888 डॉलरपर्यंत पोहचेल. त्यामुळं यंदाच्या वर्षात कमाईच्या बाबतीत बांगलादेशी भारतीयांच्याही पुढे जाऊ शकतात. मात्र, ही परिस्थिती जास्त काळ टिकणार नसल्याचंही नाणेनिधीनं स्पष्ट केलंय.

दक्षिण आशियात भारत तिसरा गरीब देश आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि वर्ल्ड इकोनॉमिक आऊटलुकनुसार दक्षिण आशियाई देशात भारत तिसरा गरीब देश ठरणार आहे. पाकिस्तान आणि नेपाळ या दोन देशांचा जीडीपी भारतापेक्षा कमी राहणार आहे. श्रीलंका, भूतान आणि मालदिव देशांचा जीडीपी भारतापेक्षा जास्त राहणार आहे.

2021 च्या वर्षात भारताच्या जीडीपीत चांगली वाढ होईल. आणि याप्रकारे भारत पुन्हा एकदा जगात सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था बनेल असं नाणेनिधीनं म्हटलंय. पुढच्या वर्षात भारताच्या जीडीपीत 8.8 टक्क्यानं वाढण्याचा अंदाज आहे. तर चीनचा विकासदर 8.2 टक्क्यांनी वाढेल असा अंदाज वर्तवण्यात आलाय. 2020 च्या वर्षात चीन एकमेव असा देश ठरेल, ज्याच्या विकासदरात 1.9 टक्क्यांची वाढ पाहायला मिळेल.

दरम्यान,  यंदाच्या आर्थिक वर्षात जगाच्या विकासदरात 4.4 टक्क्यांची घट येऊ शकते. मात्र,  2021मध्ये विकासदर जबरदस्त वाढ पाहायला मिळेल. त्यावेळी विकासदर 5.1 टक्क्यांच्या गतीनं वाढणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

संबंधित बातम्या : 

ही गोष्ट खूपच धोकादायक; पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ व्हिडीओवर राहुल गांधींची प्रतिक्रिया

कांदा जमिनीच्या खाली उगवतो की वर, राहुल गांधींना काय कळतं?, भाजपचा हल्लाबोल

(Rahul Gandhi criticize Narendra Modi Govt about IMF projections over GDP )

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक