AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Junk food: जाहिरातींमुळे मुलांमध्ये वाढते जंक फूड खाण्याची इच्छा ? 56 टक्के पालकांचे मत

फास्ट फूड किंवा जंक फूड खाल्यामुळे त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. जंक फूडच्या जाहिरातींमुळे मुलांची ही पदार्थ खायची इच्छा वाढते असे मत काही पालकांनी नोंदवले आहे.

Junk food: जाहिरातींमुळे मुलांमध्ये वाढते जंक फूड खाण्याची इच्छा ? 56 टक्के पालकांचे मत
जंक फूडच्या जाहिरातींमुळे मुलांमध्ये ते पदार्थ खाण्याची इच्छा वाढते, असे मत 56 टक्के पालकांनी व्यक्त केले.
| Updated on: Nov 15, 2022 | 10:53 AM
Share

नवी दिल्ली – आजकाल मुलांना घरच्या जेवणापेक्षा बाहेरचे फास्ट फूड किंवा जंक फूड (junk food)खायला जास्त आवडतं.मात्र त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. पॅकेज्ड फूडच्या अथवा पदार्थांच्या जाहिरातींमुळे मुलांची ते पदार्थ खाण्याची इच्छा किंवा क्रेव्हिंग (craving) वाढते, असे मत सुमारे 56 टक्के भारतीय पालकांनी नोंदवले असल्याची माहिती एका अहवालातून समोर आली आहे. हे सर्वेक्षण एका कम्युनिटी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या लोकल सर्कलद्वारे करण्यात आले आहे. या सर्वेक्षणानुसार 92 टक्के लोकांचा असा विश्वास आहे की, सरकारी नियमानुसार पॅकबंद पदार्थांची जाहिरात करणाऱ्यांनी मुलांना लक्ष्य (target)करणे बंद केले पाहिजे. या सर्व्हेमध्ये काय सांगण्यात आले आहे ते जाणून घेऊया.

बालदिनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर झाली सर्वेक्षणातील माहिती

पॅकबंद पदार्थांची जाहिरात दाखवली गेली नाही तर मुलांचे जंक फूड खाण्याचे प्रमाण कमी होईल का असा प्रश्न या सर्वेक्षणादरम्यान पालकांना विचारण्यात आला होता. त्यावेळी 56 टक्के पालकांनी या प्रश्नाचे उत्तर होकारार्थी तर 12 टक्के लोकांनी नाही असे उत्तर दिले. 18 टक्के पालकांनी असे होण्याची शक्यता वर्तवली.

त्याचसोबत, जागतिक पातळीवरील काही पॅकेज्ड फूड कंपन्यांनी आपल्या जाहिरातींच्या माध्यमातून 16 वर्षांखालील मुलांना लक्ष्य न करण्याची पद्धतही अवलंबली आहे.

भारतातील पॅकेज्ड फूड कंपन्यांनी त्यांच्या जाहिरातींद्वारे 16 वर्षांखालील मुलांना लक्ष्य करू नये, असे नियमही सरकारने करावेत का?, असा प्रश्न या सर्वेक्षणात काही ग्राहकांना विचारण्यात आला होता. त्याचे उत्तर देताना 81 टक्के ग्राहकांनी हो असे दिले. तर 11 टक्के लोकांनी यास सहमती दर्शवली मात्र ते 12 वर्षांखालील मुलांसाठी असावे, असे मतही त्यांनी व्यक्त केले. मात्र 4 टक्के लोकांनी, असा नियम करू नये, तर पॅकेज्ड फूड कंपन्यांनी हे स्वेच्छेने करावे, असे मत व्यक्त केले. पॅकेज्ड फूडच्या जाहिरातींच्या माध्यमातून मुलांना आमिष दाखवण्याचा प्रकार थांबवण्यासाठी सरकारने नियम केला पाहिजे, असे मत एकूण 92 टक्के लोकांचे आहे.

ॲडव्हर्टायझिंग स्टँडर्ड्स काऊन्सिल ऑफ इंडियाने 2013 साली अन्न व पेयांसाठी सेल्फ रेग्युलेटरी गाइडलाइन्समध्ये (मार्गदर्शक तत्वं) मुलांच्या फूड मॉडेलचा वापर करण्याबद्दल स्पष्टपणे माहिती दिलेली नाही. त्यामुळे जाहिरातीतील पॅकबंद पदार्थांमुळे त्यांच्या (मुलांच्या) आरोग्यावर परिणाम होऊ शकेल, असे ग्राहकांना वाटते.

Follow Us
वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा
मोठी बातमी! वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा आक्रोश
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण! "काका मला मारू नका, मी...
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण!
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा Video समोर
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिय
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिया सुळेंनी पक्षातील Inside Story सांगितलीच
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले..
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले...
थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
मोठी बातमी! थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार; उपमुख्यमंत्री शिंदेंचे विधान
राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
Bachchu Kadu | राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर
Pandharpur Wari | टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर दिवेघाट सर करत वारी चालली पंढरी
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं,
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं, कोण आहे पवार कुटुंबातील होणारी सून?