AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Junk food: जाहिरातींमुळे मुलांमध्ये वाढते जंक फूड खाण्याची इच्छा ? 56 टक्के पालकांचे मत

फास्ट फूड किंवा जंक फूड खाल्यामुळे त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. जंक फूडच्या जाहिरातींमुळे मुलांची ही पदार्थ खायची इच्छा वाढते असे मत काही पालकांनी नोंदवले आहे.

Junk food: जाहिरातींमुळे मुलांमध्ये वाढते जंक फूड खाण्याची इच्छा ? 56 टक्के पालकांचे मत
जंक फूडच्या जाहिरातींमुळे मुलांमध्ये ते पदार्थ खाण्याची इच्छा वाढते, असे मत 56 टक्के पालकांनी व्यक्त केले.
| Updated on: Nov 15, 2022 | 10:53 AM
Share

नवी दिल्ली – आजकाल मुलांना घरच्या जेवणापेक्षा बाहेरचे फास्ट फूड किंवा जंक फूड (junk food)खायला जास्त आवडतं.मात्र त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. पॅकेज्ड फूडच्या अथवा पदार्थांच्या जाहिरातींमुळे मुलांची ते पदार्थ खाण्याची इच्छा किंवा क्रेव्हिंग (craving) वाढते, असे मत सुमारे 56 टक्के भारतीय पालकांनी नोंदवले असल्याची माहिती एका अहवालातून समोर आली आहे. हे सर्वेक्षण एका कम्युनिटी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या लोकल सर्कलद्वारे करण्यात आले आहे. या सर्वेक्षणानुसार 92 टक्के लोकांचा असा विश्वास आहे की, सरकारी नियमानुसार पॅकबंद पदार्थांची जाहिरात करणाऱ्यांनी मुलांना लक्ष्य (target)करणे बंद केले पाहिजे. या सर्व्हेमध्ये काय सांगण्यात आले आहे ते जाणून घेऊया.

बालदिनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर झाली सर्वेक्षणातील माहिती

पॅकबंद पदार्थांची जाहिरात दाखवली गेली नाही तर मुलांचे जंक फूड खाण्याचे प्रमाण कमी होईल का असा प्रश्न या सर्वेक्षणादरम्यान पालकांना विचारण्यात आला होता. त्यावेळी 56 टक्के पालकांनी या प्रश्नाचे उत्तर होकारार्थी तर 12 टक्के लोकांनी नाही असे उत्तर दिले. 18 टक्के पालकांनी असे होण्याची शक्यता वर्तवली.

त्याचसोबत, जागतिक पातळीवरील काही पॅकेज्ड फूड कंपन्यांनी आपल्या जाहिरातींच्या माध्यमातून 16 वर्षांखालील मुलांना लक्ष्य न करण्याची पद्धतही अवलंबली आहे.

भारतातील पॅकेज्ड फूड कंपन्यांनी त्यांच्या जाहिरातींद्वारे 16 वर्षांखालील मुलांना लक्ष्य करू नये, असे नियमही सरकारने करावेत का?, असा प्रश्न या सर्वेक्षणात काही ग्राहकांना विचारण्यात आला होता. त्याचे उत्तर देताना 81 टक्के ग्राहकांनी हो असे दिले. तर 11 टक्के लोकांनी यास सहमती दर्शवली मात्र ते 12 वर्षांखालील मुलांसाठी असावे, असे मतही त्यांनी व्यक्त केले. मात्र 4 टक्के लोकांनी, असा नियम करू नये, तर पॅकेज्ड फूड कंपन्यांनी हे स्वेच्छेने करावे, असे मत व्यक्त केले. पॅकेज्ड फूडच्या जाहिरातींच्या माध्यमातून मुलांना आमिष दाखवण्याचा प्रकार थांबवण्यासाठी सरकारने नियम केला पाहिजे, असे मत एकूण 92 टक्के लोकांचे आहे.

ॲडव्हर्टायझिंग स्टँडर्ड्स काऊन्सिल ऑफ इंडियाने 2013 साली अन्न व पेयांसाठी सेल्फ रेग्युलेटरी गाइडलाइन्समध्ये (मार्गदर्शक तत्वं) मुलांच्या फूड मॉडेलचा वापर करण्याबद्दल स्पष्टपणे माहिती दिलेली नाही. त्यामुळे जाहिरातीतील पॅकबंद पदार्थांमुळे त्यांच्या (मुलांच्या) आरोग्यावर परिणाम होऊ शकेल, असे ग्राहकांना वाटते.

Follow Us
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता.
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान.
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड.
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम.
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती.
रुपाली ठोंबरे यांचा रुपाली चाकणकरांना सूचक इशारा; आणखी काय म्हणाल्या?
रुपाली ठोंबरे यांचा रुपाली चाकणकरांना सूचक इशारा; आणखी काय म्हणाल्या?.
देशात इंधनाचा तुटवडा नाही, युद्धजन्य परिस्थितीचाही परिणाम नाही.....
देशात इंधनाचा तुटवडा नाही, युद्धजन्य परिस्थितीचाही परिणाम नाही......
खरातच्या मुलीला फ्लॅट भेट, चौकशीसाठी चाकणकरांना का बोलावले नाही?
खरातच्या मुलीला फ्लॅट भेट, चौकशीसाठी चाकणकरांना का बोलावले नाही?.
अस्मानी संकटाचा कहर... शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् हुंदके...
अस्मानी संकटाचा कहर... शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् हुंदके....
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं.