AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Period Pain : मासिक पाळी दरम्यान या पदार्थांचे सेवन टाळा , वाढू शकतात क्रॅम्प्स व वेदना

मासिक पाळी सुरू असताना हलकं भोजन करावं. तेलकट, मसालेदार अन्न खाल्याने पचन क्रियेत अडथळा निर्माण होऊ शकतो.

Period Pain : मासिक पाळी दरम्यान या पदार्थांचे सेवन टाळा , वाढू शकतात क्रॅम्प्स व वेदना
Image Credit source: Freepik
| Updated on: Feb 04, 2023 | 4:00 PM
Share

नवी दिल्ली – मासिक पाळी (period) ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे जी महिलांमध्ये दर महिन्याला येते. मासिक पाळीचे पहिले तीन दिवस बहुतांश स्त्रियांसाठी त्रासदायक असतात. मासिक पाळी दरम्यान, बहुतेक महिलांना ओटीपोटात दुखणे, मसल क्रॅम्प्स (cramps),पाठदुखी, पाय आणि मांड्या दुखणे असा त्रास जाणवतो. मासिक पाळी दरम्यान, आपले शरीर असे हार्मोन (hormones) तयार करते ज्यामुळे गर्भाशय आकुंचन पावते व गर्भाशयाचे अस्तर बाहेर टाकण्यास मदत करते. या आकुंचनामुळे स्त्रियांना क्रॅम्प्स जाणवतात. या हार्मोन्समुळे पाय दुखणे, पाठदुखी, मांड्यामध्ये वेदना होणे, असा त्रास होतो.

या काळात खाण्यापिण्याची विशेष काळजी घ्यावी लागते. ठराविक पदार्थांचे सेवन केल्याने मासिक पाळीत वेदना वाढू शकतात. अशा वेळी आहाराकडे विशेष लक्ष देणे महत्वाचे ठरते. आहारातील काही पदार्थ टाळून तुम्ही क्रॅम्प्सची समस्या दूर करू शकता. या काळात काही पदार्थांचे सेवन केल्याने मासिक पाळीचे दुखणे वाढण्याची समस्या वाढू शकते. मासिक पाळी दरम्यान कोणते पदार्थ टाळावे हे जाणून घेऊया.

गार पदार्थ टाळा

मासिक पाळीत वेदना आणि अस्वस्थता वाढत असेल तर तुम्ही थंड पदार्थांचे सेवन करणे टाळा. थंड पदार्थांमध्ये थंड पेय, आईस्क्रीम, दही, ताक यांचे सेवन टाळावे. तसेच आंबट फळे आणि फ्रीजमध्ये ठेवलेल्या गोष्टींचे सेवन टाळा, यामुळे तुम्हाला क्रॅम्प्स आणि वेदनापासून आराम मिळेल.

जड, मसालेदार पदार्थांचे सेवन टाळा

मासिक पाळीदरम्यान पचनक्रिया बिघडू लागते आणि पोट बिघडण्याची समस्या वाढू शकते. त्यामुळे मासिक पाळीच्या काळात भरपूर अन्न खाणे, मांस, तेलकट पदार्थ, मसालेदार अन्न, दूध आणि चहा पिणे टाळावे. या सर्व पदार्थांचे सेवन केल्याने पचनक्रिया बिघडू लागते आणि पोटात समस्या निर्माण होऊ शकतात.

कॉफी, चहा आणि दुधाचे कमी सेवन करा

या काळात चहा, कॉफी आणि दुधाचे सेवन कमी करा. दूध, चहा आणि कॉफीमुळे ॲसिडिटीची समस्या वाढू शकते, त्यामुळे त्यांचे कमी प्रमाणात सेवन करावे. कॉफी आणि चहामध्ये असलेले कॅफिन यामुळे क्रॅम्पस वाढू शकतात. त्यामुळे मासिक पाळीच्या काळात कॅफेनयुक्त पदार्थ आणि दुग्धजन्य पदार्थांचे सेवन कमी करावे.

( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञांचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

Follow Us
धनंजय मुंडेंना थेट... बीडमध्ये मोठं घडतंय? बजरंग सोनावणेंच्या विधानाने
धनंजय मुंडेंना थेट... बीडमध्ये मोठं घडतंय? बजरंग सोनावणेंच्या विधानाने खळबळ
मुंबईकरांनो सावधान! काल बीकेसीत तर आज रेल्वे स्थानकावर आढळले विषारी...
मुंबईकरांनो सावधान! काल बीकेसीत तर आज रेल्वे स्थानकावर आढळले विषारी साप; चक्क रेल्वेच्या... पहा व्हिडीओ
6 फुटीर खासदारांच्या विरोधात खोके घेऊन रस्त्यावर उतरले ठाकरे समर्थक!
Jalna Thackeray Sena Protest | 6 फुटीर खासदारांच्या विरोधात खोके घेऊन रस्त्यावर उतरले ठाकरे समर्थक! थेट भीक मागत...
पद्मसिंह पाटलांच्या निर्दोष मुक्ततेनंतर मोठं घडणार; 8-10 दिवसांतच...
पद्मसिंह पाटलांच्या निर्दोष मुक्ततेनंतर मोठा निर्णय; 8-10 दिवसांतच... नातू मल्हार पाटलाने दिली सविस्तर माहिती
बापरे! थेट पूलच कोसळला, खडीने भरलेला ट्रक दरीत, पण ड्रायव्हर...
Video | बापरे! थेट पूलच कोसळला, खडीने भरलेला ट्रक दरीत, पण ड्रायव्हर...
लोकलचा दरवाजा बंद कर म्हणणं जीवावर बेतलं! 22 वर्षीय तरुणाची चाकूने....
मोठी बातमी! लोकलचा दरवाजा बंद कर म्हणणं जीवावर बेतलं! 22 वर्षीय तरुणाची चाकूने हत्या, नेमकं घडलं काय?
पेणमधील मुर्तीकारांची मेहनत पाण्यात! गणेशोत्सव काही महिन्यांवर असतानाच
पेणमधील मुर्तीकारांची मेहनत पाण्यात! गणेशोत्सव काही महिन्यांवर असतानाच भयंकर घडलं...
पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई! कुर्ला-सायनमध्ये पाण्यामुळे वाहतूक कोलम
Mumbai Rain Traffic | पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई! कुर्ला-सायनमध्ये पाण्यामुळे वाहतूक कोलमडली
टीका, ट्रोलिंग अन् राजकीय गदारोळ; वाद वाढताच नार्वेकरांनी मागितली माफी
Rahul Narvekar | टीका, ट्रोलिंग अन् राजकीय गदारोळ; वाद वाढताच राहुल नार्वेकरांनी मागितली माफी, जे घडलं ते चुकीचं...
अखरे प्रकरण पेटलंच! रिक्षावाल्यांसारखं नार्वेकरांनाही मारायचं का?
अखरे प्रकरण पेटलंच! रिक्षावाल्यांसारखं नार्वेकरांनाही मारायचं का? बड्या नेत्याचं ते तुफान विधान चर्चेत