AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संधिवात झाल्यावर काय खावे, काय खाऊ नये, रामदेव बाबा यांनी सांगितलं काय काळजी घ्यावी?

बाबा रामदेव यांच्यानुसार संधिवात या आजारात तुमचे गुडघे दुखायला लागतात. खाल्लेल्या अन्नाचे पचन होत नाही. शरीर थरथरते, बोटांना मुंग्या येतात. तसेच वयानुसार इतरही काही अडचणी डोकं वर काढतात.

संधिवात झाल्यावर काय खावे, काय खाऊ नये, रामदेव बाबा यांनी सांगितलं काय काळजी घ्यावी?
baba ramdevImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Feb 05, 2026 | 9:09 PM
Share

आयुर्वेद, योगा यांचा प्रचार, प्रसार करणारे बाबा रामदेव लोकांनी आरोग्याची काळजी कशी घ्यावी याबाबत सांगतात. आपले वय जसे वाढत जाते, तसे तसे अने आजार व्हायला लागतात. आयुर्वेद आणि योगासने यामुळे तुम्ही यातील अनेक आजारांवर मात करू शकता. रामदेव बाबा त्यांच्या सोशल मीडिया खात्यावर आरोग्याविषयी माहिती देत असतात. सध्या त्यांनी संधिवाताचा त्रास असेल तर नेमके काय करावे? याबाबत सविस्तर सांगितले आहे.

चुकीच्या आहारामुळे वाढतो संधिवात

बाबा रामदेव यांच्यानुसार संधिवात या आजारात तुमचे गुडघे दुखायला लागतात. खाल्लेल्या अन्नाचे पचन होत नाही. शरीर थरथरते, बोटांना मुंग्या येतात. तसेच वयानुसार इतरही काही अडचणी डोकं वर काढतात. त्यामुळे या आजारावर मात करायची असेल तर काही घरगुती उपाय करता येऊ शकतात. चुकीचा आहार हे संधिवात होण्याचे प्रमुख कारण आहे. तुम्ही खूपच थंड खाद्यपदार्थ, कच्चाय भाज्या फार उशिरा खात असाल तर तुम्हाला संधिवात होण्याची शक्यता असते. तसेच तुमची बदललेली जीवनशैली यामुळेदेखील संधिवात होण्याची शक्यता असते. उशिरा झोपणे, उशिरा उठणे, खूप वेळासाठी एकाच जागेवर बसून राहणे यामुळेदेखील संधिवात वाढतो. चिंता, तणाव, भीती, बेचैनी यामुळेही संधिवात वाढण्याची शक्यता असते.

नेमकं काय करावं?

तुम्हाला संधिवाताचा त्रास जाणवत असेल तर त्याला वेळीच थोबवणे गरजेचे आहे. योग्य आहार आणि नैसर्गिक उपचार याच्या जोरावर हे शक्य असल्याचे रामदेव बाबा सांगतात. संधिवात जास्तच वाढला तर कोरफड, पारिजात, शेवगा यांचा रस प्यावा. तसेच हळद, मेथी यामध्येही संधिवाताला कमी करण्याचे गुण असतात.

कोणकोणते पदार्थ खावेत?

संधिवात वाढत असेल तर आंबट आणि थंड पदार्थ खाणे टाळावे. फुलकोबी, दही, आवळा आणि काकडी यामुळेदेखील संधिवात वाढतो. त्यामुळे हे खाद्यपदार्थ मर्यादित प्रमाणात खावेत. किचनमधील काही वस्तूदेखील तुम्हाला संधिवातापासून दूर ठेवतात. हळद, आलं, तुळस, लवंग, दालचिनी यांचे सेवन केल्याने संधिवात कमी होतो. तंबाखू, चुना हे खानेदेखील टाळावे, असे बाबा रामदेव यांनी सांगितले आहे.

Follow Us
प्रतीक्षा संपली! मुंबईत पावसाच्या सरी, या भागात पवासाची हजेरी!
प्रतीक्षा संपली! मुंबईत पावसाच्या सरी, या  भागात पवासाची हजेरी!
पुण्यातील रेव्ह पार्टीच्या अंधारात खूप काही घडलं, 150 पैकी 72 जण गेले
पुण्यातील रेव्ह पार्टीच्या अंधारात खूप काही घडलं, 150 पैकी 72 जण गेले तरी कुठे? वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप!
विरोधीपक्ष मोठ्या तयारीत? ममता बॅनर्जींची सोनिया गांधींसोबत बंद दाराआड
विरोधी पक्ष मोठ्या तयारीत? ममता बॅनर्जींची सोनिया गांधींसोबत बंद दाराआड चर्चा; 45 मिनीटे... काय घडलं?
यूट्यूब टिचर खान सरांच्या अटकेविषयी सर्वात मोठी अपडेट, कोर्टाने दिला..
यूट्यूब टिचर खान सरांच्या अटकेविषयी सर्वात मोठी अपडेट, कोर्टाने दिला महत्त्वाचा आदेश, आता...
राष्ट्रवादीत मोठं घडतंय? राजीनाम्याऐवजी नायकवडींना पवरांनी दिली मोठी..
राष्ट्रवादीत मोठं घडतंय? राजीनाम्याऐवजी नायकवडींना दिली मोठी जबाबदारी, स्वतःच म्हणाले...
पुणेकरांनो सावधान! पाणी वाचवा, नाहीतर नळ कोरडे पडतील
Pune Water Cut | पुणेकरांनो सावधान! पाणी वाचवा, नाहीतर नळ कोरडे पडतील; महापालिकेची मोठी घोषणा काय?
4 सिलेंडरनंतर महिलांनी काय करायचं? उरलेले 8 महिने धूरच घ्यायचा का?
Sachin Sawant | 4 सिलेंडरनंतर महिलांनी काय करायचं? उरलेले 8 महिने धूरच घ्यायचा का?; उज्ज्वला योजनेवरून काँग्रेसचा संताप
लक्ष्मण हाकेंच्या व्हिडीओने खळबळ, बड्या नेत्याबद्दल सांगताना...थेट केल
Video | लक्ष्मण हाकेंच्या व्हिडीओने खळबळ, बड्या नेत्याबद्दल सांगताना...थेट केलेल्या विधानाची राज्यात मोठी चर्चा!
धरण भरलं, आश्वासनं भरली; पण गावकऱ्यांच्या घागरी मात्र रिकाम्याच!
Dahanu | धरण भरलं, आश्वासनं भरली; पण गावकऱ्यांच्या घागरी मात्र रिकाम्याच! साखरे गावाचा पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष
Video | बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावर शिंदेची प्रतिक्रिया, हावभावानेच
Video | बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावर शिंदेची प्रतिक्रिया, हावभावानेच वेधलं लक्ष