AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health : केवळ गरम पाणी नव्हे , अंघोळीच्या पाण्यात ‘हा’ पदार्थ मिसळा, अनेक आजार दूर होतील…

गरम पाण्याने स्नान करण्याचे फायदे तर सर्वांनाच माहीत असतील , पण गरम पाण्यात मीठ घालून स्नान करण्याचे फायदे खूप कमी लोकांना माहीत असतील. निरोगी राहण्यासाठी रोज साध्या पाण्याने स्नान करणे पुरेसे नाही. गरम पाण्यात मीठ मिसळून त्याने स्नान केल्यास अनेक आजारांपासून रक्षण होऊ शकते.

Health : केवळ गरम पाणी नव्हे , अंघोळीच्या पाण्यात 'हा' पदार्थ मिसळा, अनेक आजार दूर होतील...
| Edited By: आयेशा सय्यद | Updated on: Aug 23, 2022 | 1:35 PM
Share

मुंबई : भारतात लोक रोज स्नान करतात, पण त्यासाठी किती जण निरोगी पद्धतीचा वापर करतात, हे जाणून घेणे कठीण आहे. गरम पाण्याने स्नान (Hot Water Bath) करण्याचे फायदे तर सर्वांनाच माहीत असतील , पण गरम पाण्यात मीठ घालून (Add Salt in Bath Water) स्नान करण्याचे फायदे खूप कमी लोकांना माहीत असतील. बाहेरच्या देशांमध्य बाथटब मध्ये स्नान केले जाते. आणि तिथे मीठाच्या पाण्याने आंघोळ करणे, ही खूप कॉमन गोष्ट आहे. निरोगी (Healthy) राहण्यासाठी रोज साध्या पाण्याने स्नान करणे पुरेसे नाही. गरम पाण्यात मीठ मिसळून त्याने स्नान केल्यास अनेक आजारांपासून (prevents diseases) रक्षण होऊ शकते. आयुर्वेदिक डॉक्टर शरद कुलकर्णी यांनी सांगितले की, मीठाच्या पाण्याने आंघोळ करणे हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. मीठातील सूक्ष्म आणि तीक्ष्ण गुणधर्मांमुळे ते शरीरातील छिद्रांमध्ये सहज प्रवेश करून नीट स्वच्छता करू शकते. तसेच त्यातील औषधीय गुणधर्मांमुळे शरीराचे अनेक गंभीर आजारांपासून संरक्षण होते.

अंघोळीसाठी कोणते मीठ फायदेशीर ?

मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यासंदर्भातील आजारांचा उपचार करण्यासाठी ‘ बाथ सॉल्ट ‘चा उपयोग करण्याचा सल्ला दिला जातो. अनेक वर्षांपासून एक सोपा आणि स्वस्त उपाय म्हणून त्याचा वापर केला जातो. साधारणत: बाथ सॉल्ट हे मॅग्नेशिअम सल्फेट म्हणजेच समुद्री मीठापासून बनलेले असते. जे गरम पाण्यात सहजरित्या विरघळते. एक बादली पाण्यात 1 चमचा मीठ मिसळून तुम्ही याचा वापर करू शकता.

डॉक्टरांनी सांगितले मीठाच्या पाण्याने स्नान करण्याचे फायदे

डॉ. शरद कुलकर्णी यांच्या सांगण्यानुसार, गरम पाण्यात मीठ घालून त्याचा वापर केल्यास त्वचेचा पोत सुधारतो. तसेच स्नायूंना आराम मिळतो, रक्तप्रवाह सुधारतो आणि चांगली झोप येण्यासही मदत होते.

सॉल्ट बाथमुळे मिळतो सांधेदुखीपासून आराम

सॉल्ट बाथमुळे स्नायूंना आराम मिळतो आणि सूज कमी होऊन दुखणेही कमी होते. त्यामुळे सांधेदुखी, गुडघ्यांचे दुखणे आणि पाठदुखीही कमी होऊन आराम मिळतो. याशिवाय सॉल्ट बाथमुळे सूज कमी होऊन जुनाट दुखण्यांपासूनही आराम मिळतो.

रोगप्रतिकारक्षमता वाढते

मीठाच्या पाण्याने आंघोळ करण्याचे अनेक फायदे आहेत. मीठाच्या पाण्यात ॲंटी- इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात, ज्यामुळे शरीरावरील सूज कमी करून ताकद मिळते. मीठाच्या पाण्यात असलेल्या ॲंटी -बॅक्टेरिअल गुणधर्मांमुळे धोकादायक सूक्ष्मजंतू दूर करण्यास मदत करतात. ज्यामुळे शरीराचे संसर्गापासून संरक्षण होते.

मीठाच्या पाण्याने आंघोळ केल्यामुळे तणाव होतो दूर –

गरम पाण्यात मीठ घालून आंघोळ केल्याने थकवा आणि ताण दूर होतो. जर तुम्हाला खूप ताण सहन करावा लागत असेल तर मीठाच्या पाण्याने आंघोळ करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. त्यामुळे दिवसभराचा थकवा कमी होतो आणि रात्री चांगली व गाढ झोप लागते.

त्वचेवरील सूज आणि जळजळ होते कमी

एक्झिमा, सोरायसिस, कॉन्टॅक्ट डर्मेटायटिस आणि ॲथलीट फूटमुळे त्वचेवर येणारी सूज आणि होणारी जळजळ, मीठाच्या पाण्याने आंघोळ केल्यामुळे दूर होऊ शकते. आंघोळीच्या पाण्यात १ चमचा टेबल सॉल्ट मिसळावे. त्याचा फायदा होऊ शकतो.

( टीप- या आर्टिकलमध्ये सुचवण्यात आलेले उपाय व दिलेले सल्ले हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा. )

Follow Us
अमित शाहांना मी फोनवर बोलताना पाहिलंय; दिल्ली लाठीचार्जबाबत...
अमित शाहांना मी फोनवर बोलताना पाहिलंय; दिल्ली लाठीचार्जबाबत राहुल गांधींचा धक्कादायक दावा
व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराची घोषणा! वाचा विजेत्यांची यादी
व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराची घोषणा! वाचा विजेत्यांची यादी
नुसती धावपळ... आंदोलक थेट गाड्यांवर चढले अन्... शेतकरी आंदोलनामुळे...
नुसती धावपळ... आंदोलक थेट गाड्यांवर चढले अन्... शेतकरी आंदोलनामुळे भोपाळ शहरात तणाव, नेमकं प्रकरण काय?
तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णय! आता विना परवाना शाळांमध्ये...
Tukaram Mundhe | तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णय! आता परवाना नसेल तर शाळांमध्ये अन्न पुरवठा करता येणार नाही; 50 मीटर परिसरात...
दिल्ली आंदोलनातील तरुणींवर कंगना रणौत यांची जहरी टीका; गटर जनरेशन...
दिल्ली आंदोलनातील तरुणींवर कंगना रणौत यांची जहरी टीका; गटर जनरेशन म्हणत केलं वादग्रस्त वक्तव्य!
दिलीप वळसे पाटील- शरद पवार भेट, आणखी कोण कोण होतं उपस्थित? Inside...
दिलीप वळसे पाटील- शरद पवार भेट, आणखी कोण कोण होतं उपस्थित? Inside Story समोर
हेच विद्यार्थी सरकार बदलतील; घरी परतताच दीपकेचा मोदी सरकारला थेट इशारा
Abhijeet Dipke | हेच विद्यार्थी सरकार बदलतील; घरी परतताच अभिजीत दीपकेचा मोदी सरकारला थेट इशारा
मोठी बातमी! NDA मध्ये येताच सुप्रिया सुळेंना मिळणार मोठं गिफ्ट?दावा...
मोठी बातमी! NDA मध्ये येताच सुप्रिया सुळेंना मिळणार मोठं गिफ्ट? दिल्लीतील हालचालीमागे... बड्या व्यक्तीच्या दाव्याने खळबळ
तो सुखरूप घरी परतला हे आमच्यासाठी... दीपकेंच्या वडिलांची प्रतिक्रिया
तो सुखरूप घरी परतला हे आमच्यासाठी... अभिजीत दीपकेंच्या वडिलांची प्रतिक्रिया चर्चेत
मोठी बातमी! दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला, पुण्यात...
मोठी बातमी! दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला, पुण्यात घडामोडींना वेग