AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Icc T20I Wc Final : टीम इंडियाची वर्ल्ड कप फायनलमधील कामगिरी कशी?

Indian Cricket Team Icc T20i World Cup Final आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील अंतिम सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे. या सामन्यानिमित्ताने जाणून घ्या टीम इंडियाची टी 20i वर्ल्ड कप फायनलमधील कामगिरी कशी राहिली आहे.

Icc T20I Wc Final : टीम इंडियाची वर्ल्ड कप फायनलमधील कामगिरी कशी?
Suryakumar Yadav and Team IndiaImage Credit source: Bcci
| Updated on: Mar 07, 2026 | 1:51 AM
Share

यजमान आणि गतविजेत्या टीम इंडियाने साखळी, सुपर 8 आणि सेमी फायनल असे 3 टप्पे पार करत अखेर आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली आहे. टीम इंडियाने गुरुवारी 5 मार्चला उपांत्य फेरीतील दुसऱ्या सामन्यात इंग्लंडवर 7 धावांनी मात करत फायनलचं तिकीट मिळवलं. टीम इंडियाने इंग्लंड विरुद्ध 254 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र इंग्लंडला 246 धावांपर्यंतच पोहचता आल. भारताने यासह विजय मिळवला आणि फायनलचं तिकीट फायनल केलं. आता टीम इंडिया आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 ट्रॉफीसाठी अंतिम फेरीत न्यूझीलंड विरुद्ध भिडणार आहे. न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेला उपांत्य फेरीतील पहिल्या सामन्यात पराभूत करत वर्ल्ड कप ट्रॉफीच्या दिशेने 1 पाऊल पुढे टाकलं. आता अंतिम फेरीतील सामना हा रविवारी 8 मार्चला अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे.  हा सामना जिंकून कोणता संघ विश्वविजेता ठरतो हे याची चाहत्यांना प्रतिक्षा असणार आहे. या निमित्ताने टीम इंडियाची टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीतील कामगिरी कशी राहिली आहे? हे आपण जाणून घेऊयात.

टीम इंडियाचा वर्ल्ड रेकॉर्ड

टीम इंडियाची टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहचण्याची यंदाची सलग दुसरी तर एकूण चौथी वेळ ठरली आहे. टीम इंडियाने यासह स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक वेळा अंतिम फेरीत पोहचण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. टीम इंडियाने आतापर्यंत वर्ल्ड कप स्पर्धेतील 3 पैकी 2 अंतिम सामन्यांध्ये विजय मिळवला आहे. तर टीम इंडियाला एकदाच अंतिम फेरीत पराभूत व्हावं लागलंय. तसेच टीम इंडिया गतविजेताही आहे. अशात आता टीम इंडिया न्यूझीलंडला पराभूत करुन सर्वाधिक 3 टी 20i वर्ल्ड कप जिंकण्याची कामगिरी करणार का हे पाहणं महत्त्वाच ठरणार आहे.

टीम इंडियाची फायनलमधील कामगिरी

टीम इंडियाने पहिल्याच टी 20i वर्ल्ड कप 2007 स्पर्धेतील अंतिम सामन्यात पाकिस्तानवर मात केली होती. भारताने तेव्हा महेंद्रसिंह धोनी याच्या नेतृत्वात हा ऐतिहासिक विजय मिळवला होता. त्यानंतर टीम इंडियाने 2014 साली अंतिम फेरीत धडक दिली होती. तेव्हा श्रीलंकेने पराभूत केल्याने भारताला उपविेजेतेपदावर समाधाना मानावं लागलं होतं. त्यानंतर टीम इंडियाने थेट 10 वर्षांनी रोहित शर्मा याच्या नेतृत्वातत फायनल गाठली. भारताने दक्षिण आफ्रिकेला फायनलमध्ये पराभूत करुन दुसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकण्याची कामिगिरी केली. आता सूर्यकुमार यादव टीम इंडियाला टी 20i वर्ल्ड कप जिंकून देणारा तिसरा भारतीय कर्णधार ठरणार का? यासाठी सामन्याच्या निकालाची प्रतिक्षा करावी लागणार आहे.

Follow Us
लाडकी बहिणींची चिंताच मिटली, शिंदेंनी दिली Good News, योजनेबाबत मोठी
लाडकी बहिणींची चिंताच मिटली, शिंदेंनी दिली Good News, योजनेबाबत मोठी.
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरणी आणखी एकाची धरपकड, अटकेचं का
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरणी आणखी एकाची धरपकड, अटकेचं का.
धक्कादायक! सहा महिन्यात 34 आदिवासी मुली बेपत्ता, भाजप नेत्याचे खळबळजनक
धक्कादायक! सहा महिन्यात 34 आदिवासी मुली बेपत्ता, भाजप नेत्याचे खळबळजनक.
अक्षय तृतीयानिमित्त सिद्धिविनायकमध्ये बाप्पाच्या दागिन्यांच्या लिलाव,
अक्षय तृतीयानिमित्त सिद्धिविनायकमध्ये बाप्पाच्या दागिन्यांच्या लिलाव,.
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांचे डोळे आतुर,
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांचे डोळे आतुर,.
महिला आरक्षणावरुन दमानियांनी सत्ताधारी पक्षाला घेरलं, थेट फडवीसांना वि
महिला आरक्षणावरुन दमानियांनी सत्ताधारी पक्षाला घेरलं, थेट फडवीसांना वि.
राऊतांच्या वक्तव्यावर संजय शिरसाटांची जोरदार टीका; थेट म्हणाले, 'दुसऱ्
राऊतांच्या वक्तव्यावर संजय शिरसाटांची जोरदार टीका; थेट म्हणाले, 'दुसऱ्.
मोठी बातमी! भोंदू खरातचा मोबाईल डेटा रिकव्हर, नेमकं काय आलं समोर?
मोठी बातमी! भोंदू खरातचा मोबाईल डेटा रिकव्हर, नेमकं काय आलं समोर?.
महापौर रितू तावडेंकडून काँग्रेसचा निषेध, काळी साडी नेसून सभेत येणार
महापौर रितू तावडेंकडून काँग्रेसचा निषेध, काळी साडी नेसून सभेत येणार.
काँग्रेसशिवाय देशाला योग्य नेतृत्व कोणी करूच शकत नाही; संजय राऊतांनी भ
काँग्रेसशिवाय देशाला योग्य नेतृत्व कोणी करूच शकत नाही; संजय राऊतांनी भ.