AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रोज सकाळी प्राणायम केल्याने काय फायदा होतो ? रामदेव बाबा यांच्याकडून जाणा

प्राणायम भारतीय योग परंपरेचा महत्वाचा भाग आहे.ज्यामुळे शरीर आणि मन दोन्ही संतुलित राहण्यास मदत होते. योग गुरु रामदेव बाबा यांनी सांगितलेले काही प्राणायम आरोग्यासाठी फायदेशीर होऊ शकतात.चला जाणूयात कोणते प्राणायम आहेत ?

रोज सकाळी प्राणायम केल्याने काय फायदा होतो ? रामदेव बाबा यांच्याकडून जाणा
benefits of pranayama every morning?
| Updated on: Feb 19, 2026 | 7:46 PM
Share

प्राणायम शरीर आणि मनाला संतुलित राखण्याचा हा एक प्रभावी माध्यम आहे. श्वासाच्या माध्यमातून शरीरातील एनर्जीच्या प्रवाहाला चांगले बनवण्याचे काम प्राणायम करत असते. नियमित प्राणायम केल्याने फुप्फुसे मजबूत होतात आणि शरीरास पर्याप्त ऑक्सिजन मिळत असतो. ज्यामुळे प्रत्येक अवयव नीट प्रकारे काम करतो. आजच्या तणावाच्या काळात थकवा, बेचैनी आणि मानसिक दबाव सामान्य झाला आहे. अशात प्राणायम मनाला शांत करणे आणि एकाग्रता वाढवण्यास सहायक ठरत आहे

प्राणायम केल्यास दिवसभर तुम्ही एक्टीव्ह असता. योगगुरु रामदेव बाबा देखील रोज सकाळीप्राणायम करण्याचा सल्ला देतात. त्यांच्या मते नियमित योगाअभ्यासाने शरीराची नैसर्गिक रोग प्रतिकार शक्ती वाढते. आणि अनेक समस्यातून आपला बचाव शक्य होतो. रामदेव बाबांनी सांगितलेल्या काही प्राणायम विशेष रुपाने फायदेशीर मानले जातात. चला तर त्याची माहिती घेऊयात…

रोज सकाळी करा हे प्राणायम

कपालभाती

या प्राणायम मध्ये वेगाने श्वास बाहेर सोडावा लागतो. हे प्राणायम पचन यंत्रणे मजबूत करणे, पोटाची चरबी कमी करणे आणि शरीराला आतून एक्टिव्ह राखण्यास मदत करते असे रामदेव बाबा सांगतात.

अनुलोम-विलोम

यात आळीपाळीने नाकाच्या दोन्ही नाकपुड्यांनी श्वास घ्यायाचा आणि उच्छवास सोडायचा असतो. त्यामुळे मन शांत होते. आणि शरीरात एनर्जीचे संतुलन कायम राखण्यासाठी हे आसन सहायक असते.

भस्त्रिका

या प्राणायम मध्ये वेगाने श्वास घ्यायचा आणि सोडायचा असतो. यामुळे फुप्फुसे मजबूत होतात आणि शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा चांगला होतो.

भ्रमरी

भ्रमरीत मधमाशांसारख्या आवाजात श्वासोच्छवास करायचा असतो. यामुळे तणाव कमी करणे आणि मानसिक शांती मिळण्यासाठी हे प्राणायम उपयुक्त असते.

रोज सकाळी प्राणायम केल्याने काय होते?

नियमितपणे सकाळी प्राणायम केल्याने इम्युन सिस्टीम मजबूत होते. आणि शरीर रोगांशी लढण्यासाठी सक्षम बनते. यामुळे तणाव आणि चिंता कमी होते. ज्यामुळे मानसिक आरोग्य उत्तम राहाते.

प्राणायम करणाऱ्यांना झोप चांगली येते. दिवसभर ऊर्जादायी वाटते. यामुळे पचन, श्वसनाशी जोडलेल्या समस्या आणि थकवा आदीत सुधारणा येते.

चांगल्या आरोग्यासाठी गरजेचे

चांगल्या आरोग्यासाठी प्राणायम सोबत संतुलित डाएट घेणे गरजेचा असतो. रोज पुरेसे पाणी प्यावे, वेळेवर जेवण घ्यावे,नियमित शारीरिक एक्टिव्हीटी करावी आणि योग्य झोप घ्यावी त्याने दिचर्येत सामील करावे.

मोबाईल आणि स्क्रीन टाईम मर्यादित राखावा आणि स्वत:साठी काही वेळ काढावा, या सवयीसोबत प्राणायम केल्याने शरीर आणि मन दोन्ही आरोग्यदायी राहाते.

आता एनसीईआरटीच्या पुस्तकात मराठा साम्राज्याच्या इतिहासाचा समावेश
आता एनसीईआरटीच्या पुस्तकात मराठा साम्राज्याच्या इतिहासाचा समावेश.
नवी दिल्लीत इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026 चे उद्घाटन
नवी दिल्लीत इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026 चे उद्घाटन.
नाशिकमध्ये शेअर मार्केटच्या आमिषाने 2.16 कोटींची फसवणूक
नाशिकमध्ये शेअर मार्केटच्या आमिषाने 2.16 कोटींची फसवणूक.
ड्रग्ज प्रकरणाला इम्तियाज जलीलांचा सपोर्ट? संजय शिरसाटांचे गंभीर आरोप
ड्रग्ज प्रकरणाला इम्तियाज जलीलांचा सपोर्ट? संजय शिरसाटांचे गंभीर आरोप.
मुंबई पालिकेच्या महापौरपदावरुन महायुतीत एकमत? अपडेट आली समोर
मुंबई पालिकेच्या महापौरपदावरुन महायुतीत एकमत? अपडेट आली समोर.
शिंदे- ठाकरे भेटीवर राजकीय वाद; राऊत आणि बन यांच्यात टीका-प्रत्युत्तर
शिंदे- ठाकरे भेटीवर राजकीय वाद; राऊत आणि बन यांच्यात टीका-प्रत्युत्तर.
अजित दादांच्या अपघातावर मुलाची शंका, थेट पोस्ट करत केला सवाल
अजित दादांच्या अपघातावर मुलाची शंका, थेट पोस्ट करत केला सवाल.
धाराशिवमध्ये तानाजी सावंत-एकनाथ शिंदेंच्या भेटीत नेमकं काय घडलं?
धाराशिवमध्ये तानाजी सावंत-एकनाथ शिंदेंच्या भेटीत नेमकं काय घडलं?.
छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेली मुंबई आम्हाला घडवायची आहे
छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेली मुंबई आम्हाला घडवायची आहे.
आठवड्याभरानंतर तेजस ठाकरेंना रुग्णालयातून डिस्चार्ज
आठवड्याभरानंतर तेजस ठाकरेंना रुग्णालयातून डिस्चार्ज.