AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

World diabetes day: 14 ते 20 वयोगटातील मुलांनाही होतोय मधुमेह, अशी घ्या काळजी

मुलांमध्ये मधुमेहाच्या एकूण प्रकरणांपैकी सुमारे 12ते 25 % प्रकरणे ही टाइप-2 मधुमेहाची आहेत. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि ॲक्टिव्ह लाइफस्टाइलचा अभाव यामुळे लहान मुलांनाही मधुमेह होत आहे.

World diabetes day: 14 ते 20 वयोगटातील मुलांनाही होतोय मधुमेह, अशी घ्या काळजी
मधुमेह
| Updated on: Nov 14, 2022 | 11:51 AM
Share

खराब जीवनशैली आणि खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी यामुळे जगभरात मधुमेहाचे (Diabetes) रुग्ण वाढत आहेत. या आजाराबद्दल लोकांना जागरूक करण्यासाठी आज ‘ जागतिक मधुमेह दिन’ (World diabetes day) साजरा केला जात आहे. भारतातही मधुमेहाचे रुग्ण वाढत आहेत. इंटरनॅशनल डायबिटिस फेडरेशनच्या अहवालानुसार 2019 सालापर्यंत भारतात (in India) मधुमेहाचे 77 दशलक्ष रुग्ण आहेत. तसेच 20 ते 80 या वयोगटातील मधुमेहाच्या रुग्णांमध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे.

मधुमेहाचा आजार हा केवळ वृद्ध व्यक्तीनांच होतो, असे पूर्वी म्हटले जायचे. मात्र आता लहान मुलंही या आजाराला बळी पडू लागली आहेत. यातील बहुतांश प्रकरणे टाइप-2 मधुमेहाची आहेत. ज्येष्ठ मधुमेह तज्ञ आणि RSSDI डॉ. बी. एम. मक्कर यांच्या सांगण्यानुसार, आता टाइप-2 मधुमेह सुरू होण्याचे निश्चित वय निश्चित करणे खूप कठीण झाले आहे. आता 14 ते 20 वर्ष या वयोगटातील मुलांना या आजाराचा सर्वाधिक फटका बसत आहे. गेल्या दशकभरात (10 वर्षे) या वयोगटातील टाइप-2मधुमेहाच्या रुग्णांची संख्या लक्षणीय वाढली आहे. मुलांमध्ये मधुमेहाच्या एकूण प्रकरणांपैकी सुमारे 12 ते 25 % प्रकरणे ही टाइप-2 मधुमेहाची आहेत.

मुलांमध्ये वाढता लठ्ठपणा हे धोक्याचे लक्षण

डॉ. बीएम मक्कड सांगतात की, मुलांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण वाढत आहे. शारीरिक हालचालींचा अभाव, रात्री उशिरापर्यंत काम करणे, जेवण मिळवण्यासाठी फारसे कष्ट करावे न लागणे आणि जंक फूडचे वाढते सेवन यामुळे मधुमेहाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. एखादी गरोदर स्त्री लठ्ठ असेल तर किशोरवयात मुलाला टाइप-2 मधुमेह होण्याची शक्यता जास्त असते. ज्या मुलांना वयाच्या 15 व्या वर्षी (आयुष्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात) टाइप 2 मधुमेह होतो, त्यांच्या पुढल्या जीवनावर त्याचा परिणाम होतो.

अपोलो टेलिहेल्थचे सीईओ विक्रम थापलू यांच्या सांगण्यानुसार, देशातील 20 ते 70 या वयोगटातील एकूण लोकसंख्येपैकी 8.7 टक्के लोकांना मधुमेहाचा त्रास आहे. मधुमेह हा जीवनशैलीशी संबंधित एक आजार आहे हे सर्वांनाच माहीत आहे. पण आता भारतात या आजाराला महामारीचे स्वरूप आले आहे. मधुमेह हा अनेक कारणांमुळे होऊ शकतो, त्यामुळे त्याला सामोरे जाण्यासाठी वेगवेगळे मार्ग अवलंबण्याची गरज आहे. त्यासाठी या आजाराची लक्षणे काय आहेत व त्याला प्रतिबंध कसा करता येऊ शकेल, याची माहिती असणे आवश्यक आहे.

या गोष्टींची घ्या काळजी

मुलांमध्ये रक्तातील साखरेची पातळी (blood sugar level) नियंत्रणात ठेवणे खूप महत्वाचे आहे. कारण टाइप -2 मधुमेह असलेल्या मुलांवर लक्ष ठेवून त्यावर (मधुमेह) नियंत्रण ठेवले नाही तर ते त्या मुलांच्या आयुष्यासाठी धोकादायक ठरू शकते. अशा परिस्थितीत, वयाच्या 35 व्या वर्षीच (आरोग्यास) धोका निर्माण होऊ शकतो व त्याचा त्यांच्या संपूर्ण जीवनावर परिणा होऊ शकतो. मुलांचा मधुमेहापासून बचाव करायचा असेल तर या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे.

1) मुलांना ॲक्टिव्ह ठेवा आणि (बाहेर) खेळण्यासाठी प्रोत्साहन द्या.

2) मुलांचे वजन जास्त वाढू देऊ नका.

3) मुलांच्या आहाराकडे लक्ष द्यावे व जंक फूडचे सेवन करू देऊ नये.

4) मुलांचा स्क्रीन टाईम ( मोबाईल, टीव्ही, कॉम्प्युटर पाहणे) 1-2 तासांपेक्षा जास्त असू नये.

5) जास्त फॅट्स असलेले पदार्थ खाण्यास देऊ नयेत.v

Follow Us
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी.
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले.
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने.
WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; 'जग संघर्षात, पण..
WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; 'जग संघर्षात, पण...
जागतिक उलथापालथीच्या काळात मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रगती....
जागतिक उलथापालथीच्या काळात मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रगती.....
राऊत यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल पंतप्रधान मोदींबाबत मोठी भविष्यवाणी
राऊत यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल पंतप्रधान मोदींबाबत मोठी भविष्यवाणी.
शिवनिका ट्रस्ट प्रकरणी SIT स्थापन; ट्रस्टींवरही येणार तपासाचा फेरा
शिवनिका ट्रस्ट प्रकरणी SIT स्थापन; ट्रस्टींवरही येणार तपासाचा फेरा.
इराण-अमेरिका युद्धाचा भारतावर काय परिणाम?मोदींनी लोकसभेत सगळं सांगितलं
इराण-अमेरिका युद्धाचा भारतावर काय परिणाम?मोदींनी लोकसभेत सगळं सांगितलं.
भोंदूबाबा खरातने सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरलं... मोठा कारनामा समोर
भोंदूबाबा खरातने सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरलं... मोठा कारनामा समोर.
आताच सोनं खरेदी करा बरं... गेल्या 40 वर्षात झालं नव्हतं एवढं स्वस्त...
आताच सोनं खरेदी करा बरं... गेल्या 40 वर्षात झालं नव्हतं एवढं स्वस्त....