Diabetes Care : तुम्हाला मधुमेह आहे?, ‘हे’ 6 घरगुती उपाय नक्की करा…

आजकाल बहुतेक लोक हे मधुमेह ग्रस्त आहेत. या दरम्यान, रक्तातील साखरेची पातळी वाढते.

Diabetes Care : तुम्हाला मधुमेह आहे?, 'हे' 6 घरगुती उपाय नक्की करा...
मधुमेह
Follow us
| Updated on: Jun 03, 2021 | 3:01 PM

मुंबई : आजकाल बहुतेक लोक हे मधुमेह ग्रस्त आहेत. या दरम्यान, रक्तातील साखरेची पातळी वाढते. यामुळे शरीरात इन्सुलिनचा अभाव होतो. मधुमेह असलेल्या व्यक्तींनी आपल्या आहाराकडे विशेष लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. विशेष म्हणजे तुम्ही काही घरगुती उपाय करून रक्तातील साखरेची पातळी देखील नियंत्रित करू शकता. आहारात नेमके काय घेतले पाहिजे. ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी देखील नियंत्रित राहिल हे बघूयात (Special tips for patients with diabetes)

दालचिनी

दालचिनीमध्ये बायोएक्टिव्ह कंपाऊंड असते. हे मधुमेह विरूद्ध आणि प्रतिबंध करण्यास मदत करते. दालचिनीमुळे शरीरातील इन्सुलिन वाढवण्यास मदत होते. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित होते. मधुमेह असलेल्या व्यक्तीने आपल्या आहारात दालचिनीचा समावेश केला पाहिजे. मात्र, दालचिनीचे अधिक सेवन हानिकारक आहे.

कोरफड

कोरफड आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. कोरफड खाण्यासाठी कडू लागत असली तरी देखील शरीरातील साखरेची पातळी संतुलित राखण्यासाठी कोरफड मदत करते. फक्त कोरफड खाणे शक्य नसल्यास आपण ताकामध्ये कोरफडचा गर घालून पिऊ शकतो. ज्या लोकांना मधुमेहाची समस्या आहे. त्यांनी आपल्या आहारात दररोज कोरफड घेतली पाहिजे.

व्हिटॅमिन सी

व्हिटॅमिन सी केवळ त्वचेसाठीच नाही तर मधुमेहासाठी देखील उपयुक्त आहे. अभ्यासातून असे दिसून आले आहे की दररोज 600 मिलीग्राम व्हिटॅमिन सी घेतल्यास रक्तातील साखरेची पातळी सुधारण्यास मदत होते. ज्या लोकांना तीव्र मधुमेह आहे. त्यांनी आपल्या आहारात दररोज व्हिटॅमिन सी समृद्ध असलेले फळे खावीत. संत्री, किवी, मोसंबी, लिंबू आणि आंबा यामध्ये व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात असते.

व्यायाम

टाईप 2 मधुमेहामागील मुख्य कारणांपैकी एक अधिक वजन आहे. कोणत्याही प्रकारचा व्यायाम हा दररोज केला पाहिजे. योगा, झुम्बा, एरोबिक्स, चालणे, पळणे या सारखे व्यायाम केल्याने शरीरातील साखरेची पातळी सुधारू शकते. इतकेच नाही तर दररोज चालण्यामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यास मदत होते. यामुळे दररोज कोणत्याही प्रकारचा व्यायाम करणे आवश्यक आहे.

भरपूर पाणी प्या

मधुमेह असलेल्या व्यक्तींनी जास्त पाणी प्यावे, हे त्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. जास्त पाणी पिल्याने आपल्या शरीरातील साखरेची पातळी व्यवस्थित राहण्यास मदत होते. शिवाय जास्त पाणी पिल्यामुळे आपण हेल्दी आणि निरोगी राहतो.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Special tips for patients with diabetes)

Non Stop LIVE Update
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार.
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.