AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रोज पंधरा मिनिटं करा हे आसन, शरीराचा बेढबपणा जाईल आणि झोपही चांगली येईल

दैनंदिन रहाटगाड्यात तुम्हाला जर तुमच्या शरीरासाठी वेळ देता येत नसेल तर पुढे तुम्हाला अनेक व्याधी होऊ शकतात. ताण-तणावाने तुम्हाला नीट झोप देखील येत नाही. त्यामुळे काही आसने केल्याने तुम्हाला ताजेतवाने वाटून तणावमुक्त जगता येईल.

रोज पंधरा मिनिटं करा हे आसन, शरीराचा बेढबपणा जाईल आणि झोपही चांगली येईल
| Updated on: Nov 10, 2024 | 1:01 PM
Share

आजकाल सर्वाची लाईफस्टाईल बिघडली आहे. बदलेला आहार आणि व्यायाम न केल्याने अनेक आजाराचा धोका वाढला आहे. त्यामुळे वाढत्या वयात जर फिट रहायचे असेल तर योगासनं करणे आवश्यक आहे. योगासनं शरीराच्या लवचिकपणा आणि आरोग्यासाठी चांगली असतात. जर वजन कमी करायचं असेल आणि मानसिक आरोग्य नीट राखायचं असेल तर दररोज सुर्य नमस्कार करणे फायदेशीर आहे.सुर्य नमस्कारात 12 आसने लागोपाठ केली जातात. त्यातून अनेक लाभ मिळतात. सुर्य नमस्काराने काय फायदे मिळतात आणि तो कधी करायचा ते जाणून घ्या…

सुर्य नमस्काराने हे फायदे मिळतात…

वजन कमी करणे :

सूर्य नमस्कार एक कार्डिओव्हॅस्कुलर एक्सरसाईज आहे. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळते. हे आसन पोटाचे स्नायूना पसरवते. आणि कमरेजवळील चरबी कमी करते. वेगाने केलेला सुर्यनमस्कार मुव्हमेंट मेटाबॉलिझम वाढविण्यास मदत करतो.

चिंता दूर करणे :

जर तुम्ही जास्त चिंता करीत करीत असाल तर तो नियंत्रित करण्यासाठी सूर्यनमस्कार रोज करा. सुर्यनमस्कार रोज केल्याने तर आपण चिंतामुक्त आणि ताणतणावातून मुक्त होण्यास मदत होते. हे आसन थायरॉईडच्या प्रक्रीयेला सामान्य करते.

स्नायूंना मजबूत बनवते :

सूर्यनमस्कार स्नायू, सांध्यांना टोन करुन मजबूत बनवतो. या आसनाने माकड हाडाचा भाग लवचिक बनतो. जर हाड कमजोर असतील तर हे आसन अवश्य करावे.

त्वचा उजळण्यास मदत :

सुर्य नमस्कार रोज केल्याने रक्त संचारण वाढते. त्यामुळे आपली चेहऱ्याची त्वचा उजळण्यास मदत होते. त्वचा चमकदार बनते.

केव्हा करावे सुर्य नमस्कार :

सुर्य नमस्कार सर्वसामान्यत: सकाळी करायचे असतात. सकाळी हे आसन केल्याने शरीरासह मन देखील ताजेतवाने होते. सकाळच्या वेळी केलेल्या या आसनाने आपल दिवसभर उत्साही राहाता. जर तुमच्याकडे वेळ नसेल तर सायंकाळी देखील तुम्ही सुर्य नमस्कार करु शकता. सायंकाळी केलेल्या सुर्यनमस्काराचा देखील फायदा होत असतो.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.