AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मधुमेह असणाऱ्यांनी पावसाळ्यात घ्यावी ‘ही’ विशेष काळजी!

मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी स्वत:ची काळजी घेणे गरजेचे आहे कारण या ऋतूत रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त असल्याने मधुमेहाच्या रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती इतरांच्या तुलनेत कमकुवत असते. त्यामुळे ते अधिक आजारीही पडू शकतात.

मधुमेह असणाऱ्यांनी पावसाळ्यात घ्यावी 'ही' विशेष काळजी!
diabetetsImage Credit source: Twitter
| Updated on: Jul 31, 2023 | 1:44 PM
Share

मुंबई: कडक उन्हापासून आराम देणारी एखादी गोष्ट असेल तर ती म्हणजे पाऊस. सध्या पावसाळा सुरू आहे. देशाच्या अनेक भागांत इतका भीषण पाऊस पडत आहे की पूरस्थिती निर्माण झाली आहे. अशा वेळी स्वत:चे रक्षण करणे आणि आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. सहसा पावसामुळे काही आजारही येतात. जसे की सर्दी-खोकला, व्हायरल फिव्हर इत्यादी. यामुळे मधुमेहाच्या रुग्णांचा धोका वाढतो. त्यामुळे या ऋतूत अधिक सुरक्षितता आणि खबरदारी घ्यायला हवी.

मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी स्वत:ची काळजी घेणे गरजेचे आहे कारण या ऋतूत रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त असल्याने मधुमेहाच्या रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती इतरांच्या तुलनेत कमकुवत असते. त्यामुळे ते अधिक आजारीही पडू शकतात. स्वतःला निरोगी आणि सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही फॉलो करू शकता अशा काही टिप्स.

मधुमेह रुग्णांसाठी पावसात निरोगी राहण्याच्या टिप्स-

1. पावसाळ्यात मधुमेहाच्या रुग्णाने बाहेरचे अन्न अजिबात खाऊ नये. संसर्गाची भीती असते. घरात बनवलेले शुद्ध आणि स्वच्छ अन्न खावे. अशा हवामानात आपण कमी शिजवलेले अन्न देखील टाळले पाहिजे. त्यामुळे संसर्ग टळेल.

2. घरात फळे आणि भाज्या आणताना पाण्याने धुवून त्यांचा चांगला वापर करा. हे करणे सामान्य लोकांपासून मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप महत्वाचे आहे. काही भाज्या गरम पाण्यात उकळल्याशिवाय खाऊ नका.

3. जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर पावसात भिजणे टाळावे. जर तुम्ही पावसात भिजत असाल तर लगेच कोरडे कपडे आणि शूज घाला. मधुमेह असेल तर पाय नेहमी स्वच्छ आणि कोरडे ठेवण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुम्ही इन्फेक्शनपासून दूर राहाल.

4. पावसाळ्यात मधुमेह रुग्णांनी जीवनसत्वयुक्त पदार्थ आणि पेयांचे सेवन करावे. यामुळे तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढेल.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.