AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वजन कमी व्हावं म्हणून रात्री जेवण टाळता? असं केल्यावर काय होतं? वाचा

अनेक जण रात्रीचे जेवण न करता झोपून जात असले तरी यामागे अनेक कारणे आहेत. काही लोकांना रात्री ऑफिसला आल्यावर इतका कंटाळा येतो की झोपी जातात, तर अनेकांना वाटतं की रात्री जेवलं नाही तर त्यांचं वजन कमी होईल. पण तसे करताना ते कुठेतरी स्वत:चे नुकसान करत आहेत.

वजन कमी व्हावं म्हणून रात्री जेवण टाळता? असं केल्यावर काय होतं? वाचा
do not skip dinner
| Updated on: Jul 30, 2023 | 2:23 PM
Share

मुंबई: आयुष्यात आपण कितीही व्यस्त असलो तरी सकाळ, दुपार आणि रात्रीचे जेवण करायला विसरू नका. हे शरीराच्या पोषणासाठी आणि आपल्या सर्वांगीण विकासासाठी खूप महत्वाचे आहे. अनेक जण रात्रीचे जेवण न करता झोपून जात असले तरी यामागे अनेक कारणे आहेत. काही लोकांना रात्री ऑफिसला आल्यावर इतका कंटाळा येतो की झोपी जातात, तर अनेकांना वाटतं की रात्री जेवलं नाही तर त्यांचं वजन कमी होईल. पण तसे करताना ते कुठेतरी स्वत:चे नुकसान करत आहेत. जाणून घेऊया रात्रीचे जेवण न केल्याने कोणत्या प्रकारचे वाईट परिणाम होऊ शकतात.

रात्रीचे जेवण टाळण्याचे तोटे

जर तुम्ही रात्री जेवण करत नसाल कारण यामुळे तुमचे वजन कमी होईल तर ती मोठी चूक ठरेल, कारण असे केल्याने शरीरात पोषक तत्वांची कमतरता निर्माण होईल आणि शरीर कुपोषणाला बळी पडेल आणि त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होईल. अशा वेळी तुम्हाला अशक्तपणा जाणवू शकतो आणि रक्ताच्या कमतरतेला सामोरे जावे लागू शकते.

स्वयंपाकातील आळशीपणामुळे जर तुम्ही रात्रीचे जेवण खाल्ले नाही तर ते आरोग्यासाठी अजिबात चांगले नाही, ही एक वाईट सवय आहे. आपल्याला वाटतं की झोपताना कुठे एनर्जी लागते? परंतु आपला झोपेत सुद्धा काम करत असतो. अशावेळी झोपेत ऊर्जेची कमतरता जाणवेल आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला अशक्तपणा आणि थकवा येण्याची ही तक्रार होऊ शकते.

जर तुम्ही रात्री अन्न न खाता झोपायला गेलात तर तुम्हाला मध्यरात्री किंवा रात्री उशीरा अचानक भूक लागेल, ज्यामुळे तुम्हाला निवांत झोप मिळू शकणार नाही. तुम्हाला दुसऱ्या दिवशी सुस्ती आणि थकवा जाणवेल. त्यामुळे रात्रीचे जेवण कधीही सोडू नका.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)

अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला.
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?.
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या...
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या....