AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अनवाणी चालण्याचे फायदे ऐकून थक्क व्हाल, डोळ्यांपासून हृदयापर्यंत अनेक चमत्कारी बदल

संशोधनात असे सिध्द झालेय, की जेव्हा आपण जमिनीवर किंवा कोणत्याही गवतावर अनवाणी चालतो तेव्हा आपल्या हृदयाचे ठोके पूर्णपणे सामान्य असतात. हे आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे.

अनवाणी चालण्याचे फायदे ऐकून थक्क व्हाल, डोळ्यांपासून हृदयापर्यंत अनेक चमत्कारी बदल
प्रातिनिधिक फोटो
| Edited By: | Updated on: Feb 08, 2022 | 12:54 PM
Share

मुंबई : आपल्याला नेहमी चालण्याचा सल्ला दिला जात असतो. दररोज किमान अर्धा ते एक तास चालण्यामुळे त्यातून आपल्या शरीराला अनेक फायदे (benefits) मिळत असतात. तसेच कर्करोगासारख्या अनेक असाध्य रोगांपासूनही आपला बचाव होत असतो. त्यामुळे सकाळ- सायंकाळ जेव्हा वेळ मिळेल तेव्हा चालले पाहिजे. त्याच बरोबर अनेकांकडून आपल्याला अनवाणी चालण्याचाही सल्ला दिला जात असतो. अनवाणी चालण्यामुळे (walking) डोळ्यांपासून ते अगदी ह्रदयापर्यंत त्याचे फायदे आहेत. जुने जाणते लोक आपणास अनेकदा अनवाणी चालताना (walking barefoot) दिसतात. त्याबद्दल त्यांच्याकडून अनेक फायदे सांगण्यात येत असतात. धावपळीच्या जीवनात आपण सर्वजण पूर्णपणे व्यस्त झालो आहोत. स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी, आपल्याला सर्वात जास्त निसर्ग उपचाराची गरज आहे. निसर्गोपचार हे निसर्गाच्या अनेक गुणधर्मांनी उपचार करते. आजकाल आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होत आहेत, आपण पृथ्वीच्या इलेक्ट्रॉन्सच्या संपर्कात आल्यावर त्यातून आपल्या शरीराला अनेक फायदे मिळू शकतात, त्याचाच एक भाग म्हणजे अनवाणी चालणे, त्याचे फायदे जाणून घेणार आहोत.

दृष्टी सुधारते

गवतावर अनवाणी चालणे खूप फायदेशीर असते, असे अनेक जण सांगतात. असे केल्याने दृष्टी अधिक तेजस्वी होते. अनवाणी चालण्याने आपल्या पायाच्या तळव्यावरील दाब बिंदू पूर्णपणे सक्रिय होतात. रिफ्लेक्सोलॉजी सायन्सच्या अहवालानुसार, जेव्हा आपण असे चालतो तेव्हा आपल्या पायांचा सर्वात जास्त दबाव बोटांवर पडतो. दुसऱ्या आणि तिसऱ्या बोटांमध्ये जास्तीत जास्त मज्जातंतूचा शेवट असतो, जो दृष्टीसाठी खूप फायदेशीर आहे. त्यामुळे रक्तदाबाची समस्याही दूर होते.

मनाला शांती मिळते

उद्यानात किंवा कुठेही गवतावर अनवाणी चालण्याने मानसिक शांतता मिळत असते. मानसिक आरोग्यासाठी अशा प्रकारे चालणे प्रत्येकासाठी खूप फायदेशीर आहे. अनेक वयस्क मंडळी सायंकाळी गवतावर अनवाणी चालताना दिसतात.

हृदयाची ठोके सुधारतात

एका अभ्यासानुसार, जेव्हा आपण जमिनीवर किंवा गवतावर अनवाणी चालतो तेव्हा आपल्या हृदयाचे ठोके पूर्णपणे सामान्य असतात. हे आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे. ह्रदयाचे ठोके हे हार्मोन्सपासून ते शरीराच्या तापमानापर्यंत अनेक गोष्टींचे नियमन करत असते त्यामुळे त्याचे संतुलन अत्यंत महत्वाचे मानले जाते.

रोगप्रतिकारक शक्ती वाढते

उगवत्या सूर्यासोबत गवतावर किंवा जमिनीवर अनवाणी चालत असाल, तर सूर्यापासून व्हिटॅमिन डी देखील मिळतो. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासोबतच व्हिटॅमिन डी आपल्या शरीरातील अनेक आजार दूर करते, या शिवाय अनवाणी चालण्यामुळे शरीराचे वजन नियंत्रणात राहत असते.

इतर बातम्या

कोरोनातून बरे झालात तरीही डोकेदुखीचं चक्र सुरुच आहे? हे काही घरगुती उपाय फायद्याचे ठरू शकतात!

पुन्हा लॉकडाऊन! चीनमधील कोणत्या शहरात लॉकडाऊनचा निर्णय? रुग्णवाढीचा आकडा पाहून चकीतच व्हाल

Diabetes tips: अचानक शुगर लेव्हल वाढली असेल तर आताच करा काही घरगुती उपचार, शुगर येईल लवकरच नियंत्रणात!

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.