AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आई आणि बाळाच्या चांगल्या आरोग्यासाठी नारळ पाणी बेस्ट! जाणून घ्या गरोदरपणामध्ये नारळ पाणी पिण्याचे 10 फायदे

आई आणि गर्भातील बाळाच्या आरोग्यासाठी पोषक आहाराची गरज असते. डॉक्टर पण महिलांना पोषण आणि सकर आहार घेण्याचा सल्ला देतात. कुटुंबातील सदस्यही गरोदर महिलेची विशेष काळजी घेतात. नारळ पाणी हे निरोगी राहण्यासाठी खूप फायदेशीर आहे.

आई आणि बाळाच्या चांगल्या आरोग्यासाठी नारळ पाणी बेस्ट! जाणून घ्या गरोदरपणामध्ये नारळ पाणी पिण्याचे 10 फायदे
नारळ पाणी
| Edited By: | Updated on: Feb 25, 2022 | 4:17 PM
Share

मुंबई :   गरोदरपणात (Pregnancy) महिलांच्या शरीरात खूप बदल घडतात. हार्मोन्स बदल्यामुळे मानसिक आणि शारीरिक बदल जाणवतात. गरोदरपणातील हे 9 महिने फार महत्त्वाचे आणि नाजूक असतात. आई आणि गर्भातील बाळाच्या आरोग्यासाठी (Health) पोषक आहाराची गरज असते. डॉक्टर पण महिलांना पोषण आणि सकर आहार घेण्याचा सल्ला देतात. कुटुंबातील सदस्यही गरोदर महिलेची विशेष काळजी घेतात. नारळ पाणी (Coconut water) हे निरोगी राहण्यासाठी खूप फायदेशीर आहे. अँसिडिटीसाठी नारळ पाणी फायदेशीर आहे. नारळ पाण्यामध्ये असलेले गुणधर्म शरीरासाठी आवश्यक असतात. एक कप नारळ पाणी घेतल्यास 46 कॅलरी, 9 ग्रॅम कार्ब, 3 ग्रॅम फायबर आणि 2 ग्रॅम प्रोटीन मिळतं. रोज नारळ पाणी पिण्याऱ्यास 10 टक्के व्हिटॅमिन सी, 15 टक्के मॅग्नेशियम, 17 टक्के मॅगनी, 17 टक्के पोटॅशियम, 11 टक्के सोडियम आणि 6 टक्के कॅल्शियम मिळतं. मग गरोदरपणामध्ये नारळ पाणी पिणे फायदेशीर असतं ते आज आपण जाणून घेणार आहोत.

1. बाळासाठी फायदेशीर – नारळ पाण्यातील गुणधर्म हे गर्भातील बाळाचा विकासासाठी खूप फायदेशीर असतं. 2. गरोदरपणामुळे महिलांना मार्निंग सिकनेससाठी नारळ पाणी उत्तम असतं. या दिवसांमध्ये महिलांना उलटीचा त्रास होतो. या समस्यांवर नारळ पाणी उपयुक्त ठरतं. 3. नारळ पाणी हे इम्युनिटी बूस्टर आहे. त्यामुळे नारळ पाणीचं सेवन केल्यास तणाव नाहीसा होतो. या दिवसांमध्ये जाणविणारा थकवा आणि कमजोरी दूर होते. 4. नारळ पाणी रोज प्यायलाने पाचनसंस्था मजबूत राहते. 5. गरोदरपणात बद्धकोष्ठता समस्या दूर करण्यासाठी नारळ पाणी हे खूप फायदेशीर ठरतं. 6. गरोदरपणामध्ये महिलांच्या शरीरात पाण्याची कमी नारळ पाणी प्यायलामुळे दूर होते. 7. या दिवसांमध्ये महिलांना चक्कर येणे, डोकेदुखी होते. या समस्येवरही नारळ पाणी पिणे फायदेशीर ठरतं. 8. नारळ पाणी रोज प्यायलाने महिलांना युरिन इंफेक्शनची समस्या होत नाही. 9. ज्या महिलांना अँसिडिटीचा त्रास असतो त्यांचासाठी रोज सकाळी उपाशीपोटी नारळ पाणी पिणे चांगले असते. 10. सर्वात महत्त्वाचं गरोदरपणामध्ये महिलांना वजन वाढण्याची भीती वाटते. नारळ पाणी प्यायलाने महिलेचे वजन वाढत नाही.

टीप : या बातमीतील आरोग्यविषयक सल्ला प्राथमिक माहितीच्या आधारावर आहे, या माहितीचा वापर करण्यापूर्वी आपल्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्यावा.

संबंधित बातम्या

तुम्हाला हार्ट अ‍टॅक येणार की नाही, हे आता तीन वर्ष आधीच समजू शकतं, कसं ते समजून घ्या?

झटक्यात वजन कमी आटोक्यात आणायचंय? पाच प्रकारची पेय ठरतील उपयुक्त

मधुमेहाच्या रुग्णांनी नारळ पाणी प्यावे का? तुमचाही गोंधळ होतोय, जाणून घ्या ‘फॅक्ट’

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.