AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रिकाम्या पोटी चहा पिण्याचे दुष्परिणाम!

रिकाम्या पोटी चहा अजिबात पिऊ नये, असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. खरं तर चहाचा pH Value 6 असतो, ज्यामुळे रिकाम्या पोटी चहा प्यायल्यावर आतड्यात एक थर तयार होऊ लागतो. त्यामुळे त्याआधी कोमट गरम पाणी प्यावे. असे केल्याने चहाचा अम्लीय प्रभाव कमी होतो आणि पोटही खराब होत नाही.

रिकाम्या पोटी चहा पिण्याचे दुष्परिणाम!
tea cupsImage Credit source: freepik
| Updated on: May 13, 2023 | 3:48 PM
Share

मुंबई: असे अनेक लोक असतात ज्यांना सकाळी सर्वात आधी चहा प्यायला आवडतो. चहाशिवाय आपला दिवस सुरू होऊ शकत नाही, असे त्यांना वाटते. पण रिकाम्या पोटी आणि शिळ्या तोंडाने चहा पिणे योग्य आहे का? रिकाम्या पोटी चहा अजिबात पिऊ नये, असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. खरं तर चहाचा pH Value 6 असतो, ज्यामुळे रिकाम्या पोटी चहा प्यायल्यावर आतड्यात एक थर तयार होऊ लागतो. त्यामुळे त्याआधी कोमट गरम पाणी प्यावे. असे केल्याने चहाचा अम्लीय प्रभाव कमी होतो आणि पोटही खराब होत नाही. आज आम्ही तुम्हाला सकाळी चहा पिण्याचे तोटे सांगत आहोत.

रिकाम्या पोटी चहा पिण्याचे दुष्परिणाम

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, सकाळी रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने गॅस-अॅसिडिटीची समस्या वाढते. जर तुम्ही नियमितपणे असे करत असाल तर तुमच्या पोटात अॅसिडचे प्रमाण वाढू लागते आणि आरोग्य बिघडण्यास सुरुवात होते. सकाळी रिकाम्या पोटी चहा प्यायल्यानेही तुमचे दात खराब होतात. यामुळे दातांचा बाहेरचा थर खराब होऊन त्यात किडण्याचा धोका वाढतो.

शरीरात पाण्याची कमतरता जाणवू शकते

सकाळी रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने शरीरात पाण्याची कमतरता आणि शरीरात डिहायड्रेशन होऊ शकते. यामुळे तुम्हाला चक्कर येऊ शकते आणि बद्धकोष्ठता आणि गॅसची समस्या वाढू शकते. त्यामुळे चहाच्या आधी पाणी प्यावे. तसेच चहाबरोबर काहीतरी खाण्याची सवय लावा, अन्यथा तुमचे पोट बिघडू शकते.

चहाच्या आधी पाणी कधी प्यावे?

सकाळी चहा पिण्यापूर्वी कोमट पाणी पिणे किती वेळ योग्य आहे, या प्रश्नाने अनेकजण संभ्रमात असतात. तज्ज्ञांच्या मते, सकाळी चहा पिण्याच्या 10-15 मिनिटे आधी पाणी पिणे योग्य मानले जाते. असे केल्याने चहाचा अम्लीय परिणाम शरीरावर खूप कमी होतो. चहा प्यायल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये याची विशेष काळजी घ्या.

आपण दररोज किती वेळा चहा प्यावा?

चहा प्यायल्यानंतर पाणी प्यावंसं वाटत असेल तर साधारण अर्धा तास वेळ द्या. यानंतरच तुम्ही पाणी प्या किंवा काही थंड पदार्थ किंवा फळे खा. तसे न केल्यास दात किडणे किंवा सर्दीच्या समस्येला सामोरे जावे लागू शकते. दिवसभरात किती चहा प्यावा याबद्दलही अनेकजण संभ्रमात असतात. दिवसभरात जास्तीत जास्त एक ते दोन कप चहा प्यायला हवा, त्यापेक्षा जास्त नाही. असे केल्याने पोटाचे नुकसान होऊ शकते.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)

Follow Us
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार.
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण.
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक...
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक....
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल.
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण.
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?.
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी.
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी.
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?.
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण.