AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Harmful | स्मार्टफोनच्या अति वापरामुळे खुंटतो मुलांच्या मेंदूचा विकास, भविष्यात होऊ शकतात अनेक मोठे तोटे!

आजकाल, आई वडील स्वतःच्या सोयीसाठी आपल्या मुलांचा मोबाईल टेकवतात. यामुळे लहान मुलांना मोबाईलची अशी सवय लागली आहे की, ते त्यावर तासन् तास गेम खेळत राहतात.

Harmful | स्मार्टफोनच्या अति वापरामुळे खुंटतो मुलांच्या मेंदूचा विकास, भविष्यात होऊ शकतात अनेक मोठे तोटे!
स्मार्टफोनच्या अति वापरामुळे खुंटतो मुलांच्या मेंदूचा विकास
| Updated on: Feb 15, 2021 | 3:03 PM
Share

मुंबई : आजकाल, आई वडील स्वतःच्या सोयीसाठी आपल्या मुलांचा मोबाईल टेकवतात. यामुळे लहान मुलांना मोबाईलची अशी सवय लागली आहे की, ते त्यावर तासन् तास गेम खेळत राहतात. जर आपल्या मुलासही मोबाईलचे असे व्यसन लागले असेल, तर त्याची ही सवय आतापासूनच मोडण्याचा प्रयत्न करा. अन्यथा भविष्यात त्याला मोठ्या संकटांचा सामना करावा लागू शकतो (Excess use of smartphone can stop growth of your childs brain).

अनेक संशोधनात असे दिसून आले आहे की, स्मार्टफोनच्या वापराचा परिणाम मुलांच्या मेंदूवर, तसेच त्यांच्या डोळ्यांच्या विकासावर होतो. जर 10 वर्षांपर्यंतची मुले स्मार्टफोन सतत सात तास किंवा त्याहून अधिक काळ वापरत असतील, तर त्यांच्या मेंदूचा बाह्य थर, ज्याला कॉर्टेक्स म्हणतात, तो पातळ होऊ लागते. ज्याचा त्यांच्या मेंदूच्या वाढ होण्यावर नकारात्मक प्रभाव पडतो. यामुळे मेंदूत वाढ देखील थांबू शकते.

यामुळे मेंदूत ग्रे-मॅटरची घनताही कमी होऊ शकते. स्मरणशक्ती, लक्ष, जागरूकता, विचार, भाषा आणि चैतन्य यात ग्रे मॅटर या घटकाची महत्वाची भूमिका असते. याशिवाय स्मार्टफोनच्या अति वापरामुळे मुलांच्या डोळ्यात कोरडेपणा देखील येऊ शकतो. मुले जेव्हा मोबाईलवर एखादा गेम खेळतात, तेव्हा ते बराच वेळ त्यावर टिकून राहतात. असा प्रकरणात, बर्‍याच दिवसांपासून मुलांच्या डोळ्यांची व्यवस्थित हालचाल होत नाही. यामुळे डोळ्यात कोरडेपणा, लालसरपणा आणि डोळ्यातून सतत पाणी येणे, या समस्या उद्भवू शकतात (Excess use of smartphone can stop growth of your childs brain).

‘या’ टिप्स मुलांना मोबाईलच्या व्यसनापासून मुक्त होण्यास मदत करतील!

– मुलांना मोबाईलवर खेळण्यासाठी एक निश्चित वेळ द्या. या वेळेच्या नियमाबद्दल आपण कठोर असले पाहिजे.

– मुलांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करा. त्यांच्याशी बोला, त्यांना कथा सांगा. क्विझ आणि मेंदूला चालना देणारे असे बरेच गेम खेळा.

– मुलांना मैदानी खेळांमध्ये व्यस्त ठेवा. यामुळे मोबाईलकडे त्यांचे लक्ष कमी होईल.

– रात्री झोपत असताना मुलांना मोबाईल देऊ नका. झोपेच्या वेळी चांगल्या गोष्टी सांगा. झोपेच्या वेळी केल्या गेलेल्या क्रियाकलापांच्या खुणा आपल्या मेंदूत प्रकाशित राहतात. यामुळे, सकाळी उठल्याबरोबर प्रथम त्याच गोष्टीकडे आपले लक्ष वेधले जाते. अशा परिस्थितीत, जर तुम्ही त्यांच्याशी चांगल्या प्रकारे बोललात तर त्याचा सकारात्मक परिणाम होईल.

– अन्न खाताना मोबाईल पाहण्याची सवय सोडून द्या. यामुळे मुलांच्या मनात खाण्याचा विचार येत नाही आणि बर्‍याच वेळा ते गरजेपेक्षा जास्त खातात, किंवा कधीकधी व्यवस्थित खात देखील नाहीत. दोन्ही प्रकरणांमध्ये त्यांना त्रास सहन करावा लागू शकतो.

(Excess use of smartphone can stop growth of your childs brain)

हेही वाचा :

Follow Us
नाशिक धर्मांतर प्रकरणात मोठी घडामोड! धर्मांतर, हिजाब ट्रेनिंग.....
नाशिक धर्मांतर प्रकरणात मोठी घडामोड! धर्मांतर, हिजाब ट्रेनिंग......
अखेर ठरलं! हा नेता होणार पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री
अखेर ठरलं! हा नेता होणार पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री.
तामिळनाडूत राजकीय खळबळ! थलपती विजय सरकार स्थापनेच्या उंबरठ्यावर?
तामिळनाडूत राजकीय खळबळ! थलपती विजय सरकार स्थापनेच्या उंबरठ्यावर?.
मी पालकमंत्र्यांना काडीमात्र भाव देत नाही, पालकमंत्री पोलीस आहेत का?
मी पालकमंत्र्यांना काडीमात्र भाव देत नाही, पालकमंत्री पोलीस आहेत का?.
TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान गरोदर?
TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान गरोदर?.
निदा खान प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट... एमआयएमचा नगरसेवक सहआरोपी
निदा खान प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट... एमआयएमचा नगरसेवक सहआरोपी.
नाशिक TCS प्रकरणातील मास्टरमाईंडला बेड्या; 42 दिवस पोलिसांना गुंगारा..
नाशिक TCS प्रकरणातील मास्टरमाईंडला बेड्या; 42 दिवस पोलिसांना गुंगारा...
जय पवारांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट....
जय पवारांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट.....
बदलापूरनंतर गोवंडीत संतापजनक घटना; शाळेतील शिपायाकडून 6 वर्षीय....
बदलापूरनंतर गोवंडीत संतापजनक घटना; शाळेतील शिपायाकडून 6 वर्षीय.....
दहावीच्या निकालात कोकण विभाग पुन्हा अव्वल; राज्याचा निकाल 92.09 टक्के
दहावीच्या निकालात कोकण विभाग पुन्हा अव्वल; राज्याचा निकाल 92.09 टक्के.