AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ही फळं खालं तर तंदुरुस्त व्हाल, आजारांशी लढण्याचीही मिळेल ताकद

काही फळांच्या सेवनाने इम्युनिटी तर वाढतेच पण आपण तंदुरुस्तही होतो. त्यांचे नियमित सेवन आपल्यासाठी फायदेशीर ठरते.

ही फळं खालं तर तंदुरुस्त व्हाल, आजारांशी लढण्याचीही मिळेल ताकद
Image Credit source: freepik
| Updated on: Jun 15, 2023 | 6:15 PM
Share

Vitamin C Rich Fruits : आपल्या शरीराचे संरक्षण करण्यासाठी व्हिटॅमिन सी (Vitamin C) खूप महत्वाचे आहे. व्हिटॅमिन सी हे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते. व्हिटॅमिन सी पुरेशा प्रमाणात सेवन केल्यास हृदयाशी संबंधित रोग, आरोग्य समस्या आणि त्वचेशी संबंधित समस्या दूर राहण्यास मदत होते. व्हिटॅमिन सी संपूर्ण आरोग्यास चालना देते. व्हिटॅमिन सी जखमा लवकर भरून काढण्यासाठी खूप उपयुक्त आहे.

तसेच व्हिटॅमिन सी मुळे , कूर्चा, हाडे आणि दातांची झीज कमी होते. संत्र्यामध्ये सर्वात जास्त व्हिटॅमिन सी असते असे सर्वसाधारणपणे समजले जाते. पण आपण अशा अनेक फळांबद्दल जाणून घेऊया ज्यात संत्र्यापेक्षा जास्त व्हिटॅमिन सी असते आणि ती लिंबूवर्गीय फळे नाहीत.

पेरू

पेरू हे भारताच्या कानाकोपऱ्यात आढळणारे फळ आहे. पेरूमध्येही संत्र्यापेक्षा जास्त व्हिटॅमिन सी असते. 100 ग्रॅम पेरूमध्ये 228 मिलीग्राम व्हिटॅमिन सी आढळते.

अननस

अननस हे अतिशय चविष्ट फळ आहे. ते जितके चवदार असेल तितकेच ते व्हिटॅमिन सीने भरलेले असते. 100 ग्रॅम अननसात 48 मिलीग्राम व्हिटॅमिन सी असते. यामध्ये अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट असतात जे रोगांशी लढण्यासाठी उपयुक्त असतात.

आंबा

आंब्याला फळांचा राजा म्हटलं जातं. सध्या सर्वत्र आंब्यांचा घमघमाट आहे. आंब्यामध्ये व्हिटॅमिन सी देखील मुबलक प्रमाणात ढळते. 100 ग्रॅम आंब्यामध्ये 36 मिलीग्राम व्हिटॅमिन सी आढळते. आंब्यामध्ये फायबरही भरपूर प्रमाणात असते.

कीवी

किवीला चायनीज गूसबेरी असेही म्हणतात. किवी हे एक अतिशय चवदार फळ आहे जे थोडेसे आंबट असते. त्यात 93 मिलीग्राम व्हिटॅमिन सी आढळते. किवीमुळे रोगप्रतिकारशक्ती देखील वाढते आणि ते कोलेस्ट्रॉल देखील कमी करते.

या फळांच्या नियमित सेवनाने तुम्हाला पोषण मिळेल, व्हिटॅमिन सी चे प्रमाणही वाढेल आणि रोगप्रतिकारक शक्तीही खूप वाढेल.

Follow Us
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही.
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?.
ठाकरेंच्या काळात पाणी दिलं हा आरोप दिशाभूल करणारा
ठाकरेंच्या काळात पाणी दिलं हा आरोप दिशाभूल करणारा.
पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत फडणवीसांचं मोठं विधान
पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत फडणवीसांचं मोठं विधान.
लॉकडाऊन लागणार नाही, अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार - CM फडणवीस
लॉकडाऊन लागणार नाही, अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार - CM फडणवीस.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सभागृहात गोंधळ; ठाकरेंच्या नगरसेवकांना...
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सभागृहात गोंधळ; ठाकरेंच्या नगरसेवकांना....
बुलढाणा चांदी बाजारात मंदी; LPGच्या तुटवड्यामुळे दागिन्यांचे काम ठप्प
बुलढाणा चांदी बाजारात मंदी; LPGच्या तुटवड्यामुळे दागिन्यांचे काम ठप्प.
राजकारण संपल्यानंतर काय करणार? पंकजा मुंडे यांचं मोठं विधान काय?
राजकारण संपल्यानंतर काय करणार? पंकजा मुंडे यांचं मोठं विधान काय?.
सुप्रिया सुळेंच्या त्या वक्तव्यावर काँग्रेसची टीका; फडणवीस यांच्या....
सुप्रिया सुळेंच्या त्या वक्तव्यावर काँग्रेसची टीका; फडणवीस यांच्या.....
पुन्हा लॉकडाऊन?केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींचं ट्विट काय
पुन्हा लॉकडाऊन?केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींचं ट्विट काय.