AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

थंडीच्या दिवसात छातीत कफ झाला? ‘हे’ घरगुती उपाय करून पाहा

जास्त जड अन्न, वेळेवर न खाणे किंवा औषधे घेणे आणि पाण्याची कमतरता ही कफ जास्त होण्याची कारणे आहेत. थंडीत कफ झाल्यास पोट नीट साफ होत नाही आणि आतड्यांच्या हालचालींमध्ये खूप त्रास होतो. यावर मात करण्यासाठी काही घरगुती उपाय खूप प्रभावी आहेत.

थंडीच्या दिवसात छातीत कफ झाला? 'हे' घरगुती उपाय करून पाहा
cough
| Edited By: | Updated on: Jan 02, 2025 | 1:07 PM
Share

हिवाळा सुरु झाला की अनेकांना या दिवसांमध्ये हंगामी आजारपण होत असतात. अश्यातच थंडीत सर्वात जास्त समस्या ही कफ होण्याची होत असते. लहान मुलांपासून ते वृद्धांना या समस्यांना सामोरे जावे लागते. तर काहीजण असे ही आहेत ज्यांना थंडीत थंड पदार्थ खाल्याने सुद्धा त्यांना कफ लगेच होतात. तर कफामुळे पोट नीट साफ होत नाही आणि यामुळे दिवसभर पोटात दुखणे, मळमळ सारखं वाटणे अश्या समस्या उद्भवू लागतात. ज्यामुळे दिवसभरात आपल्या कामात लक्ष लागत नाही.

हिवाळ्यात कफ समस्या होण्याची सामान्य

कफामुळे आतड्यात घाण जमा होते आणि पचनसंस्थेवर याचा परिणाम होत असतो. त्यामुळे ही समस्या कायम राहिल्यास स्थिती गंभीर देखील होऊ शकते. यामुळे मूळव्याधाचा धोकाही वाढतो. हिवाळ्यात कफ समस्या होण्याची  आणखीनच वाढते, कारण या दिवसात आपण तळलेले आणि मसालेदार पदार्थांचे सेवन जास्त करतो. तर दुसरीकडे थंडीच्या दिवसात पाणी कमी प्रमाणात पित असतो म्हणून या दिवसात ज्यांना आधीच कफ आहे त्या लोकांची समस्या वाढते.

थंडीत कफ होणे ही सामान्य समस्यांपैकी एक आहे, ज्याचा कधीकधी अनेकांना खूप त्रास होत असतो, परंतु काही लोकांना हिवाळा असो वा नसो कफाची समस्या कायम असते. यासाठी तेलकट आणि मसालेदार असलेले अन्न कमी करण्याबरोबरच चांगल्या प्रमाणात पाणी प्यावे आणि आहारात फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करा. अशातच या समस्येपासून तुम्हाला या काही घरगुती टिप्स कफ न होण्यापासून आराम देऊ शकतात चला तर मग जाणून घेऊयात.

कफाची समस्या दूर करण्यासाठी उपाय प्रभावी

स्वयंपाकघरात असलेल्या मसाल्यांमध्ये बडीशेप पचनासाठी खूप फायदेशीर मानली जाते. जेवण झाल्यानंतर अर्धा चमचा बडीशेप चावून खाल्ल्याने पचनक्रिया व्यवस्थित होण्यास मदत होते. तसेच कफापासून मुक्ती मिळवण्यासाठी दररोज सकाळी बडीशेपचे पाणी प्यावे. तसेच ओवा आणि जिरे समप्रमाणात घेऊन त्यात अर्ध्या प्रमाणात मेथीदाणे घ्या आणि चांगले भाजून घ्यावेत. यात थोडे काळे मीठ सुद्धा मिक्स करा. सर्व साहित्य बारीक करून पावडर तयार करून हवाबंद डब्यात साठवून ठेवा. हे मिश्रण रोज अर्धा चमचा कोमट पाण्याबरोबर घेतल्याने त्याचा परिणाम तुम्हाला काही दिवसांतच दिसू लागेल.

तीव्र कफासाठी घ्या त्रिफळा चूर्ण

कफाची समस्या कायम राहिल्यास त्यापासून आराम मिळण्यासाठी आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे चूर्ण म्हणजे त्रिफळाचे चूर्ण याचे सेवन करा. हे तीन आयुर्वेदिक फळांची पावडर आहे जे तीव्र कफाची समस्या दूर करण्यासाठी देखील प्रभावी मानले जाते. हे चूर्ण रोज कोमट पाण्यासोबत घेतल्यास लवकर आराम मिळतो. यासोबतच त्रिफळा चूर्णाचे इतरही अनेक फायदे आहेत. ज्याने तुम्ही तंदुरुस्त राहता.

पपई खाणे फायदेशीर

कफापासून सुटका मिळवण्यासाठी पिकलेल्या पपईचा आहारात समावेश करा. रोज थोडीशी पपई खाल्ल्याने अनेक पोषक तत्वे तर मिळतातच, शिवाय पपई ल्यूब्रिकेंट म्हणूनही काम करते, ज्यामुळे कफापासून सुटका होण्यास मदत होते.

अशा प्रकारे प्या दूध

रात्री आठ ते दहा मनुके पाण्यात भिजवून सकाळी त्यातील बिया काढून टाका. आता एका भांड्यात दूध घेऊन त्यात मनुके घालून दूध उकळून घ्या. हे दूध कोमट झाल्यावर प्या. रोज अशा प्रकारे दूध प्यायल्याने कफाची समस्या दूर होते.

(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.