AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health Tips : किडनी खराब झाली हे कसं कळतं? कोणत्या ब्लड टेस्ट करणं आवश्यक? जाणून घ्या

किडनीचा आजार जडला की आयुष्य असून नसल्यासारखं होतं. कारण किडनी आपल्या शरीरात फिल्टरचं काम करते. पण एकदा किडनी खराब झाली की त्याचे परिणाम संपूर्ण शरीरावर दिसून येातत. यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काही ब्लड टेस्ट करणं गरजेचं आहे. निदान लवकर झालं तर उपचार करणं सोपं होतं.

Health Tips : किडनी खराब झाली हे कसं कळतं? कोणत्या ब्लड टेस्ट करणं आवश्यक? जाणून घ्या
रक्त तपासणीImage Credit source: Getty Images
| Updated on: Jun 12, 2025 | 3:50 PM
Share

मानवी आयुष्य हे आरोग्यम् धनसंपदा या श्लोकावरून अधोरेखित होतं. तुम्हाला कसला आजार नसेल तर तुम्ही चांगलं आयुष्य जगता. पण एकदा का आजाराशी सामना पडला तर पूर्ण बरं होण्यासाठी धडपड सुरु होते. मानवी शरीरातील किडनी हा महत्त्वाचा भाग आहे. यामुळे रक्ताभिसरण प्रक्रिया सुलभ होते. शरीरातून विषारी पदार्थ बाहेर काढण्याचं, तसेच पाणी आणि मीठाचं प्रमाण संतुलित राखण्याचं कामं किडनीद्वारे होते. रक्तदाब नियंत्रित करण्याचं कामही किडनीकडूनच होतं. पण सध्याची जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयी, मधुमेह आणि उच्च रक्तदाबामुळे किडनीच्या आजारांना सामोरं जावं लागतं. सुरुवातीच्या टप्प्यात किडनी संदर्भातील आजार लक्षात येत नाही. यामुळे वेळोवेळी रक्त तपासणी करणं गरजेचं आहे. वयाच्या चाळीशीनंतर नियमित रक्त तपासणी करणं योग्य ठरतं.

पब्लिक हेल्थ एक्सपर्ट डॉ. समीर भाटी यांच्या मते किडनी खराब असल्याची लक्षणं हळूहळू समोर येतात. सुरुवातीला शरीरात फार काही बदल दिसत नाही. नंतर त्यात वेगाने बदल दिसून येतो. वेळीच त्याचं निदान केलं नाही तर पुढे जाऊन आणखी त्रास वाढू शकतो. पायाला सूज येणे, मूत्रातून फेस येणं तसेच रंग बदलणं, वारंवार लघवीला येणं (खासकरून रात्रीच्या वेळी), थकवा जाणवणे, श्वास घेण्यात अडचण, भूक न लागणे, त्वचेला खाज सुटणे अशी काही लक्षणं दिसून आल्यास डॉक्टरांची सल्ला घेणं आवश्यक आहे. किडनीत काही समस्या असेल तर काही रक्त चाचण्या करणं आवश्यक आहे. डॉ. समीर भाटी यांनी किडनी संदर्भातील काही रक्त तपासण्याची माहिती दिली आहे.

सीरम किएटिनिन टेस्ट : या तपासणीच्या माध्यमातून किडनी कार्य तपासलं जातं. क्रिएटिनिन एक टाकाऊ पदार्थ असून स्नायूंच्या हालचाली दरम्यान तयार होतो. तसेच मूत्रपिंडातून बाहेर टाकला जातो. रक्तातील क्रिएटिनिनची पातळी वाढली तर किडनी निकामी होण्याचे लक्षण असू शकतं.

सामान्य श्रेणी- पुरुषांमध्ये 0.7 – 1.3 मिलीग्राम/डेसीएल आणि महिलांमध्ये 0.6 – 1.1 मिलीग्राम/डेसीएल

ब्लड युरिया नायट्रोजन टेस्ट : युरिया प्रोटीनच्या विघटनानंतर तयार होणारा पदार्थ आहे. या मात्रा रक्तात आढळून येते. जर याची मात्रा वाढली असेल तर किडनी काही समस्या असण्याचे संकेत आहेत.

सामान्य श्रेणी -7 – 20 मिलीग्राम/डेसीएल

ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट टेस्ट : या टेस्टमुळे तुमची किडनी रक्ताभिसरण प्रक्रिया योग्य पद्धतीने करते की नाही याबाबत कळतं. यात क्रिएटिनिन लेव्हल, वय, लिंग आणि वंशाच्या आधारावर कॅलक्युलेट केलं जातं. जीपीआर कमी असेल तर किडनीत काही समस्या असल्याचं ग्राह्य धरलं जातं.

किडनी फंक्शन टेस्ट : या टेस्टमध्ये रक्तातील अनेक पॅरामीटर तपासले जातात. यात क्रिएटिनिन, बीयूएन, यूरिक एसिड याची तपासणी होते. यामुळे किडनीच्या आरोग्याचा अंदाज येतो.

यूरिक एसिड टेस्ट : यूरिक एसिड बाहेर काढण्यास किडनी अकार्यक्षम ठरत असेल. तर त्याचं प्रमाण रक्तात वाढतं. यामुळे मुतखडा होण्याची शक्यता असते.

सामान्य श्रेणी : पुरुषांमध्ये 3.4 – 7.0 मिलीग्राम/डेसीएल, महिलांमध्ये 2.4 – 6.0 मिलीग्राम/डेसीएल

(डिस्क्लेमर: ही माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आली आहे. त्यामुळे आरोग्याशी संबंधित कोणताही बदल करण्यापूर्वी किंवा कोणत्याही आजाराशी संबंधित उपाय करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

अजितदादा प्लास्टिक बॉटल ऐवजी काचेची बॉटल का वापरत होते?
अजितदादा प्लास्टिक बॉटल ऐवजी काचेची बॉटल का वापरत होते?.
अजितदादांच्या विमान अपघाताबाबत मला शंका, रोहित पवारांचा खळबळजनक दावा
अजितदादांच्या विमान अपघाताबाबत मला शंका, रोहित पवारांचा खळबळजनक दावा.
अजितदादांच्या विमान अपघातावर रोहित पवारांचा मोठा दावा
अजितदादांच्या विमान अपघातावर रोहित पवारांचा मोठा दावा.
नारायण राणे यांची तब्येत बिघडली, मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल
नारायण राणे यांची तब्येत बिघडली, मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल.
अजित पवार यांनी सांगितलेल्या 3 निर्णयावर कॅबिनेट बैठकीत शिक्कामोर्तब
अजित पवार यांनी सांगितलेल्या 3 निर्णयावर कॅबिनेट बैठकीत शिक्कामोर्तब.
चंद्रपुरात भाजप- ठाकरे गटाची हातमिळवणी, सुषमा अंधारे यांचे मोठे विधान
चंद्रपुरात भाजप- ठाकरे गटाची हातमिळवणी, सुषमा अंधारे यांचे मोठे विधान.
अगोदर दिल्लीत बैठक, आता विलीनीकरणार फडणवीसांचे मोठे भाष्य
अगोदर दिल्लीत बैठक, आता विलीनीकरणार फडणवीसांचे मोठे भाष्य.
अजित पवारांच्या शेवटच्या सभेच्या ठिकाणी काय लागला निकाल?
अजित पवारांच्या शेवटच्या सभेच्या ठिकाणी काय लागला निकाल?.
सुनेत्रा पवारांनी पदभार स्वीकारताच रोहित पवार यांचं ट्विट
सुनेत्रा पवारांनी पदभार स्वीकारताच रोहित पवार यांचं ट्विट.
जिल्हा परिषदेत महायुती सुस्साट, मविआचा सुपडा साफ
जिल्हा परिषदेत महायुती सुस्साट, मविआचा सुपडा साफ.