AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health : हिवाळा सुरू होतोय, किती प्रमाणात पाणी घ्यावं? जाणून घ्या!

जर तुम्ही योग्य प्रमाणात पाणी प्यायला तर तुमची त्वचा कोरडी पडत नाही. तर आता आपण हिवाळ्यात पाणी किती प्यावे आणि पाणी पिण्याचे फायदे काय आहेत याबाबत जाणून घ्या.

Health : हिवाळा सुरू होतोय, किती प्रमाणात पाणी घ्यावं? जाणून घ्या!
Image Credit source: freepik
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Oct 24, 2023 | 7:38 PM
Share

मुंबई : सध्या हिवाळ्याचे दिवस सुरू झाले असून या दिवसांमध्ये बहुतेक लोक पाण्याचे सेवन कमी प्रमाणात करतात. तसेच हिवाळ्यात जास्त तहानही लागत नाही त्याच्यामुळे लोक पाणी जास्त पीत नाहीत. पण शरीरामध्ये पुरेसं पाणी असणं खूप गरजेचे आहे. त्यामुळे पाणी पिणे खूप आवश्यक आहे. पण हिवाळ्यात लोक जास्त पाणी पीत नाहीत त्यामुळे त्यांना अनेक गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो. हिवाळ्यामध्ये सर्वांना कोरड्या त्वचेचा सामना मोठ्या प्रमाणात करावा लागतो.

हिवाळ्याच्या दिवसांमध्ये तुम्ही दिवसातून आठ ते दहा ग्लास पाणी पिणे खूप गरजेचे आहे. यामुळे आपले शरीर निरोगी राहते तसेच आपल्याला फ्रेश राहण्यास मदत होते. त्यामुळे दिवसातून आठ ते दहा ग्लास पाणी पिणे खूप गरजेचे आहे. पण बहुतेक यापेक्षा जास्त पाणी देखील पितात. पण प्रत्येकाची शरीराची रचना वेगवेगळी असते, त्यामुळे तुम्ही पाणी पिताना किती ग्लास पाणी प्यायला हे लक्षात ठेवा आणि त्यानुसार पाणी प्या. योग्य प्रमाणात पाणी पिणे आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरते.

हिवाळ्याच्या दिवसांमध्ये आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी तीन लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. तसेच आपल्या शरीरातील पाण्याची गरज आपले वय, शारीरिक हालचाली, गर्भधारणा यानुसार बदलत असते. त्यामुळे आपल्या शरीराच्या रचनेनुसार पाणी पिणे गरजेचे आहे. तसेच आपल्या शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे आपल्याला गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे पाणी पिणे खूप गरजेचे आहे. तसेच हिवाळ्याच्या दिवसांमध्ये तुम्ही गार पाण्यापेक्षा कोमट पाणी पिले तर ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

आपल्या शरीरात पाण्याची कमतरता असेल तर आपले शरीर कमजोर होते. आपण पाणी कमी पिले तर त्याच्या आपल्या शरीराच्या कार्यावर परिणाम होतो. तसेच आपल्या शरीराला योग्य प्रकारे ऑक्सिजन मिळत नाही, डिहायड्रेशन, थकवा किडनीवर परिणाम होणे यासारख्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे जास्त पाणी खूप गरजेचे आहे.

पाणी पिताना कधीही उभं राहून पिऊ नये. तसंच तुम्ही आत्तापर्यंत पाहिलं असेल की मॅरेथॉन मधील धावपटू धावत असताना पाणी पितात. याबाबत तज्ज्ञांनी सांगितलं आहे की, ते धावताना पाणी पीत असले तरी ते मोकळेपणाने पितात. त्यामुळे पाणी पिताना ते मोकळेपणाने प्या, घाईघाईने पिऊ नका.

Follow Us
खासदार निधीच्या आरोपांवर ओमाराजेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले एक रुपय
Omraje Nimbalkar | खासदार निधीच्या आरोपांवर ओमाराजेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले एक रुपयाही...
ठाकरेंच्या 6 फुटीर खासदारांबाबत सर्वात मोठी अपडेट! महाराष्ट्र नाही आता
ठाकरेंच्या 6 फुटीर खासदारांबाबत सर्वात मोठी अपडेट! महाराष्ट्र नाही आता दिल्लीतील...नेमका निर्णय काय?
कोण होतास तू, काय झालास तू...; विधानसभेत शिंदेंकडून टोलेबाजी
Eknath Shinde On Thackeray | कोण होतास तू, काय झालास तू...; विधानसभेत शिंदेंकडून कविता म्हणत टोलेबाजी
कोस्टल रोडवर अपघात अन् मुंबई ठप्प! वरळी ते नरिमन पॉईंटपर्यंत...
Coastal Road Accident | कोस्टल रोडवर अपघात अन् मुंबई ठप्प! वरळी ते नरिमन पॉईंटपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा
तुम्ही पाहिलंत का? भर मंचावर राहुल शेवाळेंनी सांगितलं तरी...
तुम्ही पाहिलंत का? भर मंचावर राहुल शेवाळेंनी सांगितलं तरी... पक्षप्रवेशावेळी ओमराजेंच्या बॉडी लँग्वेजचीच चर्चा!
विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात मंत्र्यांची दांडी! विरोधक आक्रमक
Vidhansabha Rada | विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात मंत्र्यांची दांडी! विरोधक आक्रमक
शिंदे-ठाकरे एकत्र या... शिंदेंच्या विश्वासू नेत्याची हाक...
मोठी बातमी! शिंदे-ठाकरे एकत्र या... शिंदेंच्या विश्वासू नेत्याची हाक; राजकीय समीकरणं बदलणार?
बंडखोर खासदारांच्या खासदारकीची प्रक्रिया पुर्ण होऊच शकत नाही...
बंडखोर खासदारांच्या खासदारकीची प्रक्रिया पुर्ण होऊच शकत नाही', बड्या नेत्याचं खळबळजनक विधान
पवनराजेंच्या हत्येपासूनचा वैर अन्... पद्मसिंह पाटलांच्या मुलाचं ओमराजे
पवनराजेंच्या हत्येपासूनचा वैर अन्... पद्मसिंह पाटलांच्या मुलाचं ओमराजेंबाबत मोठं विधान; महायुतीत आता...
आमदारकीचं गुपित उघडलं? देवाभाऊंकडे दैवी शक्ती...; त्या नेत्याच्या
आमदारकीचं गुपित उघडलं? देवाभाऊंकडे दैवी शक्ती...; त्या नेत्याच्या वक्तव्याने राजकारणात खळबळ!