न्यूमोनियावर आयुर्वेदिक उपचार खरंच शक्य आहेत? हो! इतके की ऑक्सिजन लेव्हलही नॉर्मल होईल

न्यूमोनिया झाल्यावर शरीरातील ऑक्सिजनची लेव्हल दिवसेंदिवस कमी होते अशा वेळी आधुनिक उपचार पद्धतीच्या माध्यमातून ऑक्सिजन वाढवता येतो पण त्याच बरोबर या उपचारांसोबत आयुर्वेदिक उपचार पद्धती सुद्धा लाभदायक ठरतात

न्यूमोनियावर आयुर्वेदिक उपचार खरंच शक्य आहेत? हो! इतके की ऑक्सिजन लेव्हलही नॉर्मल होईल
न्यूमोनियावरील आयुर्वेदिक उपचारांबाबत जाणून घ्या...
Follow us
| Updated on: Feb 11, 2022 | 11:20 PM

न्यूमोनिया झाल्यावर ऑक्सिजनची लेव्हल (oxygen level) कमी होणे ही समस्या अनेक रुग्णांना सतावत आहे आणि अश्या वेळी नेमकी कोणती उपचार पद्धतीचा वापर करावा या बद्दल लोकांच्या मनात शंका असते. या लेखात आपण न्यूमोनिया (pneumonia) वर आयुर्वेदिक उपचार नेमके कोणते आहेत याबद्दल जाणून घेणार आहोत. आयुर्वेदिक तज्ञ वैद्य डॉ. आबासाहेब रणदिवे आपल्याला महत्वाची माहिती दिली आहे. डॉ. आबासाहेब रणदिवे गेल्या बारा वर्षापासून आयुर्वेदिक उपचार रुग्णावर करत आहेत. हजारो मनकेचे विना ऑपरेशन करून आयुर्वेदीक उपचार (Ayurvedic treatment) करण्याचे कार्य त्यांनी केले आहेत. कोरोना आणि न्यूमोनिया याबद्दल ची महत्वाची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग टीव्ही 9 मराठी शी बातचीत करताना डॉक्टरांनी दिलेल्या माहितीबद्दल जाणून घेऊया त्याबद्दल…

1) साथीचा आजार कोरोना गेल्या एक वर्षापासून सर्वत्र पसरलेला आहे. कोरोना मध्ये न्यूमोनिया आजार झाल्यावर याची नेमकी प्रामुख्याने लक्षणे कोणकोणते आहेत?

उत्तर : कोविड हा विषाणूजन्य आजार आहे आणि गेल्या एक वर्षापासून या विषाणूंचा प्रभाव अनेकांना जाणवत सुद्धा आहे. अनेकांना हा आजार झाला आहे याची लक्षणे लवकर जाणवत नाही परंतु जेव्हा आपण या आजारांच्या लक्षणा बद्दल बोलतो तेव्हा आपल्या शरीरातील फुफ्फुसे आणि जठर या दोन्ही अवयांवर या आजाराची लक्षणे प्रामुख्याने दिसून येतात. सर्दी, अंगदुखी, कनकण, खोकला हे प्रामुख्याने कोरोनाची लक्षणे आहेत. फुफ्फुसामध्ये इन्फेक्शन झाल्यावर हा आजार आपले हातपाय पसरवतो आणि त्यानंतर खोकल्याचे प्रमाण वाढवते.अन्न गोड लागत नाही. भूक मंदावते, कोणत्याही गोष्टीचा आपल्याला वास येत नाही. 4 ते 5 दिवसाचा कालावधी झाल्यानंतर अनेक रुग्णांना न्यूमोनिया होतो जेव्हा कोरोना आपल्या शरीरामध्ये जास्त काळ असतो परंतु लक्षणे आपल्या लवकर जाणवत नाही अशावेळी आपल्याला न्यूमोनिया होण्याची शक्यता जास्त असते.

2) प्राण रंग काढा किंवा अमृताधिक कॅप्सूल या औषधांचा नेमका उपयोग काय असतो?

हा आजार जेव्हा आला तेव्हा आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कशा पद्धतीने मजबूत राहील याकरिता प्रत्येक जण उपाय करत होता परंतु आपल्या आयुर्वेदिक शास्त्रामध्ये पूर्वीच्या काळापासूनच रोगप्रतिकारक शक्ती मजबूत बनण्यासाठी अनेक औषधे उपचार सांगण्यात आलेली आहेत. प्राण रंग काढा आणि अमृताधिक कॅप्सूल या औषधांना अन्न औषधे प्रसाधन मंडळ द्वारे मान्यता देखील मिळालेली आहे. प्राण रंग काढा हा शक्तिवर्धक व रोगप्रतिकारक शक्ती दुप्पट करण्यासाठी कार्य करतो. या औषधाची निर्मिती केल्यानंतर 50 हजारांपेक्षा जास्त व्यक्तींवर या औषधाची ट्रायल घेण्यात आली होती आणि या औषधांचे परिणाम सुद्धा अनेकांना सकारात्मक जाणवले.अमृताधिक कॅप्सूल बनवताना आपण काही रस औषधींचा व सुवर्ण काही कल्प यांचा वापर करण्यात आलेला आहे. न्यूमोनिया झाल्यानंतर ज्या व्यक्तीच्या शरीरातील ऑक्सिजनची मात्रा कमी झाली होती त्यांनी या औषधांचे सेवन केल्याने दुसर्‍या दिवशी त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनची लेव्हल आपल्याला सुधारलेली पाहायला मिळाली. आधुनिक औषधांसोबत जर आपण आयुर्वेदिक औषधांची जोड दिल्यास अनेकांचे प्राण वाचू शकतील.

3) न्यूमोनिया झाल्यावर आपल्या शरीरातील ऑक्सिजनची लेव्हल कमी होते मग अशावेळी आयुर्वेदिक शास्त्राच्या माध्यमातून ऑक्सिजनची लेव्हल वाढवता येते का ?

हो नक्कीच, आयुर्वेदिक औषधांच्या माध्यमातून आपल्या शरीरात न्यूमोनिया झाल्यावर ऑक्सिजनची मात्रा कमी झालेली असते ,ती मात्रा वाढवता येते.अनेकदा आयुर्वेदिक औषधांमुळे झाल्यावर बहुतेक वेळा ऑक्सिजनची लेव्हल मर्यादेपेक्षा खालावते अशा वेळी जर आपण आयुर्वेदिक शास्त्रातील काही औषधे रुग्णाला सेवन करायला दिल्यास एक ते दीड दिवसांमध्ये त्याच्या शरीरामध्ये आवश्यक ते बदल जाणवू लागतात.

4) न्यूमोनिया झाल्यानंतर आयुर्वेदिक शास्त्रातील इमर्जन्सी औषधे कशाप्रकारे भूमिका पार पाडतात?

कोरोना सारख्या विषाणूची लागण झाल्यानंतर या विषाणूचा प्रचार-प्रसार शरीरामध्ये झपाट्याने होतो. बहुतेक वेळा शरीरातील ऑक्सिजनची मात्रा कमी झाल्याने रुग्ण आणि रुग्णाच्या नातेवाईकांना मध्ये चिंता व निराशा पाहायला मिळते परंतु अशावेळी अमृतादी कॅप्सूल सेवन केल्याने रुग्णाला त्वरित फरक जाणवतो आणि असे अनेक उदाहरणे सुद्धा आहेत की आधुनिक उपचार करत असताना सुद्धा रुग्णाला फारसा फरक जाणवत नव्हता अशा वेळी अमृतादी कॅप्सूल ने आपले चमत्कारिक फायदे दाखवले आहेत. या कॅप्सूलमुळे अनेक रुग्णांना असा अनुभव आलेला आहे की एका तासामध्ये त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनची लेव्हल वाढली म्हणूनच जेथे आधुनिक उपचार पद्धती औषधे हात टेकतात तेथे आयुर्वेदिक औषधे उपयोगी पडतात याचे एकमेव कारण म्हणजे अमृतादी कॅप्सूल आहे.

5) 15 पेक्षा जास्त सिटी स्कोर असेल तर अशा परिस्थितीत अमृतादी औषध कसे गुणकारी ठरते?

जर एखाद्या रुग्णाची स्कोर 15 पेक्षा जास्त असेल तर अशा वेळी रुग्ण घाबरून जातो परंतु बहुतेक वेळा न्यूमोनिया झाल्यावर शरीरामध्ये परिणाम जाणवतात परंतु या परिणामाला हे औषध लाभदायक ठरलेले आहे, ज्या रुग्णांनी या औषधाचे सेवन केलेले आहेत त्यांना एक ते दोन दिवसांमध्ये फरक जाणवला आहे आणि त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनची मात्रा वाढवून आता नॉर्मल ऑक्सिजनवर त्यांची ट्रीटमेंट चालू आहे आणि म्हणूनच वैद्यकीय क्षेत्रामध्ये काही मर्यादा असल्या तरी आयुर्वेदिक शास्त्राच्या आधारे आपण आपल्या समस्येचे निराकरण अगदीच करू शकतो. काही औषधी वनस्पती प्रवृत्तीचे असतात तर काही औषधे रस प्रवृत्तीचे असतात. रस वृत्तीच्या औषधांना सेवन केल्याने त्वरित आपल्याला फरक जाणवतो.

पाहा व्हिडीओ –

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.