AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डिहायड्रेशपासून बचाव करायचा असेल तर हे पदार्थ मिसळून प्या पाणी, उन्हाळा होईल सुसह्य

How To Drink Water In Summer : उन्हाळ्यात शरीरा हायड्रेट ठेवणे खूप गरजेचे असते. स्वतःला हायड्रेटेड ठेवण्यासाठी वारंवार अधिकाधिक पाणी प्यावे, असा सल्ला तज्ज्ञ सर्वांना आहेत. काही पदार्थ पाण्यात मिसळून प्यायल्यास शरीराला जास्त फायदा होतो आणि पाण्याचे शोषणही चांगले होते.

डिहायड्रेशपासून बचाव करायचा असेल तर हे पदार्थ मिसळून प्या पाणी, उन्हाळा होईल सुसह्य
Image Credit source: freepik
| Updated on: Apr 25, 2023 | 1:09 PM
Share

नवी दिल्ली : सामान्य पाण्यात (water) खनिजे, पोषण (nutrition) मुबलक प्रमाणात असते आणि ते नैसर्गिकरित्या आपल्या शरीरातील घटकांची कमतरता पूर्ण करतात. पण दूषित पाण्यामुळे आजकाल प्रत्येक घरात आरओ वॉटर फिल्टरचा (water filter) वापर केला जात आहे. ते अनेक रोगांपासून आपले संरक्षण करतात, परंतु त्यांच्यामुळे पाण्यातील नैसर्गिक खनिजे गायब होतात. अशा स्थितीत शरीरातील पाणी शोषून घेण्याची क्षमताही कमी होते आणि ते घाम आणि लघवीच्या रूपात शरीरातून सहज बाहेर पडते. उन्हाळ्याच्या दिवसांत आपले शरीर जलद डिहायड्रेट (dehydration) होते. अशा परिस्थितीत उष्णतेचे परिणाम टाळण्यासाठी काही सोप्या टिप्स तज्ज्ञांकडून जाणून घेऊया.

उत्तम हायड्रेशनसाठी असे प्यावे पाणी

तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, आरओ फिल्टरशिवाय पाणी वापरणे आता आपल्यासाठी सुरक्षित राहिलेले नाही. परंतु हे देखील खरे आहे की, या प्रक्रियेत पाण्यातील अनेक नैसर्गिक खनिजे फिल्टर केली जातात, जी आपल्यासाठी आवश्यक आहेत मात्र या खनिजांची कमतरता आपण अन्नाद्वारे पूर्ण करू शकतो. उन्हाळ्यात शरीरातील पाण्याचे शोषण चांगले राहण्यासाठी आणि उष्माघात आणि डिहायड्रेशन टाळण्यासाठी तुम्ही काय करू शकता ते जाणून घेऊया.

काकडी व पुदीना

तुम्ही एका बाटलीत पाणी भरून त्यात काकडीचे काही तुकडे आणि पुदिन्याची पाने टाका आणि तसेच ठेवा. तुम्ही दिवसभर या पाण्याचे सेवन करू शकता. यामुळे पाण्याला वेगळा स्वादही येईल आणि भरपूर पाणी प्यायल्याने तुम्ही हायड्रेटेडही राहू शकाल.

लिंबू

उन्हाळ्यात लिंबाचाही वापर करावा. नुसत्या लिंबाचा स्वद आवडत नसेल तर तुम्ही सरबताच्या स्वरूपात प्यायल्यास ते तुमच्या आरोग्याला अधिक फायदे देते, मात्र त्यात मीठ कमी घालावे. विशेषतः ज्यांना मीठ कमी खाण्याच्या सूचना दिल्या आहेत, त्यांनी भरपूर लिंबू पाण्याचे सेवन करावे. हे शरीर डिटॉक्स करण्यास आणि रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यास देखील मदत करते.

पार्सली

एका भांड्यात पार्सलीची काही पाने टाका आणि ते पाणी उकळा. ते पाणी थंड झाल्यावर आपल्या बाटलीत ठेवा आणि हे पाणी सेवन करा. हे तुम्हाला दिवसभर ऊर्जा देण्याचे काम करेल. त्यात पुदिन्याची पानेही टाकू शकता.

बडीशेप-ओवा

तुम्ही एका भांड्यात एक चमचा बडीशेप आणि एक चमचा ओवा टाका आणि चांगले उकळा आणि थंड करा. बडीशेप व ओव्याचे पाणी आरोग्यासाठीही चांगले असते. ते उष्माघात आणि पोटात गॅस तयार होण्याच्या समस्येपासूनही तुम्हाला वाचवेल.

चिया सीड्स

जर तुम्ही पाण्यात चिया बिया मिसळून त्याचे सेवन केले तर ते शरीराला चांगल्या प्रकारे हायड्रेट करण्यास मदत करते आणि शरीरातील प्रोटीनची कमतरता देखील दूर करते. अशा प्रकारे तुम्ही रोज सकाळी याचे सेवन करू शकता.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.