AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health Tips : आजारी कमी पडायचंय? मग सकाळी करा पोटभर नाश्ता, मिळतो आरोग्याला फायदा

दिवसाची सुरूवात पोटभर आणि पौष्टिक नाश्त्याने केल्यास आरोग्याला अनेक फायदे मिळतात. अनेक आजारापासून शरीराचा बचाव होतो.

Health Tips : आजारी कमी पडायचंय? मग सकाळी करा पोटभर नाश्ता, मिळतो आरोग्याला फायदा
Image Credit source: Freepik
| Updated on: Jan 27, 2023 | 12:40 PM
Share

नवी दिल्ली – सकाळचा नाश्ता आरोग्यासाठी (breakfast) खूप महत्त्वाचा आहे. शरीरासाठी पौष्टिक आहार जेवढा आवश्यक आहे, तेवढेच महत्वाचे आहे वेळेवर खाणे. सकाळी उठून आवरणे, ऑफीसला जायची गडबड या सगळ्या नादात अनेक लोकं नाश्ता करायला विसरतात. तर अनेकांना सकाळचा नाश्ता करण्याची सवयच नसते. अशा स्थितीत व्यस्त जीवनशैली आणि खाण्याच्या योग्य सवयींचा (busy lifestyle and unhealthy food habits) अभाव यामुळे शरीरावर वाईट परिणाम होतो. बर्‍याचदा घरातील वडीलधारी मंडळी सकाळचा नाश्ता खूप महत्त्वाचा असल्याचे सांगतात. काही खाल्ल्यानंतरच घरातून बाहेर पडावे. पण सकाळचा नाश्ता करणं का गरजेचं आहे किंवा जेवल्यानंतरच घराबाहेर पडण्यामागचं कारण काय आहे, याबद्दल लोकांना नीट माहिती नाही. सकाळी पोटभर नाश्ता करण्याचे काय फायदे (benefits of breakfast) आहेत, ते जाणून घेऊया.

सकाळी नाश्ता करण्याचे फायदे

निरोगी हृदयासाठी महत्वाचा ठरतो नाश्ता

एका अभ्यासानुसार, नाश्ता वगळल्याने तुमचे वजन जास्त वाढू शकते. जास्त वजन किंवा लठ्ठपणा असल्याने उच्च कोलेस्ट्रॉल आणि उच्च रक्तदाब होऊ शकतो, ज्यामुळे हृदयविकार होऊ शकतो. त्यामुळे निरोगी हृदय हवे असेल तर नाश्ता करणे विसरू नका.

टाइप-2 मधुमेहाचा धोका होतो कमी

नियमित नाश्ता केल्याने मधुमेहापासून अंतर राखता येते. एका अभ्यासानुसार, जे लोक नियमित नाश्ता करतात त्यांना मधुमेहाचा धोका जवळपास 30% कमी होतो.

ऊर्जेची पातळी वाढवते

नाश्ता केल्याने शरीराला ऊर्जा मिळते. पौष्टिक आहार घेऊन सकाळी घरातून बाहेर पडल्यानंतर शारीरिक हालचालींमध्ये वाढ होते. लवकर भूक लागत नाही आणि दिवसभर भरपूर ऊर्जा राहते. तसेच गतिशील राहिल्याने वजन नियंत्रणात राहते आणि थकवा येत नाही

स्मृती सुधारते

पौष्टिक नाश्ता करून दिवसाची सुरुवात केल्याने एकाग्रता वाढू शकते आणि स्मरणशक्ती वाढू शकते. मेंदूच्या निरोगी कार्यासाठी कर्बोदके म्हणजेच कार्बोहायड्रेट्स आवश्यक असतात. अशा स्थितीत उच्च दर्जाचा नाश्ता केल्याने तणाव कमी होऊन मन शांत राहू शकते.

Follow Us
अमित शाहांना मी फोनवर बोलताना पाहिलंय; दिल्ली लाठीचार्जबाबत...
अमित शाहांना मी फोनवर बोलताना पाहिलंय; दिल्ली लाठीचार्जबाबत राहुल गांधींचा धक्कादायक दावा
व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराची घोषणा! वाचा विजेत्यांची यादी
व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराची घोषणा! वाचा विजेत्यांची यादी
नुसती धावपळ... आंदोलक थेट गाड्यांवर चढले अन्... शेतकरी आंदोलनामुळे...
नुसती धावपळ... आंदोलक थेट गाड्यांवर चढले अन्... शेतकरी आंदोलनामुळे भोपाळ शहरात तणाव, नेमकं प्रकरण काय?
तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णय! आता विना परवाना शाळांमध्ये...
Tukaram Mundhe | तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णय! आता परवाना नसेल तर शाळांमध्ये अन्न पुरवठा करता येणार नाही; 50 मीटर परिसरात...
दिल्ली आंदोलनातील तरुणींवर कंगना रणौत यांची जहरी टीका; गटर जनरेशन...
दिल्ली आंदोलनातील तरुणींवर कंगना रणौत यांची जहरी टीका; गटर जनरेशन म्हणत केलं वादग्रस्त वक्तव्य!
दिलीप वळसे पाटील- शरद पवार भेट, आणखी कोण कोण होतं उपस्थित? Inside...
दिलीप वळसे पाटील- शरद पवार भेट, आणखी कोण कोण होतं उपस्थित? Inside Story समोर
हेच विद्यार्थी सरकार बदलतील; घरी परतताच दीपकेचा मोदी सरकारला थेट इशारा
Abhijeet Dipke | हेच विद्यार्थी सरकार बदलतील; घरी परतताच अभिजीत दीपकेचा मोदी सरकारला थेट इशारा
मोठी बातमी! NDA मध्ये येताच सुप्रिया सुळेंना मिळणार मोठं गिफ्ट?दावा...
मोठी बातमी! NDA मध्ये येताच सुप्रिया सुळेंना मिळणार मोठं गिफ्ट? दिल्लीतील हालचालीमागे... बड्या व्यक्तीच्या दाव्याने खळबळ
तो सुखरूप घरी परतला हे आमच्यासाठी... दीपकेंच्या वडिलांची प्रतिक्रिया
तो सुखरूप घरी परतला हे आमच्यासाठी... अभिजीत दीपकेंच्या वडिलांची प्रतिक्रिया चर्चेत
मोठी बातमी! दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला, पुण्यात...
मोठी बातमी! दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला, पुण्यात घडामोडींना वेग