पाळीव प्राण्यांमुळे एकटेपणा होतो दूर, मूड सुधारतो, आहेत अनेक फायदे

घरात पाळीव प्राणी आणल्याने जबाबदारी तर वाढते पण त्यामुळे आपल्याला अनेक शारीरिक व मानसिक फायदे मिळतात.

पाळीव प्राण्यांमुळे एकटेपणा होतो दूर, मूड सुधारतो, आहेत अनेक फायदे
Image Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Jan 05, 2023 | 4:43 PM

नवी दिल्ली – घरात एखादा पाळीव प्राणी (pet animal) असेल तर आपली जबाबदारी खूप वाढते कारण एखाद्या लहान मुलाप्रमाणे त्यांची काळजी घ्यावी लागते. त्यामुळे बरेच लोक इच्छा असूनही घरात प्राणी पाळत नाहीत. पण आरोग्य तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, घरात पाळीव प्राणी असेल तर मनुष्याच्या आयुष्यावर आणि आरोग्यावरही (good effect on health) चांगला प्रभाव पडतो तसेच व्यक्तीचे शारीरिक व मानसिक (mental health) आरोग्य सुधारते.

आजकाल कामामुळे अनेक लोक शहरात एकटे राहतात. त्यामुळे त्यांची एकटेपणाची भावना वाढते आणि तणावही येतो. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही घरी कुत्रा, मांजर किंवा ससा यांसारखे पाळीव प्राणी आणू शकता. त्यांच्यामुळे मिळणारे फायदे जाणून घेऊया.

निरोगी रक्तदाब

हे सुद्धा वाचा

सर्व पाळीव प्राणी मालकांसाठी ही चांगली बातमी आहे. अनेक आरोग्य अहवाल असे सूचित करतात की पाळीव प्राण्यांच्या आसपास राहिल्यामुळे हृदयाचे आरोग्य वाढवू शकते. पाळीव प्राण्यांसोबत राहिल्याने मानसिक ताण कमी होतो, ज्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो. यामुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोकाही कमी होऊ शकतो.

शारीरिक हालचाल वाढते

पाळीव प्राणी खूप सक्रिय असतात, त्यामुळे आपल्या दैनंदिन शारीरिक हालचालींना प्रोत्साहन मिळते. तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी शारीरिक हालचाली करणे खूप महत्वाचे आहे, यासाठी पाळीव प्राणी हा सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो.

एकटेपणा होतो दूर

जे लोक कामानिमित्त घरापासून आणि कुटुंबापासून दूर राहतात त्यांच्यासाठी पाळीव प्राणी घरी ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. घरात कोणतेही पाळीव प्राणी असल्यास मानसिक आरोग्य चांगले राहते आणि एकटेपणा जाणवत नाही.

शरीरातील हॅपी हार्मोन्स वाढतात

एका अहवालानुसार, पाळीव प्राण्यांच्या आसपास राहिल्याने शरीरातील कोर्टिसोल या स्ट्रेस हार्मोनचे उत्पादन कमी होते. आणि ऑक्सीटॉसिन व एंड्रोफिन या हॅपी हार्मोन्सचे उत्पादन वाढते. कुत्रा किंवा मांजरीसोबत राहण्यामुळे तणाव, चिंता, डिप्रेशन (नैराश्य) आणि एकटेपणा दूर होतो.

मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर

पाळीव प्राणी भावनिक आणि सामाजिक संबंध वाढवतात. तुमचा मूड चांगला होतो, ज्यामुळे एकूणच आरोग्याला चालना मिळते. पाळीव प्राण्यांमुळे एखाद्या व्यक्तीची भावनिक स्थिरता सुधारते आणि तणाव कमी करण्यास मदत होते.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.