AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weight loss : वजन कमी करण्याच्या जर्नीमध्ये तुम्हीही करत आहात या चुका? वाचा मग होणारे दुष्परिणाम!

रात्रीचे जेवण न केल्याने शरीरात ऊर्जेची कमतरता निर्माण होते, त्यामुळे शरीर आतून कमजोर होऊ लागते. त्यामुळे थकवा आणि डोकेदुखी सारख्या समस्या उद्भवू शकतात. यामुळे, खूप अशक्तपणा देखील जाणवू शकतो. अशा परिस्थितीत तुमच्या मानसिक आरोग्यावरही विपरीत परिणाम होऊ शकतो. यामुळे तणाव आणि चिंतेची समस्या उद्भवू शकते.

Weight loss : वजन कमी करण्याच्या जर्नीमध्ये तुम्हीही करत आहात या चुका? वाचा मग होणारे दुष्परिणाम!
Image Credit source: shutterstock.com
| Updated on: Jun 20, 2022 | 6:00 AM
Share

मुंबई : बरेच लोक वजन कमी (Weight loss) करण्यासाठी दिवसातून एकदाच जेवतात. तसेच रात्रीचे जेवण बंद केल्याने वजन झपाट्याने कमी होते, असा अनेकांचा गोड गैरसमज आहे. रात्रीच्या वेळा हलके आणि पचण्यास सोपे अन्न खायला हवे. मात्र, याचा अर्थ अजिबात असा नाही की, आपण रात्रीचे जेवणच (Dinner) बंद करायला हवे. जर रात्रीचे सेवन बंद केले तर आरोग्याशी संबंध अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. आपल्या शरीरासाठी रात्रीचे जेवण अत्यंत आवश्यक असते. जर आपण रात्री जेवण केले नाहीतर आपण आजारीही पडू शकता. शक्यतो रात्री उशीरा जेवू नका. रात्री उशीरा जेवल्याने अन्न पचत नाही आणि पोटाशी संबंधित समस्या (Problem) वाढू शकतात.

ऊर्जा

रात्रीचे जेवण न केल्याने शरीरात ऊर्जेची कमतरता निर्माण होते, त्यामुळे शरीर आतून कमजोर होऊ लागते. त्यामुळे थकवा आणि डोकेदुखी सारख्या समस्या उद्भवू शकतात. यामुळे, खूप अशक्तपणा देखील जाणवू शकतो. अशा परिस्थितीत तुमच्या मानसिक आरोग्यावरही विपरीत परिणाम होऊ शकतो. यामुळे तणाव आणि चिंतेची समस्या उद्भवू शकते. यामुळेच नेहमी रात्री जेवण करा. फक्त 7 च्या अगोदर रात्रीचे जेवण करण्याचा प्रयत्न करा.

पौष्टिक कमतरता

वजन कमी करण्यासाठी किंवा इतर काही कारणांसाठी जेवण वगळणे हा कोणत्याही समस्येसाठी पर्याय नाही. तुम्ही रोज रात्रीचे जेवण केले नाहीतर तुमच्या शरीराला आवश्यक पोषक तत्व मिळणार नाहीत. यामुळे तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीही कमी होऊ शकते. यामुळे आजारीही पडण्याची शक्यता असते. बरेच लोक रात्रीचे जेवण करणे टाळतात. मात्र, परत रात्री झोप येत नाही. मग अशावेळी फास्टफूड खाण्यावर भर देतात. यामुळे वजन वाढण्याची शक्यता असते.

रात्रीच्या जेवणात हे पदार्थ घ्या

रात्रीचे जेवण नेहमीच हलके आणि पचायला सोपे असावे. रात्रीच्या जेवणामध्ये आपण खिचडी, वरण भात, दलिया, मखाणा, पालेभाज्यांचा सूप, फळांचा सूप, रस, भाकरी, छोटी पोळी, हिरव्या भाज्या हे घेऊ शकता. तसेच रात्रीच्या जेवणानंतर अर्धा ग्लास दूध देखील घ्या. रात्रीचे जेवण शक्यतो सातच्या अगोदरच करण्याचा प्रयत्न करा. तसेच जेवण झाल्यानंतर किमान वीस मिनिटे तरी फिरा. यामुळे अन्न पचण्यास मदत होते. कधीही जेवण केल्यावर लगेचच अजिबात झोपू नका. यामुळे पचनसंस्थेवर ताण येतो आणि अन्न व्यवस्थित पचत नाही.

Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.