AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weight loss : वजन कमी करण्याच्या जर्नीमध्ये तुम्हीही करत आहात या चुका? वाचा मग होणारे दुष्परिणाम!

रात्रीचे जेवण न केल्याने शरीरात ऊर्जेची कमतरता निर्माण होते, त्यामुळे शरीर आतून कमजोर होऊ लागते. त्यामुळे थकवा आणि डोकेदुखी सारख्या समस्या उद्भवू शकतात. यामुळे, खूप अशक्तपणा देखील जाणवू शकतो. अशा परिस्थितीत तुमच्या मानसिक आरोग्यावरही विपरीत परिणाम होऊ शकतो. यामुळे तणाव आणि चिंतेची समस्या उद्भवू शकते.

Weight loss : वजन कमी करण्याच्या जर्नीमध्ये तुम्हीही करत आहात या चुका? वाचा मग होणारे दुष्परिणाम!
Image Credit source: shutterstock.com
| Updated on: Jun 20, 2022 | 6:00 AM
Share

मुंबई : बरेच लोक वजन कमी (Weight loss) करण्यासाठी दिवसातून एकदाच जेवतात. तसेच रात्रीचे जेवण बंद केल्याने वजन झपाट्याने कमी होते, असा अनेकांचा गोड गैरसमज आहे. रात्रीच्या वेळा हलके आणि पचण्यास सोपे अन्न खायला हवे. मात्र, याचा अर्थ अजिबात असा नाही की, आपण रात्रीचे जेवणच (Dinner) बंद करायला हवे. जर रात्रीचे सेवन बंद केले तर आरोग्याशी संबंध अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. आपल्या शरीरासाठी रात्रीचे जेवण अत्यंत आवश्यक असते. जर आपण रात्री जेवण केले नाहीतर आपण आजारीही पडू शकता. शक्यतो रात्री उशीरा जेवू नका. रात्री उशीरा जेवल्याने अन्न पचत नाही आणि पोटाशी संबंधित समस्या (Problem) वाढू शकतात.

ऊर्जा

रात्रीचे जेवण न केल्याने शरीरात ऊर्जेची कमतरता निर्माण होते, त्यामुळे शरीर आतून कमजोर होऊ लागते. त्यामुळे थकवा आणि डोकेदुखी सारख्या समस्या उद्भवू शकतात. यामुळे, खूप अशक्तपणा देखील जाणवू शकतो. अशा परिस्थितीत तुमच्या मानसिक आरोग्यावरही विपरीत परिणाम होऊ शकतो. यामुळे तणाव आणि चिंतेची समस्या उद्भवू शकते. यामुळेच नेहमी रात्री जेवण करा. फक्त 7 च्या अगोदर रात्रीचे जेवण करण्याचा प्रयत्न करा.

पौष्टिक कमतरता

वजन कमी करण्यासाठी किंवा इतर काही कारणांसाठी जेवण वगळणे हा कोणत्याही समस्येसाठी पर्याय नाही. तुम्ही रोज रात्रीचे जेवण केले नाहीतर तुमच्या शरीराला आवश्यक पोषक तत्व मिळणार नाहीत. यामुळे तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीही कमी होऊ शकते. यामुळे आजारीही पडण्याची शक्यता असते. बरेच लोक रात्रीचे जेवण करणे टाळतात. मात्र, परत रात्री झोप येत नाही. मग अशावेळी फास्टफूड खाण्यावर भर देतात. यामुळे वजन वाढण्याची शक्यता असते.

रात्रीच्या जेवणात हे पदार्थ घ्या

रात्रीचे जेवण नेहमीच हलके आणि पचायला सोपे असावे. रात्रीच्या जेवणामध्ये आपण खिचडी, वरण भात, दलिया, मखाणा, पालेभाज्यांचा सूप, फळांचा सूप, रस, भाकरी, छोटी पोळी, हिरव्या भाज्या हे घेऊ शकता. तसेच रात्रीच्या जेवणानंतर अर्धा ग्लास दूध देखील घ्या. रात्रीचे जेवण शक्यतो सातच्या अगोदरच करण्याचा प्रयत्न करा. तसेच जेवण झाल्यानंतर किमान वीस मिनिटे तरी फिरा. यामुळे अन्न पचण्यास मदत होते. कधीही जेवण केल्यावर लगेचच अजिबात झोपू नका. यामुळे पचनसंस्थेवर ताण येतो आणि अन्न व्यवस्थित पचत नाही.

Follow Us
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता.
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान.
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड.
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम.
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती.
रुपाली ठोंबरे यांचा रुपाली चाकणकरांना सूचक इशारा; आणखी काय म्हणाल्या?
रुपाली ठोंबरे यांचा रुपाली चाकणकरांना सूचक इशारा; आणखी काय म्हणाल्या?.
देशात इंधनाचा तुटवडा नाही, युद्धजन्य परिस्थितीचाही परिणाम नाही.....
देशात इंधनाचा तुटवडा नाही, युद्धजन्य परिस्थितीचाही परिणाम नाही......
खरातच्या मुलीला फ्लॅट भेट, चौकशीसाठी चाकणकरांना का बोलावले नाही?
खरातच्या मुलीला फ्लॅट भेट, चौकशीसाठी चाकणकरांना का बोलावले नाही?.
अस्मानी संकटाचा कहर... शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् हुंदके...
अस्मानी संकटाचा कहर... शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् हुंदके....
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं.