AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Patanjali: पतंजलीचे खास दिव्य कायाकल्प तेल, ‘या’ गंभीर समस्यांवर रामबाण उपाय

पतंजलीचे दिव्य कायाकल्प तेल या सर्व समस्यांवर एक आयुर्वेदिक उपाय आहे. हे तेल त्वचा स्वच्छ आणि निरोगी ठेवते असा दावा पतंजलीने केला आहे.

Patanjali: पतंजलीचे खास दिव्य कायाकल्प तेल, 'या' गंभीर समस्यांवर रामबाण उपाय
baba-ramdev
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Sep 10, 2025 | 8:03 PM
Share

पतंजलीची औषधे ही अनेक समस्यांवर रामबाण उपाय आहेत. तुम्हाला कोणत्याही प्रकारची ऍलर्जी, डाग, कोरडी त्वचा, एखादी जखम, सनबर्न, खाज यापैकी एखादी समस्या असेल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. पतंजलीचे दिव्य कायाकल्प तेल या सर्व समस्यांवर एक आयुर्वेदिक उपाय आहे. हे तेल त्वचा स्वच्छ आणि निरोगी ठेवते असा दावा पतंजलीने केला आहे.

आयुर्वेदानुसार औषधी वनस्पतींपासून तयार करण्यात आलेली औषधे आणि तेल हे कोणत्याही समस्येवर नैसर्गिक उपचार मानले जाते. अशाच या नैसर्गिक पद्धतींचा वापर करून पतंजलीने दिव्य कायाकल्प तेल बनवले आहे. त्याचे फायदे, ते वापरण्याच्या पद्धती आणि खबरदारी याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

दिव्य कायाकल्प तेलातील औषधी वनस्पती

दिव्य कायाकल्प हे तेल तयार करण्यासाठी बाबची, पुनर्नव, हरिद्रा, दारुहरिद्रा, करंज, कडुनिंब, आमलकी, मंजिष्ठा, गिलोय, चित्रक, कुटकी, देवदारू, चिरायता यासारख्या अनेक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचा वापर करण्यात आलेला आहे.

दिव्य कायाकल्प तेलाचे फायदे

दिव्य कायाकल्प हे त्वचेच्या समस्यांसाठी फायदेशीर आहे. यात खाज सुटणे, सोरायसिस, एक्जिमा, दाग, सोरायसिस, अंगावर उठणार्या पित्ताच्या गाठी, पांढरे डाग आणि त्वचेची ऍलर्जी या समस्यांचा समावेश आहे. तसेच हे तेल सनबर्न, फ्रिकल्स, रॅशेस, फंगल इन्फेक्शन यासारख्या समस्यांवरही प्रभावी आहे. त्याचबरोबर लहान जखमा आणि भेगा पडलेल्या टाचांसाठीएक उत्तम आयुर्वेदिक उपाय आहे.

दिव्य कायाकल्प तेल कसे वापरायचे?

शरीराच्या ज्या भागात समस्या आहे अशा भागाला दिवसातून 2 ते 3 वेळा हलक्या हातांनी मालिश करावी. या तेलाने नियमित मालिश केल्याने त्वचा मऊ, निरोगी आणि स्वच्छ दिसेल आणि समस्या दूर होईल.

तेल वापरताना काय खबरदारी घ्यावी?

दिव्य कायाकल्प तेल किंवा इतर कोणतेही नवीन औषध किंवा तेल वापरण्यापूर्वी एकदा पॅच टेस्ट करावी. यामुळे औषध किंवा तेलामुळे तुम्हाला त्रास तर होत नाही ना हे कळेल. हे तेल वापरण्यापूर्वी गर्भवती महिला आणि गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांनी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. तसेच मुलांवर या तेलाचा वापर करतान त्याचे प्रमाण कमी ठेवावे.

टीप – तुम्हाला हे तेल वापरायचे असेल तर आधी डॉक्टरांचा सल्ला घ्या. डॉक्टरांना न विचारता याचा वापरू करु नका.

Follow Us
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा, आत्मलिंग...
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा आणि आत्मलिंग कथा
खासगी रुग्णालयांतील सलाईन नळीच्या विक्रीत... FDA आयुक्तांची धडक कारवाई
खासगी रुग्णालयांतील सलाईन नळीच्या विक्रीत... FDA आयुक्तांची धडक कारवाई पुन्हा राज्यभर चर्चेत
आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला
Ganeshotsav | आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला महत्त्वाचा संदेश
कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा!
Radhakrishna Vikhepatil | कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा! राधाकृष्ण विखे पाटलांचं मनोज जरांगेंना आवाहन
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला
Nitin Nabin | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला, राजकीय कारण काय?
जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती
ChandrakantPatil | जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती; पुढे म्हणाले...
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी फडणवीस-नबीन; सिद्धिविनायक मंदिरात...
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी CM फडणवीस- नितीन नबीन; सिद्धिविनायक मंदिरात घेतले बप्पांचे दर्शन!
जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल
Vijay Wadettiwar | जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल, म्हणाले...
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?