AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

त्वचेच्या आजारांसाठी पतंजलीचे दिव्य कायाकल्प तेल फारच उपयोगी, पण कसा वापर करायचा?

दिव्य कायाकल्प हे तेल त्वचेच्या आरोग्यासाठी फार लाभदायी ठरते. या तेलामध्ये हळद तसेच इतर आयुर्वेदिक वनस्पती असतात. त्यामुळे हे तेल वापरल्यास लगेच त्वचा मुलायम होते असे म्हटले जाते.

त्वचेच्या आजारांसाठी पतंजलीचे दिव्य कायाकल्प तेल फारच उपयोगी, पण कसा वापर करायचा?
divya kayakalpImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jan 05, 2026 | 6:21 PM
Share

Divya Kayakalp Oil : आजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला स्वत:च्या आरोग्याची काळजी घेण्यासाठीही वेळ नसतो. त्वचेच्या आरोग्याकडेही आपण सर्रास दुर्लक्ष करतो. बदलती जीवनशैली, प्रदूषण, जेवण्याची चुकीची सवय यामुळे त्वचेवर वाईट परिणाम होतो. त्यामुळेच गचकरण, त्वचेला खाज सुटणे, बुरशी लागणे अशा प्रकारचे आजार होतात. कितीही उपचार केला तरी हे आजार नंतर पिच्छा सोडत नाहीत. परंतु पतंजली या कंपनीचे दिव्य कायाकल्प तेल अशा आजारांचा नायनाट करू शकते. त्वचेची काळजी घेण्यासाठी हे तेल फार उपयोगी पडते.

त्वचेशी निगडीत असलेल्या सामान्या त्रासापासून सुटका व्हावी यासाठीच दिव्य कायाकल्प या तेलाची निर्मिती करण्यात आली आहे. या तेलाच्या उपयोगामुळे तुमची त्वचा निरोगी राहण्यास मदत होती. परंतु या तेलाचा नियमित वापर केला तरच तुम्हाला तुमच्या त्वचेमध्ये फरक पडलेला दिसतो.

दिव्या कायाकल्प तेल कसे वापरावे?

त्वचेला खाज सुटणे, फंगल इन्फेक्शन, एक्झिमा अशा आजारांवर मात दिव्य कायाकल्प तेल वापरले जाते. यासोबतच त्वचेची आग होणे, त्वचा लाल होणे, त्वचा कोरडी होणे यासाठी दिव्य कायाकल्प हे तेल फार मदतीला येते. अनेक लोकांना अॅलर्जीचाही त्रास होतो. अशा प्रकारचा त्रास दूर व्हावा यासाठीदेखील दिव्या कायाकल्प तेल वापरले जाते. या तेलाचा नियमित वापर केल्यास त्वचेला पोषण मिळते. सोबतच त्वचा मुलायम होण्यास मदत होते. हे तेल वापरले तर त्वचा कोरडी होत नाही.

दिव्य कायाकल्प तेलात नेमके कोणते तत्त्व असते?

दिव्य कायाकल्प तेलात लिंबू, हळद, चंदन तसेच अन्य आयुर्वेदिक वनस्पती असतात. कडूनिंब हे त्वचेसाठी फार उपयोगी असल्याचे बोलले जाते. सोबतच हळद शरीरावरील सूज, त्वचेला होत असलेली आग कमी करण्यासाठी फार उपयोगी पडते. दिव्य कायाकल्प वापरताना मात्र काही काळजी घेणे गरजेचे आहे. जखमेच्या ठिकाणी हे तेल वापरू नये. सोबतच हे तेल डोळ्यात जाणार नाही याची काळजी घ्यावी. हे तेल लावल्यानंतर त्वचेला जळजळ होत असेल तर या तेलाचा वापर बंद करावा. सोबतच तुम्हाला खूपच त्रास होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.

Follow Us
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोप
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोपांनी खळबळ!
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटा
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटांच्या चर्चेत... पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरणी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
Mayank Lohar | लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
धक्कादायक! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट
Shirdi | साईबाबांच्या नगरीत धक्कादायक खुलासा! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट पेढे...
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णय
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची चर्चा
स्वार्थासाठी गेले, जनता हिशोब चुकता करणार! नाईकांचा खासदारांना इशारा
Vaibhav Naik | स्वार्थासाठी गेले, आता जनता हिशोब चुकता करणार! वैभव नाईकांचा फुटीर खासदारांना इशारा
विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट
Beed | विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट निर्णय घेतला; लवकरच...
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं!
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं! त्या वादाला आता नवं वळण!
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता बड्या नेत्याचं विधान चर्चेत