AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तिमाही निकालानंतर पतंजली गुंतवणूकदारांची दिवाळी, १५०० कोटींची कमाई

पतंजलीच्या शेअर्समध्ये झालेल्या या वाढीमुळे कंपनीच्या मूल्यांकनातही वाढ झाली आहे. डेटानुसार कंपनीचे मूल्यांकन अंदाजे ₹१,५०० कोटींनी वाढले आहे.

तिमाही निकालानंतर पतंजली गुंतवणूकदारांची दिवाळी, १५०० कोटींची कमाई
Patanjali foods
| Updated on: Feb 22, 2026 | 7:56 PM
Share

जेव्हापासून पतंजली फूट्स लिमिटेडचे तिमाही निकाल आले आहेत. त्यानंतर शेअर बाजारात उसळी आली आहे. खास बाब म्हणजे तेव्हापासून आतापर्यंत सात कामकाजाच्या सत्रात कंपनीच्या शेअरमध्ये २.५० टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. ज्यामुळे कंपनीच्या गुंतवणूकदारांना सुमारे १५०० कोटी रुपयांची कमाई झाली आहे. कंपनीचे तिमाही निकाल चांगले आले आहेत. ज्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत कंपनीच्या नफ्यात ६० टक्के वाढ झाल्याचे पाहायला मिळाली आहे. तर दुसरीकडे महसुलात वाढ झाली आहे. ज्याचा परिणाम कंपनीच्या शेअर्समध्ये पाहायला मिळाला आहे. चला तर पाहूयात अखेर तिमाहीच्या निकालानंतर शेअरमध्ये कशी उसळी पाहायला मिळाली.

कंपनीच्या शेअर्समध्ये उसळी

११ फेब्रुवारी रोजी पतंजलीच्या तिमाहीचे निकाल आले आहेत. त्यानंतर आतापर्यंत कंपनीचे शेअर्समध्ये २.५० टक्क्यांहून जास्त वाढ पाहायला मिळाली आहे. बीएसईचे आकड्यांनुसार ११ फेब्रुवारी रोजी शेअर बाजार बंद झाला होता. तेव्हा बीएसईवर कंपनीच्या शेअर्सची किंमती ५२२ रुपये होती. त्यानंतर आतापर्यंत ७ कामकाजाचे सत्रे झालेली आहेत. २० फेब्रुवारी रोजी कंपनीचा शेअर ५३५.५५ रुपयांवर बंद झाला. याचा अर्थ कंपनीचे शेअर्सने तेव्हापासून आतापर्यंत १३.५५ रुपयांनी २.५९ टक्के वाढ पाहायला मिळाली आहे.ज्यास सध्याचा माहोल पाहाता चांगली उसळी म्हणता येईल. जाणकारांच्या मते येणाऱ्या दिवसात कंपनीच्या शेअर्समध्ये आणखी उसळी पाहायला मिळू शकते.

कंपनीला आतापर्यंत १५०० कोटींचा फायदा

शेअरबाजारात पतंजलीच्या शेअर्समध्ये आलेल्या उसळीमुळे व्हॅल्युएशनमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळाली. आकड्यांकडे पाहिले तर कंपनीची व्हॅल्युएशनमध्ये सुमारे १५०० कोटी रुपयांची वाढ पाहायला मिळाली आहे. बीएसईच्या आकड्यांनुसार ११ फेब्रुवारी रोजी जेव्हा शेअर बाजार बंद झाला होता, तेव्हा कंपनीची व्हॅल्युएशन ५६,७८९.३२ कोटी रुपये होती. जी सध्याच्या काळात वाढून ५८,२६३.४५ कोटी रुपयांवर आले आहे. याचा अर्थ या दरम्यान कंपनीची व्हॅल्युएशनमध्ये १,४७४.१३ कोटी रुपयांचा फायदा झाला आहे. ही पतंजली गुंतवणूकदारांची कमाई देखील आहे.

पतंजली झाला ६० टक्के नफा

पतंजली फूड्स लिमिटेड मुख्यत: खाद्य तेलाचा व्यवसाय करत आहे. ११ फेब्रुवारी रोजी माहिती देताना कंपनीने म्हटले होते की आर्थिक वर्षे २०२६ रोजी डिसेंबर तिमाहीमध्ये जास्त उत्पन्नामुळे कन्सोलिडेटेड नेट प्रॉफिट ६० टक्क्यांनी वाढून ५९३.४४ कोटी रुपये झाले आहे. गेल्यावर्षी याच काळात कन्सोलिडेटेड नेट प्रॉफिट ३७०.८८ कोटी रुपये होता. रेग्युलेटरी फायलिंगच्या मते या तिमाहीत एकूण इन्कम वाढून १०,५४१.१२ कोटी रुपये झाली होती. जे एक वर्षांपूर्वी ९,०२०.३८ कोटी रुपये होती. कुकिंग ऑईलच्या शिवाय पतंजली फूड्स काही अन्य खाद्यपदार्थ आणि कंझ्युमर गुड्स देखील विकते.

मुंबईच्या रुईया कॉलेज परिसरात ग्रंथोत्सव 2026 ला सुरुवात
मुंबईच्या रुईया कॉलेज परिसरात ग्रंथोत्सव 2026 ला सुरुवात.
विलिनीकरण होणार की नाही? अनिल देशमुख स्पष्टच बोलले
विलिनीकरण होणार की नाही? अनिल देशमुख स्पष्टच बोलले.
राज्यातील एक सुजलाम सुफलाम जिल्हा दाखवा; ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
राज्यातील एक सुजलाम सुफलाम जिल्हा दाखवा; ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल.
राज्य मागे पडले; शेतकरी, बेरोजगारी, गुंतवणूक..वडेट्टीवार सरकारवर बरसले
राज्य मागे पडले; शेतकरी, बेरोजगारी, गुंतवणूक..वडेट्टीवार सरकारवर बरसले.
विरोधकांचा मुख्यमंत्री फडणवीसांच्या चहापानाला विरोध
विरोधकांचा मुख्यमंत्री फडणवीसांच्या चहापानाला विरोध.
ठाकरे बंधूंच्या युतीवर मिठाचा खडा पडलाय?राऊतांनी दोन शब्दात दिले उत्तर
ठाकरे बंधूंच्या युतीवर मिठाचा खडा पडलाय?राऊतांनी दोन शब्दात दिले उत्तर.
चंद्रपूर महापौर वादावर संजय राऊतांचा पलटवार, संपूर्ण खापर शिवसेनेवर...
चंद्रपूर महापौर वादावर संजय राऊतांचा पलटवार, संपूर्ण खापर शिवसेनेवर....
भरधाव कारच्या धडकेत वृद्धेचा मृत्यू; नागपूरमधील दुर्दैवी घटना
भरधाव कारच्या धडकेत वृद्धेचा मृत्यू; नागपूरमधील दुर्दैवी घटना.
मुंबई-विजयदुर्ग सागरी रो रो सेवा 1 मार्चपासून सुरू होणार
मुंबई-विजयदुर्ग सागरी रो रो सेवा 1 मार्चपासून सुरू होणार.
एकनाथ शिंदे 2 दिवसांपासून विश्रांतीसाठी दरे गावात
एकनाथ शिंदे 2 दिवसांपासून विश्रांतीसाठी दरे गावात.