AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जिऱ्याचं पाणी प्यायल्याने वजन कमी होतं खरं पण, उद्भवतात अनेक समस्या!

आरोग्यासाठी फायदेशीर असूनही ते आरोग्यास हानी पोहोचवण्याचे ही काम करते. होय, वजन कमी करण्यासाठी बरेच लोक जिऱ्याचे पाणी पितात किंवा जिऱ्याचे सेवन करतात. ज्यामुळे फायदा होण्याऐवजी नुकसान होऊ शकते.

जिऱ्याचं पाणी प्यायल्याने वजन कमी होतं खरं पण, उद्भवतात अनेक समस्या!
JeeraImage Credit source: Social Media
| Updated on: Mar 01, 2023 | 4:52 PM
Share

जेवणाची चव वाढवण्यासाठी किंवा वजन कमी करण्यासाठी लोक जिऱ्याचे सेवन करतात. जिऱ्यात Vitamin E, A, लोह, तांबे अशी खनिजे आढळतात, जी शरीर निरोगी ठेवण्याचे काम करतात. आरोग्यासाठी फायदेशीर असूनही ते आरोग्यास हानी पोहोचवण्याचे ही काम करते. होय, वजन कमी करण्यासाठी बरेच लोक जिऱ्याचे पाणी पितात किंवा जिऱ्याचे सेवन करतात. ज्यामुळे फायदा होण्याऐवजी नुकसान होऊ शकते. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण हे खरं आहे. जिऱ्याचे सेवन केल्याने शरीराचे काय नुकसान होऊ शकते हे येथे आम्ही तुम्हाला सांगतो.

जिऱ्याच्या अतिसेवनाने होऊ शकते

छातीत जळजळ

पोटातील गॅससाठी जिरे फायदेशीर आहे. पण जर तुम्ही याचे जास्त प्रमाणात सेवन केले तर छातीत जळजळ होण्याची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे जिऱ्याचे जास्त सेवन करणे टाळावे.

जास्त रक्तस्त्राव

महिलांनी जिऱ्याचे जास्त सेवन करू नये. कारण जिरे खाल्ल्याने मासिक पाळीच्या समस्येला सामोरे जावे लागू शकते. होय, मासिक पाळीच्या काळात जिऱ्याचे सेवन केल्यास जास्त रक्तस्त्राव होण्याची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे मासिक पाळीच्या काळात महिलांनी याचे सेवन करू नये.

उलट्यांची समस्या

जिऱ्याच्या पाण्याच्या अतिसेवनामुळे मेंदूशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. यासोबतच तुम्हाला उलट्यांचा त्रासही होऊ शकतो. त्यामुळे जिऱ्याचे सेवन मर्यादित प्रमाणात करावे.

यकृत खराब होणे

जिऱ्यात असलेले तेल आपल्या यकृताला हानी पोहोचवू शकते. अशावेळी जर तुम्ही याचे जास्त सेवन केले तर किडनी किंवा यकृत खराब होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे जिऱ्याचे सेवन मर्यादित प्रमाणात करावे.

(डिस्क्लेमर: दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे, ती स्वीकारण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.)

Follow Us
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण.
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्...
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्....
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू.
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार.
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?.
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना...
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा.....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा......
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?.
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री..
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री...