AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जिऱ्याचं पाणी प्यायल्याने वजन कमी होतं खरं पण, उद्भवतात अनेक समस्या!

आरोग्यासाठी फायदेशीर असूनही ते आरोग्यास हानी पोहोचवण्याचे ही काम करते. होय, वजन कमी करण्यासाठी बरेच लोक जिऱ्याचे पाणी पितात किंवा जिऱ्याचे सेवन करतात. ज्यामुळे फायदा होण्याऐवजी नुकसान होऊ शकते.

जिऱ्याचं पाणी प्यायल्याने वजन कमी होतं खरं पण, उद्भवतात अनेक समस्या!
JeeraImage Credit source: Social Media
| Updated on: Mar 01, 2023 | 4:52 PM
Share

जेवणाची चव वाढवण्यासाठी किंवा वजन कमी करण्यासाठी लोक जिऱ्याचे सेवन करतात. जिऱ्यात Vitamin E, A, लोह, तांबे अशी खनिजे आढळतात, जी शरीर निरोगी ठेवण्याचे काम करतात. आरोग्यासाठी फायदेशीर असूनही ते आरोग्यास हानी पोहोचवण्याचे ही काम करते. होय, वजन कमी करण्यासाठी बरेच लोक जिऱ्याचे पाणी पितात किंवा जिऱ्याचे सेवन करतात. ज्यामुळे फायदा होण्याऐवजी नुकसान होऊ शकते. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण हे खरं आहे. जिऱ्याचे सेवन केल्याने शरीराचे काय नुकसान होऊ शकते हे येथे आम्ही तुम्हाला सांगतो.

जिऱ्याच्या अतिसेवनाने होऊ शकते

छातीत जळजळ

पोटातील गॅससाठी जिरे फायदेशीर आहे. पण जर तुम्ही याचे जास्त प्रमाणात सेवन केले तर छातीत जळजळ होण्याची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे जिऱ्याचे जास्त सेवन करणे टाळावे.

जास्त रक्तस्त्राव

महिलांनी जिऱ्याचे जास्त सेवन करू नये. कारण जिरे खाल्ल्याने मासिक पाळीच्या समस्येला सामोरे जावे लागू शकते. होय, मासिक पाळीच्या काळात जिऱ्याचे सेवन केल्यास जास्त रक्तस्त्राव होण्याची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे मासिक पाळीच्या काळात महिलांनी याचे सेवन करू नये.

उलट्यांची समस्या

जिऱ्याच्या पाण्याच्या अतिसेवनामुळे मेंदूशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. यासोबतच तुम्हाला उलट्यांचा त्रासही होऊ शकतो. त्यामुळे जिऱ्याचे सेवन मर्यादित प्रमाणात करावे.

यकृत खराब होणे

जिऱ्यात असलेले तेल आपल्या यकृताला हानी पोहोचवू शकते. अशावेळी जर तुम्ही याचे जास्त सेवन केले तर किडनी किंवा यकृत खराब होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे जिऱ्याचे सेवन मर्यादित प्रमाणात करावे.

(डिस्क्लेमर: दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे, ती स्वीकारण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.)

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...