AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मणिपूरनंतर आता आणखी एक राज्यात अशांतता, कर्फ्यूमध्ये BSF जवानांवर हल्ला, सैन्य उतरवण्याची वेळ आली

अनेक ठिकाणी जाळपोळ आणि संपत्तीचं नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा पथकांसह सैन्य तैनात करावं लागलय.

मणिपूरनंतर आता आणखी एक राज्यात अशांतता, कर्फ्यूमध्ये BSF जवानांवर हल्ला, सैन्य उतरवण्याची वेळ आली
Indian Army
| Updated on: Mar 12, 2026 | 5:02 PM
Share

ईशान्य भारतातील राज्य मणिपूर आता कुठे शांत होत असताना मेघालयमध्ये हिंसाचार सुरु झाला आहे. बुधवारी संध्याकाळी मेघालयच्या गारो हिल्स क्षेत्रात समाजकंटकांनी BSF जवानांवर हल्ला केला. यात अनेक जवान जखमी झालेत. यावेळी सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) डीआयजीच्या ताफ्यातील एका वाहन सुद्धा पेटवून देण्यात आलं. डीआयजी अन्य अधिकाऱ्यांसह भारत-बांग्लादेश सीमेजवळ पश्चिम गारो हिल्स जिल्ह्यात एका गावात बैठक करुन परतत होते. या हल्ल्याच्यावेळी डीआयजी आणि त्यांच्यासोबत असलेल्या अधिकाऱ्यांना किरकोळ दुखापत झाली. ताफ्याचा भाग असलेल्या एका गाडीला आग लागली.

गारो पर्वतीय स्वायत्त जिल्हा परिषद निवडणुकीवरुन विरोध प्रदर्शन सुरु झाल्यानंतर हा हिंसाचार उफाळला. आंदोलक निवडणुकीत बिगर गारो समुदायाच्या नामंकन प्रक्रियेच्या सहभागाला विरोध करत होते. मंगळवारी चिबिनांग क्षेत्रात झडपा झाल्या. त्यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोघांचा मृत्यू झाला. अनेक जखमी झाले.

सैन्याच्या पाच तुकड्या तैनात

या हिंसाचारामुळे गारो पर्वतीय क्षेत्रात अनेक ठिकाणी जाळपोळ आणि संपत्तीचं नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा पथकांसह सैन्याच्या पाच तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. यात तीन तुरामध्ये आणि दोन चिबिनांग क्षेत्रात तैनात करण्यात आल्या आहेत. या हिंसाचारानंतर मुख्यमंत्री संगमा यांनी 10 एप्रिलला प्रस्तावित असलेली GHADC निवडणूक स्थगित केल्याची घोषणा केली आहे.

कर्फ्यू लावला

अफवा रोखण्यासाठी आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी राज्य सरकारने गारो पर्वतीय क्षेत्रातील पाच जिल्ह्यांमध्ये मोबाईल-इंटरनेट सेवा निलंबित केली आहे. पश्चिम गारो पर्वतीय जिल्ह्यात कर्फ्यू लावण्यात आला आहे. जिल्ह्याचे उपायुक्त वी अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्फ्यू 13 मार्चच्या रात्री 12 वाजेपर्यंत प्रभावी राहिलं. गारो पर्वतीय क्षेत्रातील संवेदनशील भागात अतिरिक्त सुरक्षा पथकं तैनात करण्यात आली आहेत.

Follow Us
गांधींचा मोठा इशारा; राजीनामा पुरेसा नाही, पंतप्रधानांनी माफी मागावी!
Rahul Gandhi | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर राहुल गांधींचा मोठा इशारा; राजीनामा पुरेसा नाही, पंतप्रधानांनी माफी मागावी!
जेपी नड्डा यांची घोषणा –एफआयआर मागे घेणार, नुकसानभरपाई आणि...
JP Nadda | नीट आंदोलनाला मोठं यश; जेपी नड्डा यांची घोषणा –एफआयआर मागे घेणार, नुकसानभरपाई आणि परीक्षा सुधारणांवरही सकारात्मक निर्णय
सरकार झुकलं! आमच्या तीनही मागण्या मान्य; CJP च्या प्रवक्त्यांचा दावा
सरकार झुकलं! आमच्या तीनही मागण्या मान्य; CJP च्या प्रवक्त्यांचा दावा
मोठी अपडेट! राजीनामा देताच धर्मेंद्र प्रधान यांचा मोठा निर्णय, अचानक..
मोठी अपडेट! राजीनामा देताच धर्मेंद्र प्रधान यांचा मोठा निर्णय, अचानक...
अखेर आंदोलन संपलं! CJP आंदोलकांनी शांतपणे घरी जावं, भाजप मंत्र्यांसोबत
अखेर आंदोलन संपलं! CJP आंदोलकांनी शांतपणे घरी जावं, भाजप मंत्र्यांसोबतच्या बैठकीत मोठा निर्णय
तरुणाईचा विजय! Gen Z ने सरकारला जमिनीवर आणलं; राज ठाकरेंचं मोठं विधान
Raj Thackeray | तरुणाईचा विजय! Gen Z ने सरकारला जमिनीवर आणलं; राज ठाकरेंचं मोठं विधान
आता आंदोलकांचा मोर्चा अमित शहांकडे... बड्या नेत्याच्या विधानाने...
आता आंदोलकांचा मोर्चा अमित शहांकडे... बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
प्रधान यांनी राजीनामा देताच शरद पवारांची सर्वात मोठी प्रतिक्रिया
Sharad Pawar | धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देताच शरद पवारांची सर्वात मोठी प्रतिक्रिया, म्हणाले...
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा ही पहिली विकेट, पुढे... अभिजीत दीपके...
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा ही पहिली विकेट, पुढे... अभिजीत दीपकेच्या विधानेने अनेकाच्या भुवया उंचावल्या
धर्मेंद्र प्रधान OUT! आता देवेंद्र फडणवीस होणार नवे शिक्षणमंत्री?
धर्मेंद्र प्रधान OUT! आता देवेंद्र फडणवीस होणार नवे शिक्षणमंत्री?; त्या बड्या नेत्याने नावच सांगून टाकलं