AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मणिपूरनंतर आता आणखी एक राज्यात अशांतता, कर्फ्यूमध्ये BSF जवानांवर हल्ला, सैन्य उतरवण्याची वेळ आली

अनेक ठिकाणी जाळपोळ आणि संपत्तीचं नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा पथकांसह सैन्य तैनात करावं लागलय.

मणिपूरनंतर आता आणखी एक राज्यात अशांतता, कर्फ्यूमध्ये BSF जवानांवर हल्ला, सैन्य उतरवण्याची वेळ आली
Indian Army
| Updated on: Mar 12, 2026 | 5:02 PM
Share

ईशान्य भारतातील राज्य मणिपूर आता कुठे शांत होत असताना मेघालयमध्ये हिंसाचार सुरु झाला आहे. बुधवारी संध्याकाळी मेघालयच्या गारो हिल्स क्षेत्रात समाजकंटकांनी BSF जवानांवर हल्ला केला. यात अनेक जवान जखमी झालेत. यावेळी सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) डीआयजीच्या ताफ्यातील एका वाहन सुद्धा पेटवून देण्यात आलं. डीआयजी अन्य अधिकाऱ्यांसह भारत-बांग्लादेश सीमेजवळ पश्चिम गारो हिल्स जिल्ह्यात एका गावात बैठक करुन परतत होते. या हल्ल्याच्यावेळी डीआयजी आणि त्यांच्यासोबत असलेल्या अधिकाऱ्यांना किरकोळ दुखापत झाली. ताफ्याचा भाग असलेल्या एका गाडीला आग लागली.

गारो पर्वतीय स्वायत्त जिल्हा परिषद निवडणुकीवरुन विरोध प्रदर्शन सुरु झाल्यानंतर हा हिंसाचार उफाळला. आंदोलक निवडणुकीत बिगर गारो समुदायाच्या नामंकन प्रक्रियेच्या सहभागाला विरोध करत होते. मंगळवारी चिबिनांग क्षेत्रात झडपा झाल्या. त्यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोघांचा मृत्यू झाला. अनेक जखमी झाले.

सैन्याच्या पाच तुकड्या तैनात

या हिंसाचारामुळे गारो पर्वतीय क्षेत्रात अनेक ठिकाणी जाळपोळ आणि संपत्तीचं नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा पथकांसह सैन्याच्या पाच तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. यात तीन तुरामध्ये आणि दोन चिबिनांग क्षेत्रात तैनात करण्यात आल्या आहेत. या हिंसाचारानंतर मुख्यमंत्री संगमा यांनी 10 एप्रिलला प्रस्तावित असलेली GHADC निवडणूक स्थगित केल्याची घोषणा केली आहे.

कर्फ्यू लावला

अफवा रोखण्यासाठी आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी राज्य सरकारने गारो पर्वतीय क्षेत्रातील पाच जिल्ह्यांमध्ये मोबाईल-इंटरनेट सेवा निलंबित केली आहे. पश्चिम गारो पर्वतीय जिल्ह्यात कर्फ्यू लावण्यात आला आहे. जिल्ह्याचे उपायुक्त वी अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्फ्यू 13 मार्चच्या रात्री 12 वाजेपर्यंत प्रभावी राहिलं. गारो पर्वतीय क्षेत्रातील संवेदनशील भागात अतिरिक्त सुरक्षा पथकं तैनात करण्यात आली आहेत.

Follow Us
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण.
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्...
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्....
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू.
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार.
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?.
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना...
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा.....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा......
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?.
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री..
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री...