AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उपवासादरम्यान ‘हे’ आरोग्यदायी पेय तुम्हाला ठेवतील हायड्रेट अन् ऊर्जावान

तुम्ही उपवास करत असाल तर या काळात तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. अशा परिस्थितीत तुम्ही हे आरोग्यदायी पेय पिऊ शकता. हे शरीराला ऊर्जा प्रदान करण्यास त्याचबरोबर हायड्रेटेड ठेवण्यास मदत करू शकते. चला तर मग जाणून घेऊयात...

उपवासादरम्यान 'हे' आरोग्यदायी पेय तुम्हाला ठेवतील हायड्रेट अन् ऊर्जावान
health drinks
| Edited By: | Updated on: Apr 07, 2025 | 2:31 PM
Share

उपवास दरम्यान फक्त फळे, दुधी भोपळा आणि बटाटे यांसारख्या भाज्या आणि शिंगाड्याचे पीठ यासारख्या गोष्टींचा त्यांच्या आहारात समावेश करून त्या पदार्थांचे सेवन करतात. नवरात्रीच्या या दिवसांमध्ये लोकं फक्त या गोष्टींपासून बनवलेले पदार्थ खातात. पण उपवासाच्या काळात व या कडक उन्हाळ्यात तुमच्या आरोग्याची काळजी घेणे देखील खूप महत्वाचे आहे. अशा परिस्थितीत तुम्ही काही आरोग्यदायी पेय बनवू शकता आणि ते पिऊ शकता. कारण या पेयांच्या सेवनाने तुमच्या शरीराला ऊर्जा प्रदान करण्यास आणि हायड्रेटेड ठेवण्यास मदत करू शकते. चला तर मग जाणून घेऊयात कोणती आहेत ही आरोग्यदायी पेय…

बनाना शेक

केळीचे सेवन केल्याने तुमच्या शरीराला ऊर्जा मिळते, म्हणून अनेकजण उपवासाच्या वेळी केळीचे सेवन करतात. तुम्ही केळी खाण्याऐवजी याचा शेक बनवून देखील पिऊ शकता. बनाना शेक बनवण्यासाठी, प्रथम केळी सोलून त्याचे लहान तुकडे करा. मिक्सर जारमध्ये केळी, दूध, साखर किंवा मध घाला. शेक स्मूद आणि क्रिमी होईपर्यंत बारीक करा. जर तुम्हाला कोल्ड बनाना शेक आवडत असेल तर तुम्ही त्यात बर्फाचे तुकडे घालून मिक्सर मध्ये बारीक करू शकता. अशा पद्धतीने बनानाशेक तुम्ही प्यायल्याने शरीराला ऊर्जा मिळेल त्यासोबतच पोट देखील भरलेले राहील. मात्र मधुमेहाच्या रुग्णांनी ते पिणे टाळावे. कारण त्यात नैसर्गिक साखर असते, जी रक्तातील साखरेची पातळी वाढवू शकते.

नारळ पाणी

नारळाचे पाणी शरीराला नैसर्गिकरित्या हायड्रेट करण्यास मदत करते कारण त्यात पोटॅशियम, सोडियम आणि मॅग्नेशियम सारखे नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट्स असतात, जे शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यास मदत करतात. अशातच नारळ पाणी हे शरीराला ताजेपणा आणि ऊर्जा प्रदान करण्यास देखील मदत करते. अशा परिस्थितीत तुम्ही उपवास करताना नारळ पाणी देखील पिऊ शकता.

फळांचा ज्यूस

उपवासाच्या वेळी तुम्ही फळांचा ज्यूस देखील पिऊ शकता. यामुळे तुमच्या शरीराला ऊर्जा मिळेल आणि शरीर हायड्रेटेडही राहील. सफरचंदाचा ज्यूस, संत्र्याचा ज्यूस आणि अननस किंवा डाळिंबाचा ज्यूस देखील उपवासदरम्यान सेवन केले जाऊ शकतात.

लस्सी

उन्हाळ्यात अनेकांना लस्सी प्यायला खुप आवडते. कारण लस्सी शरीराला थंडावा देते. त्यासोबत पोटासाठी देखील फायदेशीर असून शरीराला हायड्रेट ठेवण्यास देखील मदत करते. म्हणून तुम्ही उपवासाच्या वेळी लस्सी देखील पिऊ शकता. हे तुमच्या शरीरात ऊर्जा टिकवून ठेवण्यास देखील मदत करेल.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.