AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health Care : राग दूर करण्यासाठी ‘हे’ 4 सोपे मार्ग, स्ट्रेसची समस्या दूर होण्यासही मदत!

एक काळ होता, जेव्हा लोकांकडे खूप वेळ असायचा. लोक एकत्र बसून गप्पा मारायचे. पण आजच्या संगणक युगात सर्व काही बदलले आहे. एकत्र कुटुंब पध्दत राहिली नाहीये. नातेसंबंध फक्त मोबाईल पुरतेच राहिले आहेत.

Health Care : राग दूर करण्यासाठी 'हे' 4 सोपे मार्ग, स्ट्रेसची समस्या दूर होण्यासही मदत!
ताण
| Edited By: | Updated on: Sep 07, 2021 | 8:21 AM
Share

मुंबई : एक काळ होता, जेव्हा लोकांकडे खूप वेळ असायचा. लोक एकत्र बसून गप्पा मारायचे. पण आजच्या संगणक युगात सर्व काही बदलले आहे. एकत्र कुटुंब पध्दत राहिली नाहीये. नातेसंबंध फक्त मोबाईल पुरतेच राहिले आहेत. ऑफिसमध्ये कामाचा इतका बोजा आहे की कुटुंबासोबत काही क्षण घालवण्यासाठी वेळ काढणे कठीण झाले आहे. कुणालाही आपले मन कोणाजवळ व्यक्त करण्यासाठी वेळ नाहीये. मानवी जीवन फक्त काम आणि जबाबदाऱ्यांमध्ये व्यस्त झाले आहे. (Special tips to relieve stress)

हेच कारण आहे की, आजकाल तणावासारख्या समस्या सामान्य होत आहेत. जेव्हा ताण मर्यादेपलीकडे वाढतो तेव्हा ते नैराश्याचे रूप धारण करते. नैराश्यामुळे, व्यक्ती योग्य निर्णय घेण्याची क्षमता देखील गमावते आणि कधीकधी चुकीची पावले देखील उचलते. या परिस्थिती टाळण्यासाठी मनातील राग दूर करणे अत्यंत आवश्यक आहे. येथे जाणून घ्या असे 4 सोपे मार्ग जे तुमची अस्वस्थता कमी करण्यासाठी आणि तुमचा मूड सुधारण्यासाठी फायदेशीर आहेत.

मनातील विचार लिहा

जेव्हा तुम्हाला दिवसभर वेळ मिळेल. तेव्हा तुम्ही काही वेळ बसून तुमची डायरी लिहा. तुमच्या मनातील प्रत्येक चांगल्या -वाईट गोष्टी या डायरीत लिहा. आपल्याला काय त्रास देत आहे याबद्दल लिहा. आपल्या भावना बाहेर काढून, मन खूप हलके होते. म्हणून रोज एक डायरी लिहा.

क्लासेस लावा

तणाव दूर करण्यासाठी संगीत ही सर्वोत्तम चिकित्सा मानली जाते. आपण स्वतःला काही संगीत क्रियाकलापांशी जोडले पाहिजे. यासाठी एकतर डान्स क्लासमध्ये सामील व्हा. आपला मूड सुधारण्यासाठी नृत्य करा. किंवा गायन, गिटार किंवा इतर कोणतेही वाद्य शिका. जर वेळ कमी असेल तर तुम्ही साप्ताहिक क्लासेस जाॅईन करा. यासह, अनावश्यक गोष्टी तुमच्या मनात येणार नाहीत आणि तुमचे मन शांत होईल आणि तुम्हाला खूप चांगले वाटेल.

विश्वासूशी बोला

तणाव दूर करण्याचा हा सर्वात जुना, पण प्रभावी मार्ग आहे. जेव्हा तुम्हाला काही त्रास होतो. तेव्हा तुमची समस्या तुमच्या विश्वासू व्यक्तीला सांगा. तुम्हाला समोरून समस्येचे समाधान देखील मिळू शकेल आणि तुमचा मूड देखील सुधारेल. आपल्या मनातील काही गोष्टी आपल्या जवळच्या व्यक्तीशी बोलल्यावर मन हलके होण्यास मदत होते.

ध्यान करा

ध्यान ही अशी गोष्ट आहे जी तणाव आपल्याभोवती फिरू देत नाही. जर तुम्ही सकाळी लवकर उठल्यानंतर ध्यान करू शकत नसाल तर संध्याकाळी किंवा रात्री जेव्हा तुम्हाला मोकळा वेळ मिळेल. तेव्हा काही वेळ ध्यान करा. ध्यान केल्याने तुमचे मन स्थिर होते. मनाला शांती मिळते आणि तुम्ही सर्व कामे चांगल्या प्रकारे करू शकाल.

संबंधित बातम्या : 

Milk Testing : सावधान! घट्ट दिसण्यासाठी दुधात मिसळले जातायत ‘हे’ घटक, अशी तपासा दुधाची शुद्धता

Health | मधुमेहाची चिंता सतावतेय? या 5 पदार्थांचा आहारात समावेश करा आणि टेन्शन मुक्त व्हा!

(Special tips to relieve stress)

पुण्याच्या ओंकारेश्वर मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी
पुण्याच्या ओंकारेश्वर मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी.
कोंडेश्वर शिव मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या मोठ्या रांगा
कोंडेश्वर शिव मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या मोठ्या रांगा.
तेजस ठाकरेंवर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरु! नेमकं काय घडलं?
तेजस ठाकरेंवर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरु! नेमकं काय घडलं?.
अजित पवारांचा विलीनीकरणासाठी आग्रह होता - जयंत पाटील
अजित पवारांचा विलीनीकरणासाठी आग्रह होता - जयंत पाटील.
हर्षवर्धन सपकाळांच्या वक्तव्याने वाद; भाजप-काँग्रेसमध्ये जुंपली
हर्षवर्धन सपकाळांच्या वक्तव्याने वाद; भाजप-काँग्रेसमध्ये जुंपली.
राज्यभरात एटीएसची मोठी कारवाई; यवतमाळ आणि अहिल्यानगरमध्ये छापे
राज्यभरात एटीएसची मोठी कारवाई; यवतमाळ आणि अहिल्यानगरमध्ये छापे.
अजित पवारांच्या अपघाताप्रकरणी रोहित पवारांचं अमित शाहांना पत्र
अजित पवारांच्या अपघाताप्रकरणी रोहित पवारांचं अमित शाहांना पत्र.
महाराष्ट्र पालथा घातला असता तर...; राऊतांनी ठाकरे बंधूंचे कान टोचले
महाराष्ट्र पालथा घातला असता तर...; राऊतांनी ठाकरे बंधूंचे कान टोचले.
मी कान नाही टोचले, मी फक्त...; सामनातील अग्रलेखावर राऊतांचं उत्तर
मी कान नाही टोचले, मी फक्त...; सामनातील अग्रलेखावर राऊतांचं उत्तर.
मेट्रोच्या कामाच्या नावाखाली अख्खी मुंबई खोदून ठेवलीय; राऊतांची टीका
मेट्रोच्या कामाच्या नावाखाली अख्खी मुंबई खोदून ठेवलीय; राऊतांची टीका.