Stress management: तणाव आपल्या आरोग्यासाठी ठरतो धोकादायक, असा करा ताण दूर

स्ट्रेस म्हणजेच तणाव हा अल्पकालीन आणि दीर्घकालीन असतो. थोड्या काळासाठी असलेल्या तणावाला अल्पकालीन म्हटले जाते, या परिस्थितीमध्ये झोप कमी होते तसेच भुकेचा पॅटर्नही बदलतो.

Stress management: तणाव आपल्या आरोग्यासाठी ठरतो धोकादायक, असा करा ताण दूर
Image Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Dec 23, 2022 | 1:30 PM

नवी दिल्ली – आजकालच्या धावपळीच्या जीवनात अनेक लोक तणावाशी (Stress) झुंजत असतात. तणावामुळे शारीरिक आरोग्याचे (physical health) खूप नुकसान होते. त्यामुळे आरोग्य बिघडण्याची भीती असते. तसेच हा ताण मनापर्यंत पोहोचला तर मानसिक स्वास्थ्यही (mental health) बिघडू शकते. कोरोना महामारीमुळे प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या प्रमाणात तणावाचा सामना करत आहे. तणाव वाढला तर मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य बिघडू लागते.

अनेक वेळेस असे होते की एखादी व्यक्ती तणावात असली तरी त्याची लक्षणे त्यांना समजत नाहीत. तणाव वाढल्यावर काय होते, हे जाणून घेऊया.

डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, आपल्या जीवनातील कोणताही मोठा बदल हा तणावाचे कारण बनू शकतो. जर आपल्या जीवनात काहीतरी बदलले असेल आणि आपण ते स्वीकारू शकत नसू तर त्यामुळेही तणाव वाढू शकतो. उदाहरणार्थ, नोकरी बदलली असेल आणि तिथे नीट काम करता येत नसेल किंवा कुटुंबात घडलेली एखादी मोठी दु:खद घटना, यामुळेही ताण येऊ शकतो.

हे सुद्धा वाचा

तणाव दीर्घकाळापर्यंत राहू शकतो

डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, तणाव हा अल्पकालीन आणि दीर्घकालीन असतो. थोड्या काळासाठी असलेल्या तणावाला अल्पकालीन म्हटले जाते, या परिस्थितीमध्ये झोप कमी होते तसेच भुकेचा पॅटर्नही बदलतो. पण दीर्घकालीन तणाव हा खूप धोकादायक ठरू शकतो. अशा परिस्थितीत संबंधित व्यक्तीचे मानसिक आरोग्य बिघडू शकते. त्या व्यक्तीचा स्वभाव बदलतो आणि क्वचित त्या व्यक्तीच्या मनात नशेचे किंवा आत्मघाताचे विचारही येऊ शकतात.

कोरोनानंतर वाढली समस्या

काहीवेळा विनाकारण तणाव निर्माण होऊ लागतो. हे भीतीमुळे किंवा अस्वस्थतेमुळे होते. त्याचा शरीरावर खूप परिणाम होतो. कोरोना महामारीनंतर ही समस्या खूप वाढली आहे. अनेक लोकांमध्ये चिंता आणि नैराश्याची लक्षणे दिसून येत आहेत.

तणाव कमी करण्याचे मार्ग

प्रत्येक व्यक्तीने कमीत कमी 8 तासांची पुरेशी झोप घेतली पाहिजे. झोप ही आपले शरीर आणि मन दोन्हीसाठी चांगली ठरते. झोप आपल्या शरीराची दुरुस्ती करण्यास आणि तणावाचे शरीरावर होणारे परिणाम कमी करण्यास मदत करते. झोपेच्या चांगल्या सवयी अंगिकारल्यास झोप सुधारण्यास मदत होऊ शकते.

– सुसंगती पाळावी, रोज रात्री एक निश्चित वेळा ठरवून झोपा आणि सकाळी उठण्याचीही निश्चित वेळ पाळा. वे

– झोपताना खोली शांत आहे याची खात्री करा

– बेडरूममध्ये टीव्ही, कॉम्प्युटर आणि स्मार्ट फोन यांसारखी इलेक्ट्रॉनिक उपकरणे ठेवू नयेत.

– झोपायच्या आधी जास्त खाणे, कॅफेनचे सेवन करणे तसेच धूम्रपान व मद्यपान करणे टाळावे.

– रोज थोडा व्यायाम करा. दिवसा शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहिलात तर रात्री सहज झोप येईल.

– चांगले, ताजे व पौष्टिक अन्न खा.

– योगासने व मेडिटेशन करा.

(डिस्क्लेमर- संबंधित विकारांची प्राथमिक माहिती, लक्षणे, तसेच काय करता येईल, याची माहिती देण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.