AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

साखर पोटात गेल्यावर दाखवते मोठा ‘प्रताप’, मधुमेहापासून ते कर्करोगापर्यंत धोका!

पांढरीशुभ्र व अत्यंत मधुर वाटणारी साखर आपल्या शरीरात गेल्यावर आरोग्याला अत्यंत घातक ठरु शकते. साखरेचे अतिसेवन भविष्यात गंभीर आजारांना निमंत्रण देते. त्यामुळे साखरेचे अतिसेवन टाळले पाहिजे. साखरेमुळे, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, मधुमेह, ह्रदयविकारासह अनेक आजार निर्माण होत असतात.

साखर पोटात गेल्यावर दाखवते मोठा ‘प्रताप’, मधुमेहापासून ते कर्करोगापर्यंत धोका!
साखरेचे दुष्परिणाम
| Updated on: Feb 16, 2022 | 8:34 PM
Share

मुंबई : अनेक लोक आपल्या रोजच्या आहारात (Diet) मोठ्या प्रमाणात साखरेचा (Sugar) तसेच साखरेपासून तयार झालेल्या गोड अन्नघटकांचा समावेश करीत असतात. ते चिभेला तात्पुरत्या स्वरुपाच छान लागत असले तरी याचे दीर्घकालीन परिणाम आपल्या शरीराला भोगावे लागत असतात. साखरेच्या अतिसेवनामुळे तुम्ही अनेक गंभीर स्वरुपांच्या आजारांना निमंत्रण देत असतात. मिठाई, साखरेपासून तयार जिलेबी, लाडू तसेच साखरेचे जास्त प्रमाण असणारी फळे आदींचे सेवन तुमच्या आरोग्याला अत्यंत घातक ठरु शकते. साखर हा आपल्या आरोग्यासाठी अत्यंत धोकेदायक घटक आहे. साखरेमुळे लठ्ठपणा, मधुमेह (Diabetes), उच्च रक्तदाब, ह्रदयविकार आदी विविध आजार होउ शकतात.

वाढत्या वजनाची समस्या

अनेकांचे वजन विविध आजारांमुळे वाढण्याची शक्यता असते. असे असले तरी वजन वाढण्यामागे साखरेचे अतिसेवन हेदेखील एक सामान्य कारण असू शकते. साखरेच्या अतिरेकामुळे लठ्ठपणाची समस्या निर्माण होत असते. जास्त प्रमाणात साखर असलेली फळे किंवा कार्बोहायड्रेट्ससह साखर असलेली प्रत्येक गोष्ट वजन वाढीला कारणीभूत ठरत असते.

हृदयविकाराचा धोका

हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या अभ्यासानुसार साखरेमुळे हृदयविकाराचा धोका तीस टक्क्यांनी वाढत असतो. साखरयुक्त घटकांचा अतिवापर केल्यास यातून लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब व परिणामी ह्रदयविकाराचा धोका निर्माण होत असतो. अनेक जणांच्या आहारात मिठाईसह साखरेपासून तयार घटकांचा जास्त वापर असतो. यातून अनेक समस्या निर्माण होत असतात.

टाइप 2 मधुमेहाचा धोका

एका अभ्यासानुसार, जीवनशैलीशी संबंधित 90 टक्के आजारांमागे साखर हे सर्वात मोठे कारण आहे. त्यामुळे मधुमेहाचा धोका वाढतो. तुम्ही संतुलित प्रमाणात साखर खाल्ली तरीही ही काहीना काही प्रमाणात शरीराला धोकेदायकच ठरत असते. आपल्या आहारातून साखरेला पूर्णपणे हद्दपार करावे.

कर्करोगाचा धोका

साखरेमुळे शरीरात कर्करोगाचा धोका आणि शक्यताही वाढते. साखरेमुळे यूफोजीची प्रक्रिया मंदावते. ही अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये आपल्या शरीरातील लढाउ पेशी खराब पेशींचा प्रतिकार करीत असतात. जेव्हा ही प्रक्रिया थांबते आणि खराब पेशी अनियंत्रितपणे वाढू लागतात, तेव्हा तेथून कर्करोग सुरू होतो.

नैराश्याचा धोका

साखरेचे सेवन केल्यावर इन्सुलिनची पातळी वाढते, यातून रक्तात साखरेचे प्रमाण जास्त वाढत जाउन मधुमेह होतो. शिवाय साखरेच्या अतिरेकाने नैराश्याचा धोकादेखील निर्माण होत असतो. याशिवाय अकाली वृध्दत्व येण्यामागेही साखर एक प्रमुख कारण आहे.

मुरुम व पुरळ येणे

साखरेचे जास्त सेवन केल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त वाढते. त्यातून अंगावर मुरुम आणि पुरळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासह त्वचेशी संबंधित अनेक आजार यातून निर्माण होत असतात.

इतर बातम्या :

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.