AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी रामबाण ठरतील हे 6 सुपरफूड, तुमच्या घरी सहज असते उपलब्ध

डायबिटीसचा सामना करण्यासाठी उन्हाळ्यात विशेष काळजी घ्यावी लागते. योग्य आहार आणि जीवनशैलीने हा आजार नियंत्रणात ठेवता येतो. या लेखात नमूद केलेले पदार्थ तुमच्या आहारात समाविष्ट केल्यास रक्तातील साखर नियंत्रणात राहते आणि शरीर निरोगी राहतं.

मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी रामबाण ठरतील हे 6 सुपरफूड, तुमच्या घरी सहज असते उपलब्ध
Diabetes food
साक्षी कणसे
साक्षी कणसे | Edited By: | Updated on: Jun 25, 2025 | 10:19 PM
Share

डायबिटीस म्हणजेच मधुमेह हा आजार सध्या जगभर झपाट्याने वाढतो आहे. एकदा हा आजार झाला की, तो पूर्णपणे बरा होणं शक्य नसतं, मात्र योग्य आहार आणि जीवनशैलीच्या मदतीने त्यावर नियंत्रण ठेवता येऊ शकतं. विशेषतः उन्हाळ्यात शरीरातील पाण्याचे प्रमाण झपाट्याने कमी होतं आणि ब्लड शुगर लेव्हल झपाट्याने वाढण्याची शक्यता असते. अशा वेळी डाएटमध्ये योग्य अन्नपदार्थांचा समावेश केल्यास मधुमेह नियंत्रणात राहतो आणि शरीरही ताजंतवानं राहतं.

साखर नियंत्रणासाठी कोणते फूड्स फायदेशीर?

1. ओट्स (Oats)

ओट्स हा एक लो-ग्लायसेमिक इंडेक्स फूड आहे, म्हणजेच यामुळे रक्तातील साखर झपाट्याने वाढत नाही. ओट्समध्ये असणारा फायबर शरीरात साखरेचे शोषण हळूहळू करतो. यामुळे शुगर नियंत्रणात राहते. शिवाय, ओट्समुळे वजन कमी होण्यास मदत होते आणि हृदयाच्या आरोग्यासाठीही ते फायदेशीर ठरतं.

2. कारलं

कारले हा मधुमेहींसाठी सुपरफूड मानला जातो. यामध्ये अ‍ॅक्टिव्ह कंपाऊंड्स असतात जे शरीरात इन्सुलिनची संवेदनशीलता वाढवतात. हे ब्लड शुगर कमी करण्यास मदत करतं. कारले पचनक्रिया सुधारण्यातही उपयुक्त आहे.

3. दुधी

उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी आणि हायड्रेटेड राहण्यासाठी लौकी एक चांगला पर्याय आहे. यामध्ये भरपूर पाणी असतं आणि फारच कमी कॅलोरी. मधुमेहींसाठी दुधी खाणं फायदेशीर ठरतं कारण हे साखर नियंत्रणास मदत करतं, वजन घटवण्यास उपयुक्त ठरतं आणि पचनतंत्रही सुधारतं.

4. बेरी

स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी, रास्पबेरी यासारख्या बेरीज अँटीऑक्सिडंट्स आणि फायबरने भरलेल्या असतात. यामुळे शरीरात इन्सुलिन रेजिस्टन्स कमी होतं आणि रक्तातील साखर नियंत्रणात राहते. बेरीज इम्युनिटी सुधारतात आणि हृदयासाठीही फायदेशीर असतात.

5. काकडी

काकडी हा उन्हाळ्यातील सर्वात उपयुक्त आणि सहज उपलब्ध होणारा पदार्थ आहे. यामध्ये सुमारे ९५% पाण्याचं प्रमाण असतं, जे शरीराला डिहायड्रेट होण्यापासून वाचवतो. काकडी खाल्ल्यामुळे शरीराला थंडावा मिळतो, वजन नियंत्रणात राहतं आणि डायबिटीसवरही नियंत्रण ठेवण्यास मदत होते. यामधील पोषणमूल्य त्वचेसाठीही फायदेशीर ठरतं.

6. भरपूर फायबरयुक्त आहार

डायबिटीस असणाऱ्या व्यक्तींनी त्यांच्या रोजच्या आहारात फायबरयुक्त गोष्टींचा समावेश आवर्जून करावा. फायबर पचनक्रिया सुधारते आणि रक्तातील साखरेची पातळी हळूहळू वाढवते. फळं, भाज्या, संपूर्ण धान्य यामध्ये फायबर अधिक प्रमाणात असतो.

आहारासोबतच या गोष्टी देखील करा फाॅलो 

डायबिटीसवर नियंत्रण ठेवण्यासाठी केवळ आहार पुरेसा नाही. रोज किमान ३० मिनिटांचा व्यायाम, ८-९ तासांची पुरेशी झोप आणि स्ट्रेस मॅनेजमेंटसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
तुमची 'डेंटल एज' जाणा, सेन्सोडाईन-टीव्ही 9 नेटवर्कचा उपक्रम
तुमची 'डेंटल एज' जाणा, सेन्सोडाईन-टीव्ही 9 नेटवर्कचा उपक्रम.
लवांडे यांना खरंच पोलिसांनी अटक केलं? सर्वात मोठी माहिती समोर; नेमकं..
लवांडे यांना खरंच पोलिसांनी अटक केलं? सर्वात मोठी माहिती समोर; नेमकं...
'कॉक्रोच जनता पार्टीचे 10-15 आमदार निवडून येतील' 6 दिवसांपूर्वी...
'कॉक्रोच जनता पार्टीचे 10-15 आमदार निवडून येतील' 6 दिवसांपूर्वी....
कर्जमाफी, क्रॉपलोन आणि AI; शेतकऱ्यांसाठी सरकारचा मास्टर प्लॅन
कर्जमाफी, क्रॉपलोन आणि AI; शेतकऱ्यांसाठी सरकारचा मास्टर प्लॅन.
मोठी बातमी! कॉकरोच जनता पार्टीला सर्वात मोठा दणका, ट्वीटर अकाऊंट थेट..
मोठी बातमी! कॉकरोच जनता पार्टीला सर्वात मोठा दणका, ट्वीटर अकाऊंट थेट...
काळीज पिळवटून टाकणारी घटना! आईनंच 22 दिवसांच्या तान्ह्या बाळाला आपटलं
काळीज पिळवटून टाकणारी घटना! आईनंच 22 दिवसांच्या तान्ह्या बाळाला आपटलं.
विकास लवांडे यांना अटक, कारवाईनंतर फोटो समोर; पुढं नेमकं काय होणार?
विकास लवांडे यांना अटक, कारवाईनंतर फोटो समोर; पुढं नेमकं काय होणार?.
नाशिक पुन्हा हादरलं! सुनेचा 8 वेळा गर्भपात, नंतर बळजबरीनं... सासु-सासर
नाशिक पुन्हा हादरलं! सुनेचा 8 वेळा गर्भपात, नंतर बळजबरीनं... सासु-सासर.
महागाईविरोधातील आंदोलन पेटलं; नागपुरात घोषणाबाजी अन् मोठा गोंधळ
महागाईविरोधातील आंदोलन पेटलं; नागपुरात घोषणाबाजी अन् मोठा गोंधळ.
रेल्वे भरती आंदोलन प्रकरणात राज ठाकरे निर्दोष, 18 वर्षांनी कोर्टाचा नि
रेल्वे भरती आंदोलन प्रकरणात राज ठाकरे निर्दोष, 18 वर्षांनी कोर्टाचा नि.